शहरं
Join us  
Trending Stories
1
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
2
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
3
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
4
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
5
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
6
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
7
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
8
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
9
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
10
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
11
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
12
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
13
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
14
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
15
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
16
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
17
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
18
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
19
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
20
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं

सरकार वाट चुकल्यासारखं वागायला लागलंय

By admin | Updated: May 29, 2017 03:22 IST

महाराष्ट्रापुढे पाणी आणि वाढते नागरीकरण हे दोन मुख्य जटील प्रश्न आहेत. कचरा, पाणी हे मूलभूत प्र्रश्न सोडविण्याऐवजी स्मार्ट सिटीच्या

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : महाराष्ट्रापुढे पाणी आणि वाढते नागरीकरण हे दोन मुख्य जटील प्रश्न आहेत. कचरा, पाणी हे मूलभूत प्र्रश्न सोडविण्याऐवजी स्मार्ट सिटीच्या भंपकपणावर सरकार भर देते आहे. वाढत्या नागरिकरणामुळे कचऱ्याचा प्र्रश्न गंभीर रूप धारण करीत आहे. मात्र त्याकडे गांभीर्याने पाहिजे जात नाही. त्याकडे लक्ष देण्याऐवजी सरकार वाट चुकल्यासारखं वागायला लागलंय, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी केली.बाळासाहेब भारदे स्मृती पुरस्कार पाणलोट क्षेत्र विकासाचे प्रणेते विजय बोराडे, ज्येष्ठ कीर्तनकारक हभप रामदासमहाराज, मृदाशास्त्रज्ञ डॉ. एम. सी. मन्ना यांना पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या वेळी सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी, माजी आमदार उल्हास पवार उपस्थित होते.चव्हाण म्हणाले, ‘पाश्चात्य देशांचे अनुकरून करून स्मार्ट सिटीची संकल्पना आणण्यात आली आहे. या संकल्पनेला मी सुरुवातीपासून विरोध केला आहे. पाश्चात्य देशांमध्ये विकसित शहरांना तंत्रज्ञानावर आधारीत आणखी चांगल्या सुविधा पुरविण्यासाठी स्मार्ट सिटीची संकल्पना राबविण्यात येऊ लागली. आपल्याकडे कचरा, पाणी अशा मूलभूत समस्या सुटलेल्या नसताना स्मार्ट सिटीची स्पर्धा राबवून शहर स्मार्ट करण्याच्या मागे धावले जात आहे.’साखळी सिमेंटचे बंधारे बांधण्याची संकल्पना जलयुक्त ग्राम योजना या नावाने आमच्या सरकारने सुरू केली. मात्र याच योजनेचे नाव ‘जलयुक्त शिवार योजना’ असे करून तिचे मोठ्या प्रमाणात मार्केटिंग केले जात आहे. त्यामध्ये अशास्त्रीय पद्धतीने खोलीकरण केले जात आहे. जंगलतोड मोठ्या प्रमाणात वाढली आहे, अशी टीका चव्हाण त्यांनी केली.रामदास महाजन म्हणाले, ‘संत सांप्रदायामध्ये लाडूचा व झाडूचा विचार सांगणारे असे दोन पंथ आहेत. गाडगेमहाराज आणि कैकाडीमहाराज यांनी गावागावांमधून प्रबोधनाचा विचार पुढे नेला. प्रबोधनाचे विचार मांडणाऱ्या सर्व कीर्तनकारांना एकत्र आणण्यासाठी संत भारती ही संकल्पना बाळासाहेब भारदे यांनी मांडली होती. मात्र ती काही कारणाने पूर्णत्वास जाऊ शकली नाही. आगामी काळात ती पुढे नेण्यासाठी ट्रस्टने पुढाकार घ्यावा.’ विजय बोराडे म्हणाले, ‘जलयुक्त शिवार या योजनेतून पाणलोट क्षेत्र विकास हा शब्दच गायब झाला आहे. मृदासंधारणावर आधारीत पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम राबविणे आवश्यक असताना जलयुक्त शिवार योजनेत अशास्त्रीय पद्धतीने खोलीकरणावर भर दिला जात आहे.’’ काश्मीरमधील  परिस्थिती गंभीरश्रीनगरचा काँग्रेस पक्षाचा प्रभारी म्हणून मी काम केले आहे. पक्षाच्या एका कार्यक्रमासाठी मी काल श्रीनगरला गेलो होतो. पूर्वीच्या तुलनेत कश्मीरमधील परिस्थिती खूपच गंभीर बनल्याचे चित्र दिसून आले. शाळकरी मुले हातात दगड उचलून फेकत आहेत. नोटा बदलल्या म्हणजे दहशतवाद संपेल, कश्मीरचा प्रश्न सुटेल या भ्रमात मोदी सरकार वावरत होते, ते खोटे ठरले आहे अशी जोरदार टिका पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी केली.