शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी उपाययोजनांत सरकार अपयशी

By admin | Updated: April 3, 2016 03:51 IST

शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या हा देशापुढील ज्वलंत, गंभीर प्रश्न असून केंद्र व राज्य सरकार दुष्काळावर उपाययोजना करण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीका राष्ट्रवादी

कवठेमहांकाळ (जि. सांगली) : शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या हा देशापुढील ज्वलंत, गंभीर प्रश्न असून केंद्र व राज्य सरकार दुष्काळावर उपाययोजना करण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी शनिवारी केली.कवठेमहांकाळ येथील महांकाली साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर कारखान्याचे संस्थापक दिवंगत नानासाहेब सगरे यांच्या सहकार शिल्पाचे अनावरण पवार यांच्या हस्ते झाले. त्यानंतर झालेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री आमदार जयंत पाटील होते.पवार म्हणाले की, शेतकरी दुष्काळात होरपळू लागला आहे. जनावरे कत्तलखान्यात जाऊ लागली आहेत. राज्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. सिंचन योजनांची कामे रखडली आहेत. सरकारच्या नाकर्तेपणामुळे ही वेळ आली आहे. वेळप्रसंगी संघर्षाचा मार्ग पत्करू व राज्य शासनाला वठणीवर आणू. कवठेमहांकाळ या दुष्काळी तालुक्याला विकासवादी नेत्यांची फळी मिळाली. त्यातील नानासाहेब सगरे हे राजारामबापूंच्या मार्गदर्शनाखाली वाढलेले होते. जनतेसाठी धडपडणारा हा माणूस होता. त्यांनी दुष्काळी पठारावर जिद्दीने कारखाना स्थापन करून तो चालविला.आमदार जयंत पाटील म्हणाले की, आमचे सरकार असताना आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केला, परंतु हे सरकार शेतकऱ्यांचा मुळावर उठले आहे. आधी पैसे भरा, मगच पाणी, ही सरकारची भूमिका चुकीची आहे. आम्ही आमच्या हयातीत एवढे महागडे पाणी बघितले नव्हते. म्हैसाळ, टेंभू, आरफळ या योजना पूर्ण करण्याची पात्रता राज्य सरकारची नाही. डॉ. पतंगराव कदम यांनी भाजपच्या खोट्या आश्वासनांना भुलून मतदारांनी सत्ता दिली, परंतु आता सर्वांनाच त्याचा मन:स्ताप होत आहे. भविष्यात हीच जनता भाजपची सत्ता उलथवून टाकेल, असे सांगितले.विजय सगरे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी खासदार प्रभाकर कोरे, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, माजी खासदार निवेदिता माने, माजी आमदार विलासराव शिंदे, मानसिंगराव नाईक, प्रा. शरद पाटील, राजेंद्रअण्णा देशमुख, गणपतराव पाटील, अरुण लाड, गणपती सगरे, दिलीप पाटील, इलियास नायकवडी, चंद्रकांत हाक्के, ताजुद्दीन तांबोळी, सुरेश पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)पाणीपट्टी कमी करण्यासाठी पवार यांनी लक्ष घालावे : सुमनताई सिंचन योजनांची पाणीपट्टी जास्त आहे. ती कमी करण्यासाठी शरद पवार यांनी लक्ष घालावे व दुष्काळी तालुक्यांचा पाणीप्रश्न मिटवावा, अशी मागणी आमदार सुमनताई पाटील यांनी केली.