शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यू रुग्णांची सरकारी संख्या प्रत्यक्षाहून २९२ पटीने कमी

By admin | Updated: October 9, 2014 04:45 IST

२००६ ते २०१२ या सहा वर्षांत डेंग्युची लागण झालेल्या रुग्णांची संख्या सरकारी दफ्तरात नोंद झालेल्या आकडेवारीहून प्रत्यक्षात २८२ पट अधिक होती

नवी दिल्ली : २००६ ते २०१२ या सहा वर्षांत डेंग्युची लागण झालेल्या रुग्णांची संख्या सरकारी दफ्तरात नोंद झालेल्या आकडेवारीहून प्रत्यक्षात २८२ पट अधिक होती, असा संशोधन अहवाल भारत आणि अमेरिकेतील अभ्यासकांनी ‘अमेरिकन जर्नल आॅफ ट्रॉपिकल मेडिसिन अ‍ॅण्ड हायजीन’ या मान्यवर वैद्यकीय नियतकालिकात प्रकाशित केला आहे.सरकारी आकडेवारीनुसार याकाळात भारतात दरवर्षी सरासरी २०,४७४ व्यक्तींना डेंग्युची लागण झाली व एकूण १३६ मृत्यू झाले. मात्र प्रत्यक्षात याहून २८२ पटींने अधिक म्हणजे सुमारे ६० लाख लोकांना या काळात डेंग्युने ग्रासले, असा दावा या संशोधन अहवालात करण्यात आला आहे.डेंग्युच्या या व्यापक प्रसारामुळे या काळात भारतीय अर्थव्यवस्थेवर १.१ अब्ज डॉलरचा आर्थिक बोजा पडला, असा अंदाजही त्यात करण्यात आला आहे. डेंग्युमुळे झालेली ही आर्थिक हानी भारत अंतराळ संशोधनावर जेवढा खर्च करतो त्याच्या बरोबरीची आहे.वाल्थॅम, मॅसेच्युसेट््स येथील ब्रँडीस विद्यापीठाची स्नेयडर इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ पॉलिसी, नवी दिल्लीतील ‘इनक्लेन ट्र्स्ट इंटरनॅशनल’ आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे मदुराई येथील ‘सेंटर फॉर रीसर्च इन मेडिकल एन्टॉमॉलॉजी’ यांनी मिळून हा संशोधन अहवाल तयार केला आहे.आतापर्यंत डॉक्टरी तपासणीनंतर स्पष्ट झालेल्या डेंग्युच्या रुग्णांचीच आकडेवारी सरकारी दफ्तरात नोंदविली जात असे. याचे संकलन ‘नॅशनल व्हेक्टर बोर्न डिसीजेस कन्ट्रोल प्रोग्रॅम’ ही केंद्र सरकारची संघटना करते. त्यानुसार २००६ ते २०१२ या काळात भारतात डेंग्युची लागण होण्याचे सरासरी प्रमाण २०,४७४ असून या काळात डेंग्युमुळे झालेले मृत्यू १३६ आहेत.या संशोधन अहवालाचे प्रमुख लेखक व ब्रँडीस विद्यापीठाचे आरोग्य अर्थशास्त्र विषयाचे प्राध्यापक डोनाल्ड शेपर्ड यांनी सांगितले की, २००६ ते २०१२ या काळात भारतात ‘क्लिनिकल’ तपासणीतून उघड झालेल्या डेंग्युच्या रुग्णांची संख्या प्रत्यक्षात सरकारी आकडेवारीहून ३०० पट अधिक म्हणजे वर्षाला ६० लाख एवढी होती. तरीही आम्ही अंदाज केलेला हा आकडाही वास्तवाहून कमी असावा असे आम्हाला वाटते. याचे कारण असे की, आम्ही यासाठी तमिळनाडू या राज्यास आधार मानून पाहणी केली. तेथे देशाच्या इतर भागांच्या तुलनेत साथीच्या रोगांची निगराणी व नोंदणी व्यवस्था अधिक कार्यक्षम आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)