शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

सरकारला ज्येष्ठ नागरिकांचा विसर

By admin | Updated: November 1, 2015 00:53 IST

भाजपा सरकार महाराष्ट्रात वर्षपूर्ती साजरी करत आहे, पण या काळात सरकारला ज्येष्ठ नागरिकांचा विसर पडला आहे, असा आरोप ज्येष्ठ नागरिक कृती समितीसह ज्येष्ठांच्या

- नामदेव मोरे , नवी मुंबईभाजपा सरकार महाराष्ट्रात वर्षपूर्ती साजरी करत आहे, पण या काळात सरकारला ज्येष्ठ नागरिकांचा विसर पडला आहे, असा आरोप ज्येष्ठ नागरिक कृती समितीसह ज्येष्ठांच्या महाराष्ट्र व अखिल भारतीय संघटनेने केला आहे. या संघटनेने वर्षभरामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेट मिळावी, यासाठी सात पत्रे दिली आहेत, परंतु पूर्ण वर्षात मुख्यमंत्र्यांना त्यांच्यासाठी वेळच मिळू शकलेला नाही. वर्षपूर्तीच्या काळात सरकारला राज्यातील १ कोटी ११ लाख ज्येष्ठ नागरिकांचा विसर पडला असल्याचे ज्येष्ठ नागरिक महासंघाचे संस्थापक एस.पी. किंजवडेकर यांनी सांगितले. निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ नागरिक महासंघाचे संस्थापक एस.पी. किंजवडेकर व त्यांच्या सहकाऱ्यांची भेट घेऊन, राज्यातील ज्येष्ठांच्या समस्या ऐकल्या होत्या. त्या वेळी त्यांनी प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते. पक्षाच्या जाहीरनाम्यातही ज्येष्ठ नागरिक धोरणाचा समावेश केला होता. फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्यानंतर महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाने ७ आॅक्टोबर २०१५ रोजी त्यांना पत्र पाठवून राज्यातील ज्येष्ठ नागरिक धोरणात सुधारणा करण्यात यावी व इतर प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी भेटीची वेळ मागितली, परंतु मुख्यमंत्र्यांनी पत्राचे साधे उत्तरही दिले नाही. वारंवार भेट मिळावी, यासाठी पाठपुरावा केला, पण या पदाधिकाऱ्यांना भेटण्याचे सौजन्यही दाखविलेले नाही. केंद्रामध्ये पी. चिदंबरम अर्थमंत्री असताना वृद्धाश्रम उभारण्यासाठी २०० कोटी रुपयांची तरतूद केली होती, परंतु अद्याप एकही वृद्धाश्रम उभा राहिला नाही. राज्य सरकारही वृद्धाश्रमांसाठी ठोस कार्यवाही करत नाही. त्यामुळे हे ‘अच्छे दिन’ आमच्यासाठी नव्हेत, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.