शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

निधर्मी राज्यात सरकारी हिंदुहृदयसम्राट?

By admin | Updated: July 1, 2016 11:36 IST

एस.टी. ने प्रवास करताना केवळ एक रुपया विम्याची रक्कम भरून अपघातात मृत्यू झाल्यास वारसांना १० लाख रुपयांची भरपाई देण्यासाठी सरकारने सुरु केलेल्या योजनेचा जनतेने लाभ घ्यावा.

- अजित गोगटे
बुधवारच्या वृत्तपत्रांत महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी महासंचालनालयातर्फे दिलेली एस.टी. महामंडळाची एक जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. एस.टी. ने प्रवास करताना केवळ एक रुपया विम्याची रक्कम भरून अपघातात मृत्यू झाल्यास वारसांना १० लाख रुपयांची भरपाई देण्यासाठी सरकारने सुरु केलेल्या योजनेचा जनतेने लाभ घ्यावा, असे आवाहान या जाहिरातीत आहे. जाहिरातीत या योजनेचे नाव ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अपघात सहाय्यता योजना’ असे दिले आहे. एस.टी. महामंडळ ज्या परिवहन खात्याच्या अखत्यारित येते त्या खात्याचे मंत्री शिवसेनेचे दिवाकर रावते आहेत. मुळात या योजनेचे अधिकृत नाव असे आहे की नाही याविषयीही शंका येते. पण ते तसेच असेल तर सरकारी योजनेच्या नावात ‘हिंदुहृदयसम्राट’ असा उल्लेख कसा काय असू शकतो, असा प्रश्न उपस्थित होतो. राज्यघटनेनुसार सरकार धर्मनिरपेक्ष आहे व या राज्यघटनेचे पालन करण्याची शपथ घेऊन मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री राज्यकारभार करीत आहेत. मते मिळविण्यासाठी शिवसेनेने हिंदुत्वाची कास धरली असली तरी राजकीय पक्ष म्हणून मान्यता शाबूत ठेवण्यासाठी आपली ध्येयधोरणे धर्मनिरपेक्ष असल्याचे शपथपत्र खुद्द शिवसेने निवडणूक आयोगाकडे दिले आहे. त़्यामुळे शिवसेना पक्ष आणि तमाम शिवसैनिकांसाठी बाळासाहेब ठाकरे हे ‘हिंदुहृदयसम्राट’ असले तरी सरकारी योजनेच्या नावात ही बिरुदावली वापरणे चुकीचे आहे. अर्थात आपली पक्षीय बांधिलकी सरकारी पैशाने मिरविण्याचा हा दोष केवळ शिवसेनेला किंवा राज्यातील सध्याच्या युती सरकारला येण्यात अर्थ नाही. देशातील तमाम लहानथोरांना मोहनदास करमचंद गांधी हे ‘महात्मा गांधी’ म्हणून माहित असले व त्यांना ‘राष्ट्रपिता’ मानणे पिढीजात अंगवळणी पडले असले तरी यापैकी कोणतीही उपाधी त्यांना सरकारने कधीही दिलेली नाही, असे केंद्र सरकारनेच स्पष्ट केले आहे. असे असूनही केंद्र सरकारतर्फे देशभर राबविल्या जाणाºया रोजगार हमी योजनेच्या नावात ‘महात्मा गांधी’ आहेत. अल्पसंख्य विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेच्या नावात अबुल कलाम आझाद यांच्यामागे ‘मौलाना’ आहे व स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री वल्लभभाई पटेल सरकारी दफ्तरात ‘सरदार’ आहेत. निवडणुकीत मतदारांचा कौल मिळाल्यानंतर सत्तेवर बसताना पक्षीय अभिनिवेशाची पगडी उतरवून ठेवण्यासाठी एक वेगळ्याच उच्चतेची प्रगल्भता लागते. पण एकाच माळेचे मणी असलेल्या राजकारण्यांकडून, अशी अपेक्षा तरी कशी ठेवावी?