शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

सरकारने शेतकऱ्यांना देशोधडीला लावले

By admin | Updated: May 31, 2015 01:53 IST

केंद्र व राज्यातील भाजपा सरकारने शेतकऱ्यांचा भ्रमनिरास केला आहे. उसाला, दुधाला दर देता आलेला नाही.

सातारा : केंद्र व राज्यातील भाजपा सरकारने शेतकऱ्यांचा भ्रमनिरास केला आहे. उसाला, दुधाला दर देता आलेला नाही. उलट गोहत्या बंदी व जमीन अधिग्रहणसारखा कायदे करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे हे सरकार सुटाबुटाचे व उद्योगपतीधार्जिणे आहे, अशी घणाघाती टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी केली.अजित पवार हे सातारा जिल्हा दौऱ्यावर आले असताना येथील विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, सुरुवातीच्या काळात आम्ही त्यांच्या कामावर कोणतीही टीका केली नाही. कारण आम्ही राज्यात १५ वर्षे व केंद्रात १० वर्षे सत्तेवर होतो. त्यामुळे या सरकारलाही सहा महिने ते एक वर्ष देण्याची गरज होती. मात्र, मोदी सरकारला एक वर्ष झाले तरी समाधानकारक काम करता आलेले नाही. राज्यातील जनतेने फडणवीस सरकारचा सहा महिन्यांचा व मोदी सरकारचा एक वर्षाचा कारभार पाहिला आहे. जी स्वप्ने त्यांनी निवडणुकीवेळी दाखविली ती पूर्ण झालेली नाहीत. उसाच्या दराचा प्रश्न महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसमोर आहे. राज्य सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बिनव्याजी दोन हजार कोटी रुपये देतो, असे सांगितले आहे. मात्र, तेही अद्याप दिलेले नाहीत. केंद्राने साखरेचा बफरस्टॉक करायला पाहिजे होता, तो केलेला नाही. युपीए सरकार असताना एक्स्पोर्ट सबसिडी देणे किंवा ६ हजार ६०० कोटी रुपये बिनव्याजी उपलब्ध करून देणे, असे कोणतेही काम भाजपा सरकारने केलेले नाही, असे सांगून ते म्हणाले, आमचे सरकार असताना शेतकऱ्याला दुधाला २५ ते २६ रुपये दर दिला आहे. आता शेतकऱ्याला १८ ते १९ रुपये दर मिळत आहे. (प्रतिनिधी)विरोधाभासाचे सरकारभाजपा म्हणतेय आम्ही जैतापूरचा प्रकल्प करणार, तर शिवसेनेचे नेते म्हणतात, आम्ही हा प्रकल्प होऊ देणार नाही. निवडणुकीपूर्वी भाजपाच्या नेत्यांनी टोलमुक्तीचे आश्वासन दिले होते. आता केंद्रीय मंत्री अनंत गीते म्हणतात, गोवा-मुुंबई रस्त्याला टोल द्यावाच लागेल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणतात, टोल बंद होऊच शकत नाही. एवढा मोठा विरोधाभास भाजप-शिवसेना तसेच त्यांच्या राष्ट्रीय नेत्यांमध्ये असल्याची खिल्लीही पवार यांनी उडविली.