शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
4
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
5
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
6
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
7
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
8
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
9
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
11
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
12
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
13
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
14
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
15
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
16
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
17
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
18
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
19
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
20
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी

सरकारने शेतकऱ्यांना देशोधडीला लावले

By admin | Updated: May 31, 2015 01:53 IST

केंद्र व राज्यातील भाजपा सरकारने शेतकऱ्यांचा भ्रमनिरास केला आहे. उसाला, दुधाला दर देता आलेला नाही.

सातारा : केंद्र व राज्यातील भाजपा सरकारने शेतकऱ्यांचा भ्रमनिरास केला आहे. उसाला, दुधाला दर देता आलेला नाही. उलट गोहत्या बंदी व जमीन अधिग्रहणसारखा कायदे करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे हे सरकार सुटाबुटाचे व उद्योगपतीधार्जिणे आहे, अशी घणाघाती टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी केली.अजित पवार हे सातारा जिल्हा दौऱ्यावर आले असताना येथील विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, सुरुवातीच्या काळात आम्ही त्यांच्या कामावर कोणतीही टीका केली नाही. कारण आम्ही राज्यात १५ वर्षे व केंद्रात १० वर्षे सत्तेवर होतो. त्यामुळे या सरकारलाही सहा महिने ते एक वर्ष देण्याची गरज होती. मात्र, मोदी सरकारला एक वर्ष झाले तरी समाधानकारक काम करता आलेले नाही. राज्यातील जनतेने फडणवीस सरकारचा सहा महिन्यांचा व मोदी सरकारचा एक वर्षाचा कारभार पाहिला आहे. जी स्वप्ने त्यांनी निवडणुकीवेळी दाखविली ती पूर्ण झालेली नाहीत. उसाच्या दराचा प्रश्न महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसमोर आहे. राज्य सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बिनव्याजी दोन हजार कोटी रुपये देतो, असे सांगितले आहे. मात्र, तेही अद्याप दिलेले नाहीत. केंद्राने साखरेचा बफरस्टॉक करायला पाहिजे होता, तो केलेला नाही. युपीए सरकार असताना एक्स्पोर्ट सबसिडी देणे किंवा ६ हजार ६०० कोटी रुपये बिनव्याजी उपलब्ध करून देणे, असे कोणतेही काम भाजपा सरकारने केलेले नाही, असे सांगून ते म्हणाले, आमचे सरकार असताना शेतकऱ्याला दुधाला २५ ते २६ रुपये दर दिला आहे. आता शेतकऱ्याला १८ ते १९ रुपये दर मिळत आहे. (प्रतिनिधी)विरोधाभासाचे सरकारभाजपा म्हणतेय आम्ही जैतापूरचा प्रकल्प करणार, तर शिवसेनेचे नेते म्हणतात, आम्ही हा प्रकल्प होऊ देणार नाही. निवडणुकीपूर्वी भाजपाच्या नेत्यांनी टोलमुक्तीचे आश्वासन दिले होते. आता केंद्रीय मंत्री अनंत गीते म्हणतात, गोवा-मुुंबई रस्त्याला टोल द्यावाच लागेल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणतात, टोल बंद होऊच शकत नाही. एवढा मोठा विरोधाभास भाजप-शिवसेना तसेच त्यांच्या राष्ट्रीय नेत्यांमध्ये असल्याची खिल्लीही पवार यांनी उडविली.