शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

सोयाबीन उत्पादक शेतक-यांबाबत शासनाची चालढकल

By admin | Updated: October 31, 2016 23:25 IST

सोयाबीनची विक्री ठप्प; हमी दर मिळणे झाले दुरापास्त!

सुनील काकडेवाशिम, दि. ३१-अहोरात्र कष्ट करूनही सोयाबीनला अगदीच निच्चांकी दर मिळत असल्याने आर्थिक परिस्थितीसमोर हतबल झालेल्या शेतकर्‍यांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे. जिल्हा प्रशासनाकडून अद्याप सोयाबीन खरेदीची तारीख जाहीर केली नाही. मात्र लवकरच हमी भावाने खरेदी सुरू केली जाईल, असे आश्‍वासन प्रशासनाकडून दिले जात आहे. यामुळे शासनाची सोयाबीन शेतकर्‍यांबाबत चालढकल करण्याची भूमिका असल्याचे दिसून येत आहे. कधीकाळी पांढर्‍या सोन्याचा (कपाशी) प्रदेश म्हणून ओळखल्या जाणार्‍या पश्‍चिम वर्‍हाडातील अकोला, बुलडाणा आणि वाशिम या तीनही जिल्ह्यांमधून सोयाबीनचा सर्वाधिक पेरा कमी होत आहे. एकट्या वाशिम जिल्ह्यात यंदा अडीच लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र सोयाबीनच्या पेर्‍याने व्यापले होते. प्रारंभी चांगला पाऊस, मध्यंतरी प्रदीर्घ उघाड अन् त्यानंतर अतवृष्टीसम बरसलेल्या पावसाचा धैर्याने सामना करीत यावर्षी शेतकर्‍यांनी सोयाबीनचे रक्षण केले. साधारणत: १५ दिवसांपूर्वी सोयाबीनची सोंगणी होऊन माल बाजार समित्यांमध्ये पोहोचायला लागला; तोवर सोयाबीनचे दर मात्र प्रचंड प्रमाणात गडगडले होते. अशातच सोयाबीनला शासनाने २ हजार ७७५ रुपये प्रतिक्विंटल आधारभूत किंमत जाहीर केली; मात्र त्याची अंमलबजावणी अद्याप कुठेच सुरू झालेली नाही. ह्यनाफेडह्णच्या वतीने कुठेही सोयाबीन खरेदी केंद्र उघडण्यात आलेले नाही. असे असताना जिल्हा प्रशासनाने शेतकर्‍यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार अवलंबिला आहे. २९ ऑक्टोबर रोजी यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की, शासनाने ठरविलेल्या आधारभूत किमतीनुसार, लवकरच सोयाबीनची खरेदी केली जाईल, ह्यनाफेडह्णमार्फत लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र उघडले जातील; मात्र २९ ऑक्टोबरपासून २ नोव्हेंबरपर्यंत सर्वच ठिकाणच्या बाजार समित्या बंद असल्याने जिल्हा प्रशासनाची ही उठाठेव सध्यातरी निर्थक ठरल्याचा सूर संतप्त शेतकर्‍यांमधून उमटत आहे.बाजार समित्या बंद असताना कशी होणार आश्‍वासनांची पूर्तता?राजकीय नेत्यांप्रमाणेच पोकळ आश्‍वासन देत असताना २९ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर, असे पाच दिवस बाजार समित्या बंद राहणार असल्याचा जिल्हा प्रशासनाला सपशेल विसर पडला. ऐन दिवाळी, भाऊबीज यासारख्या मोठय़ा सणांदरम्यान निच्चांकी दर मिळण्यासोबतच सोयाबीनची विक्री करणे अशक्य होत असल्याने शेतकर्‍यांची सद्य:स्थिती मात्र अत्यंत दयनिय झाली आहे.