शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

सरकारने शेतकऱ्यांना देशोधडीला लावले

By admin | Updated: May 31, 2015 01:53 IST

केंद्र व राज्यातील भाजपा सरकारने शेतकऱ्यांचा भ्रमनिरास केला आहे. उसाला, दुधाला दर देता आलेला नाही.

सातारा : केंद्र व राज्यातील भाजपा सरकारने शेतकऱ्यांचा भ्रमनिरास केला आहे. उसाला, दुधाला दर देता आलेला नाही. उलट गोहत्या बंदी व जमीन अधिग्रहणसारखा कायदे करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे हे सरकार सुटाबुटाचे व उद्योगपतीधार्जिणे आहे, अशी घणाघाती टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी केली.अजित पवार हे सातारा जिल्हा दौऱ्यावर आले असताना येथील विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, सुरुवातीच्या काळात आम्ही त्यांच्या कामावर कोणतीही टीका केली नाही. कारण आम्ही राज्यात १५ वर्षे व केंद्रात १० वर्षे सत्तेवर होतो. त्यामुळे या सरकारलाही सहा महिने ते एक वर्ष देण्याची गरज होती. मात्र, मोदी सरकारला एक वर्ष झाले तरी समाधानकारक काम करता आलेले नाही. राज्यातील जनतेने फडणवीस सरकारचा सहा महिन्यांचा व मोदी सरकारचा एक वर्षाचा कारभार पाहिला आहे. जी स्वप्ने त्यांनी निवडणुकीवेळी दाखविली ती पूर्ण झालेली नाहीत. उसाच्या दराचा प्रश्न महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसमोर आहे. राज्य सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बिनव्याजी दोन हजार कोटी रुपये देतो, असे सांगितले आहे. मात्र, तेही अद्याप दिलेले नाहीत. केंद्राने साखरेचा बफरस्टॉक करायला पाहिजे होता, तो केलेला नाही. युपीए सरकार असताना एक्स्पोर्ट सबसिडी देणे किंवा ६ हजार ६०० कोटी रुपये बिनव्याजी उपलब्ध करून देणे, असे कोणतेही काम भाजपा सरकारने केलेले नाही, असे सांगून ते म्हणाले, आमचे सरकार असताना शेतकऱ्याला दुधाला २५ ते २६ रुपये दर दिला आहे. आता शेतकऱ्याला १८ ते १९ रुपये दर मिळत आहे. (प्रतिनिधी)विरोधाभासाचे सरकारभाजपा म्हणतेय आम्ही जैतापूरचा प्रकल्प करणार, तर शिवसेनेचे नेते म्हणतात, आम्ही हा प्रकल्प होऊ देणार नाही. निवडणुकीपूर्वी भाजपाच्या नेत्यांनी टोलमुक्तीचे आश्वासन दिले होते. आता केंद्रीय मंत्री अनंत गीते म्हणतात, गोवा-मुुंबई रस्त्याला टोल द्यावाच लागेल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणतात, टोल बंद होऊच शकत नाही. एवढा मोठा विरोधाभास भाजप-शिवसेना तसेच त्यांच्या राष्ट्रीय नेत्यांमध्ये असल्याची खिल्लीही पवार यांनी उडविली.