शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

सरकारला ज्येष्ठ नागरिकांचा विसर

By admin | Updated: November 1, 2015 00:53 IST

भाजपा सरकार महाराष्ट्रात वर्षपूर्ती साजरी करत आहे, पण या काळात सरकारला ज्येष्ठ नागरिकांचा विसर पडला आहे, असा आरोप ज्येष्ठ नागरिक कृती समितीसह ज्येष्ठांच्या

- नामदेव मोरे , नवी मुंबईभाजपा सरकार महाराष्ट्रात वर्षपूर्ती साजरी करत आहे, पण या काळात सरकारला ज्येष्ठ नागरिकांचा विसर पडला आहे, असा आरोप ज्येष्ठ नागरिक कृती समितीसह ज्येष्ठांच्या महाराष्ट्र व अखिल भारतीय संघटनेने केला आहे. या संघटनेने वर्षभरामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेट मिळावी, यासाठी सात पत्रे दिली आहेत, परंतु पूर्ण वर्षात मुख्यमंत्र्यांना त्यांच्यासाठी वेळच मिळू शकलेला नाही. वर्षपूर्तीच्या काळात सरकारला राज्यातील १ कोटी ११ लाख ज्येष्ठ नागरिकांचा विसर पडला असल्याचे ज्येष्ठ नागरिक महासंघाचे संस्थापक एस.पी. किंजवडेकर यांनी सांगितले. निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ नागरिक महासंघाचे संस्थापक एस.पी. किंजवडेकर व त्यांच्या सहकाऱ्यांची भेट घेऊन, राज्यातील ज्येष्ठांच्या समस्या ऐकल्या होत्या. त्या वेळी त्यांनी प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते. पक्षाच्या जाहीरनाम्यातही ज्येष्ठ नागरिक धोरणाचा समावेश केला होता. फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्यानंतर महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाने ७ आॅक्टोबर २०१५ रोजी त्यांना पत्र पाठवून राज्यातील ज्येष्ठ नागरिक धोरणात सुधारणा करण्यात यावी व इतर प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी भेटीची वेळ मागितली, परंतु मुख्यमंत्र्यांनी पत्राचे साधे उत्तरही दिले नाही. वारंवार भेट मिळावी, यासाठी पाठपुरावा केला, पण या पदाधिकाऱ्यांना भेटण्याचे सौजन्यही दाखविलेले नाही. केंद्रामध्ये पी. चिदंबरम अर्थमंत्री असताना वृद्धाश्रम उभारण्यासाठी २०० कोटी रुपयांची तरतूद केली होती, परंतु अद्याप एकही वृद्धाश्रम उभा राहिला नाही. राज्य सरकारही वृद्धाश्रमांसाठी ठोस कार्यवाही करत नाही. त्यामुळे हे ‘अच्छे दिन’ आमच्यासाठी नव्हेत, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.