शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
3
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
4
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
5
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
6
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
7
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
8
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
10
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
11
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
12
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
13
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
14
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
15
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
16
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
17
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
18
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
19
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
20
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत

सरकारला बालधोरणाचा विसर

By admin | Updated: January 11, 2015 02:22 IST

सरकारला राज्याच्या पहिल्या बालधोरणाचा विसर पडल्याचे दिसते. या धोरणाचा अंतिम आराखडा तयार होऊन वर्ष उलटले, तरी त्याला अद्याप मान्यता मिळालेली नाही.

राजानंद मोरे - पुणेसरकारला राज्याच्या पहिल्या बालधोरणाचा विसर पडल्याचे दिसते. या धोरणाचा अंतिम आराखडा तयार होऊन वर्ष उलटले, तरी त्याला अद्याप मान्यता मिळालेली नाही. तसेच, बालहक्क संरक्षण आयोगाला तीन वर्षांपासून अध्यक्ष व सदस्यच मिळालेले नाहीत! बालकांच्या प्रश्नावर सरकार किती संवेदनशील आहे, हेच यावरून स्पष्ट होते.राज्यातील ० ते १८ वर्षे वयोगटातील मुलांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने २०१३ मध्ये तत्कालीन महिला व बाल कल्याणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्याचे पहिले विस्तृत बालधोरण तयार करण्यासाठी पुढाकार घेतला.महिला धोरणापाठोपाठ बालधोरणही प्रत्यक्षात येईल, अशी अपेक्षा त्या वेळी होती. बालधोरणाचा आराखडा वर्षभरापूर्वीच तयार करण्यात आला असून, मंत्रिमंडळाच्या प्रतीक्षेत आहे. मात्र, निवडणुकांची रणधुमाळी आणि त्यानंतर बदललेल्या सरकारमुळे बालधोरण अडगळीत पडल्याचे दिसते.बालधोरणाचा अंतिम आराखडा तयार करण्यात आला आहे. मात्र मधल्या काळात सरकार बदलले. त्यामुळे धोरणात काही नवीन गोष्टींचा समावेश करायचा असल्यास त्यासाठी पुन्हा बैठक घ्यावी लागेल. पुढील काही दिवसांत याबाबत निर्णय होईल.- राजेंद्र चव्हाण, आयुक्त, महिला व बालकल्याणमुलांच्या हक्कांना महत्त्व देण्याचे धोरण सरकारचे असले पाहिजे. बालधोरण किंवा बाल हक्क संरक्षण आयोगाला अध्यक्ष मिळाल्याने सर्व काही ठीक होईल, असे नाही. मात्र सध्याच्या परिस्थतीत निश्चितच बदल होईल. त्यामुळे सरकारने याची दखल घ्यायला हवी.- सूर्यकांत कुलकर्णी, माजी सदस्य, बालहक्क संरक्षण आयोगबालकांवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या बालहक्क आयोगाला मागील तीन वर्षांपासून अध्यक्ष व सदस्य मिळालेले नाही. सचिवांच्या डोक्यावर कामाचा सर्व बोजा टाकून सरकार निर्धास्त आहे. मतदारांना ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून सत्तेत आलेले नवीन सरकार बालकांसाठी कधी ‘अच्छे दिन’ आणणार का, असा प्रश्न विचारला जात आहे.