शहरं
Join us  
Trending Stories
1
"...मग बाकीच्या मराठ्यांचं काय? त्यांचा विचार कोण करणार?", विनोद पाटलांनी दाखवले आकडे
2
Video: अवैध कामावर कारवाई करणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्यालाच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खडसावलं
3
Amit Mishra Retirement : लेट निवृत्तीसह IPL हॅटट्रिक किंगनं क्रिकेटच्या देवालाही टाकलं मागे
4
"राजवटींचा काळ संपला; तुम्ही भारत, चीनसोबत असं बोलू शकत नाही"; पुतीन यांनी ट्रम्प यांना सुनावलं
5
"...यापुढे दक्षिण मुंबईत आंदोलनावर निर्बंध आणावेत"; शिंदेसेनेच्या खासदाराचं CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
6
VIDEO: पुतिन यांच्या भेटीनंतर किम जोंगच्या कर्मचाऱ्यांनी सर्व DNA पुरावे अन् बोटांचे ठसे पुसून टाकले
7
Shikhar Dhawan Summoned By ED : शिखर धवन ईडीच्या रडारवर; Betting App प्रकरणात होणार कसून चौकशी
8
'बेकायदेशीरपणे झाडे तोडल्यामुळे आपत्ती आली', पूर आणि भूस्खलनावर सर्वोच्च न्यायालयाची कडक टिप्पणी
9
मृत्यू पंचकात खग्रास चंद्रग्रहण २०२५: सूतक काल कधी? काय करावे अन् काय करू नये; पाहा, नियम
10
४२ दिवसांत तब्बल १२ वेळा मुलीला चावला साप; पण नेमकं कारण तरी काय? डॉक्टर म्हणाले...
11
Palmistry: नशिबात राजयोग आहे की नाही, हे तळहाताच्या 'या' चिन्हावरुन ओळखू शकता!
12
राहुल गांधी यांच्या हायड्रोजन बॉम्बमध्ये नेमकं आहे काय? तो फुटणार कुठे, समोर येतेय अशी माहिती  
13
GST Rate Change: Activa, स्प्लेंडर, पल्सर.., GST बदलल्यानं कोणती बाईक-स्कुटी होणार स्वस्त, कोणती महागणार? जाणून घ्या
14
रात्रभर अभ्यास केला, सकाळी मृतावस्थेत आढळला; IIT च्या विद्यार्थ्याचा परिक्षेच्या आदल्या दिवशी मृत्यू
15
GST मधील कपातीमुळे शैक्षणिक फीसुद्धा कमी होणार?; शालेय साहित्य स्वस्त दरात मिळणार
16
'WhatsApp' वर मोठा धोका! केंद्र सरकारने दिला इशारा, अपडेट करण्याचा दिला सल्ला
17
GST Rate Cut: कार आणि बाईक झाल्या स्वस्त; पण Anand Mahindra यांनी केली आणखी एक मागणी...
18
मृत्यू पंचक २०२५: अनंत चतुर्दशी, चंद्रग्रहणात अशुभाची छाया; चुकूनही ‘ही’ कामे करू नका!
19
Anant Chaturdashi 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी अनंत चतुर्दशीपासून २१ दिवस म्हणा 'हे' पॉवरफुल स्तोत्र!
20
Duleep Trophy 2025 Semi Final : यशस्वीचा अयशस्वी डाव; ऋतुराजच्या भात्यातून दिलासा देणारी 'फिफ्टी'

सरकार वाट चुकल्यासारखं वागायला लागलंय

By admin | Updated: May 29, 2017 03:22 IST

महाराष्ट्रापुढे पाणी आणि वाढते नागरीकरण हे दोन मुख्य जटील प्रश्न आहेत. कचरा, पाणी हे मूलभूत प्र्रश्न सोडविण्याऐवजी स्मार्ट सिटीच्या

