शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
3
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
4
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
5
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
6
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
7
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
8
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
9
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
10
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
11
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
12
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
13
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
14
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
15
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
16
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
17
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
18
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
19
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
20
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार

सरकार नागपुरात

By admin | Updated: December 7, 2014 00:31 IST

सोमवारपासून सुरु होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने संपूर्ण सरकारच रविवारी नागपुरात दाखल होणार आहे. अधिवेशनाची संपूर्ण तयारी विधिमंडळ सचिवालय आणि स्थानिक

सभापती, अध्यक्ष आज येणार : १९ पर्यंतचे कामकाज ठरले नागपूर : सोमवारपासून सुरु होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने संपूर्ण सरकारच रविवारी नागपुरात दाखल होणार आहे. अधिवेशनाची संपूर्ण तयारी विधिमंडळ सचिवालय आणि स्थानिक प्रशासनाने पूर्ण केली आहे. काही मंत्री नागपुरात दाखल झाले असून रविवारी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, उपसभापती वसंत डावखरे यांचे नागपुरात आगमन होणार आहे. शिवाजीराव देशमुख आणि हरिभाऊ बागडे स. ९.२५ वा. तर उपसभापती वसंत डावखरे हे सायं. ५ वा. येणार आहेत. बहुतांश मंत्रीही रविवारी दुपारपर्यंत दाखल होणार आहेत. राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर झालेल्या विशेष अधिवेशनाचा अपवाद वगळता नव्या सरकारचे हे पहिलेच अधिवेशन आहे. यासाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. सचिवालाचे कामकाज यापूर्वीच सुरु झाले असून रविवारी मुख्यमंत्री व त्यांच्या मंत्रिमंडळाचे इतर सदस्य नागपुरात दाखल होत आहे. काही मंत्र्यांचे शनिवारीच आगमन झाले आहे. आमदारांसाठी आमदार निवास सज्ज ठेवण्यात आले असून मंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या रविभवनात सर्व तयारी पूर्ण झाली आहे. रविवारपासून विधिमंडळ सदस्य आणि मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकारी दाखल होतील. अधिवेशनाच्या निमित्ताने संपूर्ण सरकारच नागपुरात दाखल होणार आहे. सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद नसल्याने यंदा दोन सत्ताकेंद्र नसतील. सुरुवातीच्या दोन आठवड्याच्या म्हणजे १९ तारखेपर्यंतच्या कामकाजाला विधिमंडळ सल्लागार समितीने मंजुरी दिली आहे. १८ तारखेला या समितीची पुन्हा बैठक होणार असून त्यानंतर अधिवेशनाचा पुढचा कार्यकाळ ठरेल. या अधिवेशनात महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना विधेयक आणि सहकारी संस्था सुधारणा विधेयक मांडण्यात येणार आहेत, असे विधिमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव अनंत कळसे यांनी सांगितले.दुष्काळाचा मुद्दा गाजणारविदर्भ आणि मराठवाड्यातील दुष्काळ आणि या भागातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा प्रश्न गाजत आहेत. यासंदर्भात अनेक सदस्य विविध सांसदीय आयुधांचा वापर करून हा प्रश्न सभागृहात करण्याचा प्रयत्न करणार आहेत. नागपूर विभागात २०२९ गावांची आणेवारी ५० पैशापेक्षा कमी असून मोठ्याप्रमाणात नापिकी झाली आहे. नियमित वीज पुरवठा होत नसल्याने त्याचाही फटका शेतकऱ्यांना बसला आहे.काँग्रेसचा ‘हल्लाबोल’मोर्चादुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना विशेष पॅकेज आणि दलितांवरील वाढते अत्याचार रोखण्याच्या मागणीसाठी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे ८ तारखेला प्रदेश काँग्रेसकडून ‘हल्लाबोल’ मोर्चा काढण्यात येणार आहे. स. ११ वा. दीक्षाभूमीवरून हा मोर्चा निघणार आहे.आज नागपूर येथे यासंदर्भात बैठक झाली. त्यात माजी खासदार विलास मुत्तेमवार, ,माजी मंत्री राजेंद्र मुळक,काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकर, प्रफुल्ल गुडधे, अभिजित वंजारी याच्यासह इतरही नेते उपस्थित होते.