शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
3
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
4
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
5
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
6
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
7
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
8
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
9
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
10
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
11
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
12
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
13
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
14
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
15
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
16
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
17
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
18
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
19
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
20
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

दुष्काळी उपाययोजनांत सरकार अपयशी

By admin | Updated: April 3, 2016 03:51 IST

शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या हा देशापुढील ज्वलंत, गंभीर प्रश्न असून केंद्र व राज्य सरकार दुष्काळावर उपाययोजना करण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीका राष्ट्रवादी

कवठेमहांकाळ (जि. सांगली) : शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या हा देशापुढील ज्वलंत, गंभीर प्रश्न असून केंद्र व राज्य सरकार दुष्काळावर उपाययोजना करण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी शनिवारी केली.कवठेमहांकाळ येथील महांकाली साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर कारखान्याचे संस्थापक दिवंगत नानासाहेब सगरे यांच्या सहकार शिल्पाचे अनावरण पवार यांच्या हस्ते झाले. त्यानंतर झालेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री आमदार जयंत पाटील होते.पवार म्हणाले की, शेतकरी दुष्काळात होरपळू लागला आहे. जनावरे कत्तलखान्यात जाऊ लागली आहेत. राज्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. सिंचन योजनांची कामे रखडली आहेत. सरकारच्या नाकर्तेपणामुळे ही वेळ आली आहे. वेळप्रसंगी संघर्षाचा मार्ग पत्करू व राज्य शासनाला वठणीवर आणू. कवठेमहांकाळ या दुष्काळी तालुक्याला विकासवादी नेत्यांची फळी मिळाली. त्यातील नानासाहेब सगरे हे राजारामबापूंच्या मार्गदर्शनाखाली वाढलेले होते. जनतेसाठी धडपडणारा हा माणूस होता. त्यांनी दुष्काळी पठारावर जिद्दीने कारखाना स्थापन करून तो चालविला.आमदार जयंत पाटील म्हणाले की, आमचे सरकार असताना आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केला, परंतु हे सरकार शेतकऱ्यांचा मुळावर उठले आहे. आधी पैसे भरा, मगच पाणी, ही सरकारची भूमिका चुकीची आहे. आम्ही आमच्या हयातीत एवढे महागडे पाणी बघितले नव्हते. म्हैसाळ, टेंभू, आरफळ या योजना पूर्ण करण्याची पात्रता राज्य सरकारची नाही. डॉ. पतंगराव कदम यांनी भाजपच्या खोट्या आश्वासनांना भुलून मतदारांनी सत्ता दिली, परंतु आता सर्वांनाच त्याचा मन:स्ताप होत आहे. भविष्यात हीच जनता भाजपची सत्ता उलथवून टाकेल, असे सांगितले.विजय सगरे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी खासदार प्रभाकर कोरे, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, माजी खासदार निवेदिता माने, माजी आमदार विलासराव शिंदे, मानसिंगराव नाईक, प्रा. शरद पाटील, राजेंद्रअण्णा देशमुख, गणपतराव पाटील, अरुण लाड, गणपती सगरे, दिलीप पाटील, इलियास नायकवडी, चंद्रकांत हाक्के, ताजुद्दीन तांबोळी, सुरेश पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)पाणीपट्टी कमी करण्यासाठी पवार यांनी लक्ष घालावे : सुमनताई सिंचन योजनांची पाणीपट्टी जास्त आहे. ती कमी करण्यासाठी शरद पवार यांनी लक्ष घालावे व दुष्काळी तालुक्यांचा पाणीप्रश्न मिटवावा, अशी मागणी आमदार सुमनताई पाटील यांनी केली.