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : महाराष्ट्रापुढे पाणी आणि वाढते नागरीकरण हे दोन मुख्य जटील प्रश्न आहेत. कचरा, पाणी हे मूलभूत प्र्रश्न सोडविण्याऐवजी स्मार्ट सिटीच्या भंपकपणावर सरकार भर देते आहे. वाढत्या नागरिकरणामुळे कचऱ्याचा प्र्रश्न गंभीर रूप धारण करीत आहे. मात्र त्याकडे गांभीर्याने पाहिजे जात नाही. त्याकडे लक्ष देण्याऐवजी सरकार वाट चुकल्यासारखं वागायला लागलंय, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी केली.बाळासाहेब भारदे स्मृती पुरस्कार पाणलोट क्षेत्र विकासाचे प्रणेते विजय बोराडे, ज्येष्ठ कीर्तनकारक हभप रामदासमहाराज, मृदाशास्त्रज्ञ डॉ. एम. सी. मन्ना यांना पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या वेळी सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी, माजी आमदार उल्हास पवार उपस्थित होते.चव्हाण म्हणाले, ‘पाश्चात्य देशांचे अनुकरून करून स्मार्ट सिटीची संकल्पना आणण्यात आली आहे. या संकल्पनेला मी सुरुवातीपासून विरोध केला आहे. पाश्चात्य देशांमध्ये विकसित शहरांना तंत्रज्ञानावर आधारीत आणखी चांगल्या सुविधा पुरविण्यासाठी स्मार्ट सिटीची संकल्पना राबविण्यात येऊ लागली. आपल्याकडे कचरा, पाणी अशा मूलभूत समस्या सुटलेल्या नसताना स्मार्ट सिटीची स्पर्धा राबवून शहर स्मार्ट करण्याच्या मागे धावले जात आहे.’साखळी सिमेंटचे बंधारे बांधण्याची संकल्पना जलयुक्त ग्राम योजना या नावाने आमच्या सरकारने सुरू केली. मात्र याच योजनेचे नाव ‘जलयुक्त शिवार योजना’ असे करून तिचे मोठ्या प्रमाणात मार्केटिंग केले जात आहे. त्यामध्ये अशास्त्रीय पद्धतीने खोलीकरण केले जात आहे. जंगलतोड मोठ्या प्रमाणात वाढली आहे, अशी टीका चव्हाण त्यांनी केली.रामदास महाजन म्हणाले, ‘संत सांप्रदायामध्ये लाडूचा व झाडूचा विचार सांगणारे असे दोन पंथ आहेत. गाडगेमहाराज आणि कैकाडीमहाराज यांनी गावागावांमधून प्रबोधनाचा विचार पुढे नेला. प्रबोधनाचे विचार मांडणाऱ्या सर्व कीर्तनकारांना एकत्र आणण्यासाठी संत भारती ही संकल्पना बाळासाहेब भारदे यांनी मांडली होती. मात्र ती काही कारणाने पूर्णत्वास जाऊ शकली नाही. आगामी काळात ती पुढे नेण्यासाठी ट्रस्टने पुढाकार घ्यावा.’ विजय बोराडे म्हणाले, ‘जलयुक्त शिवार या योजनेतून पाणलोट क्षेत्र विकास हा शब्दच गायब झाला आहे. मृदासंधारणावर आधारीत पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम राबविणे आवश्यक असताना जलयुक्त शिवार योजनेत अशास्त्रीय पद्धतीने खोलीकरणावर भर दिला जात आहे.’’ काश्मीरमधील  परिस्थिती गंभीरश्रीनगरचा काँग्रेस पक्षाचा प्रभारी म्हणून मी काम केले आहे. पक्षाच्या एका कार्यक्रमासाठी मी काल श्रीनगरला गेलो होतो. पूर्वीच्या तुलनेत कश्मीरमधील परिस्थिती खूपच गंभीर बनल्याचे चित्र दिसून आले. शाळकरी मुले हातात दगड उचलून फेकत आहेत. नोटा बदलल्या म्हणजे दहशतवाद संपेल, कश्मीरचा प्रश्न सुटेल या भ्रमात मोदी सरकार वावरत होते, ते खोटे ठरले आहे अशी जोरदार टिका पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी केली.