शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी! पाकसमोर टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

सोयाबीन उत्पादक शेतक-यांबाबत शासनाची चालढकल

By admin | Updated: October 31, 2016 23:25 IST

सोयाबीनची विक्री ठप्प; हमी दर मिळणे झाले दुरापास्त!

सुनील काकडेवाशिम, दि. ३१-अहोरात्र कष्ट करूनही सोयाबीनला अगदीच निच्चांकी दर मिळत असल्याने आर्थिक परिस्थितीसमोर हतबल झालेल्या शेतकर्‍यांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे. जिल्हा प्रशासनाकडून अद्याप सोयाबीन खरेदीची तारीख जाहीर केली नाही. मात्र लवकरच हमी भावाने खरेदी सुरू केली जाईल, असे आश्‍वासन प्रशासनाकडून दिले जात आहे. यामुळे शासनाची सोयाबीन शेतकर्‍यांबाबत चालढकल करण्याची भूमिका असल्याचे दिसून येत आहे. कधीकाळी पांढर्‍या सोन्याचा (कपाशी) प्रदेश म्हणून ओळखल्या जाणार्‍या पश्‍चिम वर्‍हाडातील अकोला, बुलडाणा आणि वाशिम या तीनही जिल्ह्यांमधून सोयाबीनचा सर्वाधिक पेरा कमी होत आहे. एकट्या वाशिम जिल्ह्यात यंदा अडीच लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र सोयाबीनच्या पेर्‍याने व्यापले होते. प्रारंभी चांगला पाऊस, मध्यंतरी प्रदीर्घ उघाड अन् त्यानंतर अतवृष्टीसम बरसलेल्या पावसाचा धैर्याने सामना करीत यावर्षी शेतकर्‍यांनी सोयाबीनचे रक्षण केले. साधारणत: १५ दिवसांपूर्वी सोयाबीनची सोंगणी होऊन माल बाजार समित्यांमध्ये पोहोचायला लागला; तोवर सोयाबीनचे दर मात्र प्रचंड प्रमाणात गडगडले होते. अशातच सोयाबीनला शासनाने २ हजार ७७५ रुपये प्रतिक्विंटल आधारभूत किंमत जाहीर केली; मात्र त्याची अंमलबजावणी अद्याप कुठेच सुरू झालेली नाही. ह्यनाफेडह्णच्या वतीने कुठेही सोयाबीन खरेदी केंद्र उघडण्यात आलेले नाही. असे असताना जिल्हा प्रशासनाने शेतकर्‍यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार अवलंबिला आहे. २९ ऑक्टोबर रोजी यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की, शासनाने ठरविलेल्या आधारभूत किमतीनुसार, लवकरच सोयाबीनची खरेदी केली जाईल, ह्यनाफेडह्णमार्फत लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र उघडले जातील; मात्र २९ ऑक्टोबरपासून २ नोव्हेंबरपर्यंत सर्वच ठिकाणच्या बाजार समित्या बंद असल्याने जिल्हा प्रशासनाची ही उठाठेव सध्यातरी निर्थक ठरल्याचा सूर संतप्त शेतकर्‍यांमधून उमटत आहे.बाजार समित्या बंद असताना कशी होणार आश्‍वासनांची पूर्तता?राजकीय नेत्यांप्रमाणेच पोकळ आश्‍वासन देत असताना २९ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर, असे पाच दिवस बाजार समित्या बंद राहणार असल्याचा जिल्हा प्रशासनाला सपशेल विसर पडला. ऐन दिवाळी, भाऊबीज यासारख्या मोठय़ा सणांदरम्यान निच्चांकी दर मिळण्यासोबतच सोयाबीनची विक्री करणे अशक्य होत असल्याने शेतकर्‍यांची सद्य:स्थिती मात्र अत्यंत दयनिय झाली आहे.