शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

निधर्मी राज्यात सरकारी हिंदुहृदयसम्राट?

By admin | Updated: July 1, 2016 11:36 IST

एस.टी. ने प्रवास करताना केवळ एक रुपया विम्याची रक्कम भरून अपघातात मृत्यू झाल्यास वारसांना १० लाख रुपयांची भरपाई देण्यासाठी सरकारने सुरु केलेल्या योजनेचा जनतेने लाभ घ्यावा.

- अजित गोगटे
बुधवारच्या वृत्तपत्रांत महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी महासंचालनालयातर्फे दिलेली एस.टी. महामंडळाची एक जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. एस.टी. ने प्रवास करताना केवळ एक रुपया विम्याची रक्कम भरून अपघातात मृत्यू झाल्यास वारसांना १० लाख रुपयांची भरपाई देण्यासाठी सरकारने सुरु केलेल्या योजनेचा जनतेने लाभ घ्यावा, असे आवाहान या जाहिरातीत आहे. जाहिरातीत या योजनेचे नाव ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अपघात सहाय्यता योजना’ असे दिले आहे. एस.टी. महामंडळ ज्या परिवहन खात्याच्या अखत्यारित येते त्या खात्याचे मंत्री शिवसेनेचे दिवाकर रावते आहेत. मुळात या योजनेचे अधिकृत नाव असे आहे की नाही याविषयीही शंका येते. पण ते तसेच असेल तर सरकारी योजनेच्या नावात ‘हिंदुहृदयसम्राट’ असा उल्लेख कसा काय असू शकतो, असा प्रश्न उपस्थित होतो. राज्यघटनेनुसार सरकार धर्मनिरपेक्ष आहे व या राज्यघटनेचे पालन करण्याची शपथ घेऊन मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री राज्यकारभार करीत आहेत. मते मिळविण्यासाठी शिवसेनेने हिंदुत्वाची कास धरली असली तरी राजकीय पक्ष म्हणून मान्यता शाबूत ठेवण्यासाठी आपली ध्येयधोरणे धर्मनिरपेक्ष असल्याचे शपथपत्र खुद्द शिवसेने निवडणूक आयोगाकडे दिले आहे. त़्यामुळे शिवसेना पक्ष आणि तमाम शिवसैनिकांसाठी बाळासाहेब ठाकरे हे ‘हिंदुहृदयसम्राट’ असले तरी सरकारी योजनेच्या नावात ही बिरुदावली वापरणे चुकीचे आहे. अर्थात आपली पक्षीय बांधिलकी सरकारी पैशाने मिरविण्याचा हा दोष केवळ शिवसेनेला किंवा राज्यातील सध्याच्या युती सरकारला येण्यात अर्थ नाही. देशातील तमाम लहानथोरांना मोहनदास करमचंद गांधी हे ‘महात्मा गांधी’ म्हणून माहित असले व त्यांना ‘राष्ट्रपिता’ मानणे पिढीजात अंगवळणी पडले असले तरी यापैकी कोणतीही उपाधी त्यांना सरकारने कधीही दिलेली नाही, असे केंद्र सरकारनेच स्पष्ट केले आहे. असे असूनही केंद्र सरकारतर्फे देशभर राबविल्या जाणाºया रोजगार हमी योजनेच्या नावात ‘महात्मा गांधी’ आहेत. अल्पसंख्य विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेच्या नावात अबुल कलाम आझाद यांच्यामागे ‘मौलाना’ आहे व स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री वल्लभभाई पटेल सरकारी दफ्तरात ‘सरदार’ आहेत. निवडणुकीत मतदारांचा कौल मिळाल्यानंतर सत्तेवर बसताना पक्षीय अभिनिवेशाची पगडी उतरवून ठेवण्यासाठी एक वेगळ्याच उच्चतेची प्रगल्भता लागते. पण एकाच माळेचे मणी असलेल्या राजकारण्यांकडून, अशी अपेक्षा तरी कशी ठेवावी?