शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लश्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
4
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
5
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
6
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
7
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
8
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
9
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
10
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
11
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
12
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
13
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
14
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
15
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
16
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
17
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
18
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
19
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
20
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...

डेंग्यू रुग्णांची सरकारी संख्या प्रत्यक्षाहून २९२ पटीने कमी

By admin | Updated: October 9, 2014 04:45 IST

२००६ ते २०१२ या सहा वर्षांत डेंग्युची लागण झालेल्या रुग्णांची संख्या सरकारी दफ्तरात नोंद झालेल्या आकडेवारीहून प्रत्यक्षात २८२ पट अधिक होती

नवी दिल्ली : २००६ ते २०१२ या सहा वर्षांत डेंग्युची लागण झालेल्या रुग्णांची संख्या सरकारी दफ्तरात नोंद झालेल्या आकडेवारीहून प्रत्यक्षात २८२ पट अधिक होती, असा संशोधन अहवाल भारत आणि अमेरिकेतील अभ्यासकांनी ‘अमेरिकन जर्नल आॅफ ट्रॉपिकल मेडिसिन अ‍ॅण्ड हायजीन’ या मान्यवर वैद्यकीय नियतकालिकात प्रकाशित केला आहे.सरकारी आकडेवारीनुसार याकाळात भारतात दरवर्षी सरासरी २०,४७४ व्यक्तींना डेंग्युची लागण झाली व एकूण १३६ मृत्यू झाले. मात्र प्रत्यक्षात याहून २८२ पटींने अधिक म्हणजे सुमारे ६० लाख लोकांना या काळात डेंग्युने ग्रासले, असा दावा या संशोधन अहवालात करण्यात आला आहे.डेंग्युच्या या व्यापक प्रसारामुळे या काळात भारतीय अर्थव्यवस्थेवर १.१ अब्ज डॉलरचा आर्थिक बोजा पडला, असा अंदाजही त्यात करण्यात आला आहे. डेंग्युमुळे झालेली ही आर्थिक हानी भारत अंतराळ संशोधनावर जेवढा खर्च करतो त्याच्या बरोबरीची आहे.वाल्थॅम, मॅसेच्युसेट््स येथील ब्रँडीस विद्यापीठाची स्नेयडर इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ पॉलिसी, नवी दिल्लीतील ‘इनक्लेन ट्र्स्ट इंटरनॅशनल’ आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे मदुराई येथील ‘सेंटर फॉर रीसर्च इन मेडिकल एन्टॉमॉलॉजी’ यांनी मिळून हा संशोधन अहवाल तयार केला आहे.आतापर्यंत डॉक्टरी तपासणीनंतर स्पष्ट झालेल्या डेंग्युच्या रुग्णांचीच आकडेवारी सरकारी दफ्तरात नोंदविली जात असे. याचे संकलन ‘नॅशनल व्हेक्टर बोर्न डिसीजेस कन्ट्रोल प्रोग्रॅम’ ही केंद्र सरकारची संघटना करते. त्यानुसार २००६ ते २०१२ या काळात भारतात डेंग्युची लागण होण्याचे सरासरी प्रमाण २०,४७४ असून या काळात डेंग्युमुळे झालेले मृत्यू १३६ आहेत.या संशोधन अहवालाचे प्रमुख लेखक व ब्रँडीस विद्यापीठाचे आरोग्य अर्थशास्त्र विषयाचे प्राध्यापक डोनाल्ड शेपर्ड यांनी सांगितले की, २००६ ते २०१२ या काळात भारतात ‘क्लिनिकल’ तपासणीतून उघड झालेल्या डेंग्युच्या रुग्णांची संख्या प्रत्यक्षात सरकारी आकडेवारीहून ३०० पट अधिक म्हणजे वर्षाला ६० लाख एवढी होती. तरीही आम्ही अंदाज केलेला हा आकडाही वास्तवाहून कमी असावा असे आम्हाला वाटते. याचे कारण असे की, आम्ही यासाठी तमिळनाडू या राज्यास आधार मानून पाहणी केली. तेथे देशाच्या इतर भागांच्या तुलनेत साथीच्या रोगांची निगराणी व नोंदणी व्यवस्था अधिक कार्यक्षम आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)