शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
5
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
6
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
7
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
8
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
9
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
10
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
12
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
13
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
14
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
15
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
16
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
17
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
18
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
19
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?

सरकार नागपुरात

By admin | Updated: December 7, 2014 00:31 IST

सोमवारपासून सुरु होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने संपूर्ण सरकारच रविवारी नागपुरात दाखल होणार आहे. अधिवेशनाची संपूर्ण तयारी विधिमंडळ सचिवालय आणि स्थानिक

सभापती, अध्यक्ष आज येणार : १९ पर्यंतचे कामकाज ठरले नागपूर : सोमवारपासून सुरु होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने संपूर्ण सरकारच रविवारी नागपुरात दाखल होणार आहे. अधिवेशनाची संपूर्ण तयारी विधिमंडळ सचिवालय आणि स्थानिक प्रशासनाने पूर्ण केली आहे. काही मंत्री नागपुरात दाखल झाले असून रविवारी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, उपसभापती वसंत डावखरे यांचे नागपुरात आगमन होणार आहे. शिवाजीराव देशमुख आणि हरिभाऊ बागडे स. ९.२५ वा. तर उपसभापती वसंत डावखरे हे सायं. ५ वा. येणार आहेत. बहुतांश मंत्रीही रविवारी दुपारपर्यंत दाखल होणार आहेत. राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर झालेल्या विशेष अधिवेशनाचा अपवाद वगळता नव्या सरकारचे हे पहिलेच अधिवेशन आहे. यासाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. सचिवालाचे कामकाज यापूर्वीच सुरु झाले असून रविवारी मुख्यमंत्री व त्यांच्या मंत्रिमंडळाचे इतर सदस्य नागपुरात दाखल होत आहे. काही मंत्र्यांचे शनिवारीच आगमन झाले आहे. आमदारांसाठी आमदार निवास सज्ज ठेवण्यात आले असून मंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या रविभवनात सर्व तयारी पूर्ण झाली आहे. रविवारपासून विधिमंडळ सदस्य आणि मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकारी दाखल होतील. अधिवेशनाच्या निमित्ताने संपूर्ण सरकारच नागपुरात दाखल होणार आहे. सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद नसल्याने यंदा दोन सत्ताकेंद्र नसतील. सुरुवातीच्या दोन आठवड्याच्या म्हणजे १९ तारखेपर्यंतच्या कामकाजाला विधिमंडळ सल्लागार समितीने मंजुरी दिली आहे. १८ तारखेला या समितीची पुन्हा बैठक होणार असून त्यानंतर अधिवेशनाचा पुढचा कार्यकाळ ठरेल. या अधिवेशनात महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना विधेयक आणि सहकारी संस्था सुधारणा विधेयक मांडण्यात येणार आहेत, असे विधिमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव अनंत कळसे यांनी सांगितले.दुष्काळाचा मुद्दा गाजणारविदर्भ आणि मराठवाड्यातील दुष्काळ आणि या भागातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा प्रश्न गाजत आहेत. यासंदर्भात अनेक सदस्य विविध सांसदीय आयुधांचा वापर करून हा प्रश्न सभागृहात करण्याचा प्रयत्न करणार आहेत. नागपूर विभागात २०२९ गावांची आणेवारी ५० पैशापेक्षा कमी असून मोठ्याप्रमाणात नापिकी झाली आहे. नियमित वीज पुरवठा होत नसल्याने त्याचाही फटका शेतकऱ्यांना बसला आहे.काँग्रेसचा ‘हल्लाबोल’मोर्चादुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना विशेष पॅकेज आणि दलितांवरील वाढते अत्याचार रोखण्याच्या मागणीसाठी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे ८ तारखेला प्रदेश काँग्रेसकडून ‘हल्लाबोल’ मोर्चा काढण्यात येणार आहे. स. ११ वा. दीक्षाभूमीवरून हा मोर्चा निघणार आहे.आज नागपूर येथे यासंदर्भात बैठक झाली. त्यात माजी खासदार विलास मुत्तेमवार, ,माजी मंत्री राजेंद्र मुळक,काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकर, प्रफुल्ल गुडधे, अभिजित वंजारी याच्यासह इतरही नेते उपस्थित होते.