शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

सरकारला बालधोरणाचा विसर

By admin | Updated: January 11, 2015 02:22 IST

सरकारला राज्याच्या पहिल्या बालधोरणाचा विसर पडल्याचे दिसते. या धोरणाचा अंतिम आराखडा तयार होऊन वर्ष उलटले, तरी त्याला अद्याप मान्यता मिळालेली नाही.

राजानंद मोरे - पुणेसरकारला राज्याच्या पहिल्या बालधोरणाचा विसर पडल्याचे दिसते. या धोरणाचा अंतिम आराखडा तयार होऊन वर्ष उलटले, तरी त्याला अद्याप मान्यता मिळालेली नाही. तसेच, बालहक्क संरक्षण आयोगाला तीन वर्षांपासून अध्यक्ष व सदस्यच मिळालेले नाहीत! बालकांच्या प्रश्नावर सरकार किती संवेदनशील आहे, हेच यावरून स्पष्ट होते.राज्यातील ० ते १८ वर्षे वयोगटातील मुलांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने २०१३ मध्ये तत्कालीन महिला व बाल कल्याणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्याचे पहिले विस्तृत बालधोरण तयार करण्यासाठी पुढाकार घेतला.महिला धोरणापाठोपाठ बालधोरणही प्रत्यक्षात येईल, अशी अपेक्षा त्या वेळी होती. बालधोरणाचा आराखडा वर्षभरापूर्वीच तयार करण्यात आला असून, मंत्रिमंडळाच्या प्रतीक्षेत आहे. मात्र, निवडणुकांची रणधुमाळी आणि त्यानंतर बदललेल्या सरकारमुळे बालधोरण अडगळीत पडल्याचे दिसते.बालधोरणाचा अंतिम आराखडा तयार करण्यात आला आहे. मात्र मधल्या काळात सरकार बदलले. त्यामुळे धोरणात काही नवीन गोष्टींचा समावेश करायचा असल्यास त्यासाठी पुन्हा बैठक घ्यावी लागेल. पुढील काही दिवसांत याबाबत निर्णय होईल.- राजेंद्र चव्हाण, आयुक्त, महिला व बालकल्याणमुलांच्या हक्कांना महत्त्व देण्याचे धोरण सरकारचे असले पाहिजे. बालधोरण किंवा बाल हक्क संरक्षण आयोगाला अध्यक्ष मिळाल्याने सर्व काही ठीक होईल, असे नाही. मात्र सध्याच्या परिस्थतीत निश्चितच बदल होईल. त्यामुळे सरकारने याची दखल घ्यायला हवी.- सूर्यकांत कुलकर्णी, माजी सदस्य, बालहक्क संरक्षण आयोगबालकांवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या बालहक्क आयोगाला मागील तीन वर्षांपासून अध्यक्ष व सदस्य मिळालेले नाही. सचिवांच्या डोक्यावर कामाचा सर्व बोजा टाकून सरकार निर्धास्त आहे. मतदारांना ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून सत्तेत आलेले नवीन सरकार बालकांसाठी कधी ‘अच्छे दिन’ आणणार का, असा प्रश्न विचारला जात आहे.