शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

सरकार उच्च न्यायालयात जाणार, एफडीएतील बदल्या; मॅटच्या स्थगिती आदेशावर अपील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 05:37 IST

एफडीएमध्ये वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या १२ अधिका-यांच्या बदल्या अन्न व औषधी प्रशासन विभागाचे मंत्री गिरीश बापट यांनी केल्या. मात्र काही अधिका-यांनी मॅटमध्ये जाऊन या बदल्यांना स्थगिती मिळवल्याने त्या आदेशाच्या विरोधात आता राज्य सरकार उच्च न्यायालयात जाणार आहे.

अतुल कुलकर्णी मुंबई : एफडीएमध्ये वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या १२ अधिका-यांच्या बदल्या अन्न व औषधी प्रशासन विभागाचे मंत्री गिरीश बापट यांनी केल्या. मात्र काही अधिका-यांनी मॅटमध्ये जाऊन या बदल्यांना स्थगिती मिळवल्याने त्या आदेशाच्या विरोधात आता राज्य सरकार उच्च न्यायालयात जाणार आहे.तब्बल २० ते २२ वर्षे ठाणे-मुंबईत ठाण मांडून बसलेल्या या विभागातील डझनभर सहायक आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या. बदली आदेशात सविस्तर संदर्भ दिले गेले. एफडीएच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या लोकमत-झगडे समितीच्या शिफारशी स्वीकारण्यात आल्यामुळे बदल्यांचे आदेश काढण्यात येत आहेत, असे प्रत्येक अधिकाºयाच्या बदली आदेशात नमूद केले गेले. या निर्णयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मान्यता घेण्यात आली. त्यानंतर काही अधिकारी मॅटमध्ये गेले. त्यातल्या काही अधिकाºयांच्या बदल्यांना मॅटने स्थगिती दिल्यानंतर विधि व न्याय विभागाकडे स्वत: मुख्यमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रशासनिक बदल्या या मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने झाल्याचे शपथपत्र सादर केले गेले; पण त्याआधीच मॅटने स्थगिती दिल्याने सरकारने आता उच्च न्यायालयात जाण्याचे ठरवले आहे.दरम्यान, काही अधिका-यांना एफडीए प्रशासनाने कार्यमुक्तच केले नसल्याचेही समोर आल्याने विभागाचे मंत्री बापट यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच ज्यांच्या बदल्या झाल्या त्यांना तातडीने कार्यमुक्त करण्याचे आदेश आपण दिले होते, आदेशाचे पालन होत नसेल तर कठोर भूमिका घ्यावी लागेल, असे बापट ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले. ज्या १२ अधिकाºयांच्या बदल्या झाल्या पण ते कार्यमुक्त झाले नाहीत, अशांमध्ये रा. ना. तिरपुडे, नि. मो. गांधी, वि. अ. कोसे, प्र. मा. राऊत या चौघांचा समावेश आहे. मंत्री कार्यालयात काही अधिका-यांनी उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती जमा केल्याच्या तक्रारी आल्याचे व त्या तक्रारी चौकशीसाठी एसीबीकडे पाठवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. बदली आदेश पाळायचे नाहीत, त्याविरुद्ध मॅटकडे जायचे आणि मुंबई, ठाण्यातल्या जागा अडवून धरायच्या या गोष्टी यापुढे खपवून घेतल्या जाणार नाहीत अशी कणखर भूमिका विभागाने घ्यायचे ठरवल्याचे एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले.