शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाची दुरवस्था

By admin | Updated: April 3, 2017 03:38 IST

पनवेल महापालिका हद्दीतील जुना ठाणा नाका रस्त्यावरील सरकारी वसाहतीची दुरवस्था झाली

पनवेल : पनवेल महापालिका हद्दीतील जुना ठाणा नाका रस्त्यावरील सरकारी वसाहतीची दुरवस्था झाली असून, या ठिकाणी ५२ कुटुंबे रामभरोसे राहत आहेत. सरकारी कर्मचारी असल्याने कुणाकडे तक्रार करावी, असा प्रश्न त्यांना पडला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे या वसाहतीकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. मोडकळीस आलेल्या इमारती, परिसरात अस्वच्छतेबरोबरच पाण्याच्या टाक्यांची दैना झाली असून, संरक्षण भिंतीचा तर पत्ताच नाही. ड्रेनेज लाइन तुंबल्याने सांडपाणी रस्त्यावर येत आहे, शिवाय दुर्गंधीही पसरली आहे. भटक्या प्राण्यांचा वावर आदी समस्यांमुळे परिसरातील कुटुंबे त्रस्त असून याप्रकरणी कुणाकडे दाद मागावी, असा प्रश्न त्यांना पडला आहे. रायगड जिल्हा परिषदेचा कर्मचारीवर्ग राहत असलेल्या पनवेल येथील शासकीय वसाहतीत सहा इमारतींत द्वितीय श्रेणी अधिकाऱ्यांच्या २, चतुर्थ श्रेणी अधिकाऱ्यांच्या ६ आणि तृतीय श्रेणी अधिकाऱ्यांच्या ३४ व इतर अशा एकूण ५२ खोल्या आहेत. मात्र, वसाहतीच्या दुरवस्थेमुळे रहिवाशांना जीव मुठीत घेऊन राहावे लागत आहे. दुरवस्थेबाबत परिसरातील तरुण संबंधित विभागाकडे तक्रार करण्यासाठी गेले असता, राहायचे तर राहा, नाहीतर निघून जा, असे उत्तर दिले जाते. गेल्या पाच वर्षांत इमारतीला रंगरंगोटी करण्यात आलेली नाही. येथील पाण्याची टाकी इतकी धोकादायक झाली आहे की कधीही कोसळू शकते. इमारतीला तडे गेले आहेत. रहिवाशांनी स्वखर्चाने पंपहाउस दुरुस्तीचे तसेच ड्रेनेजचे काम केले आहे. मात्र वीजबिल न भरल्यामुळे महावितरणने गेल्या महिन्यात पंपहाउसची वीज खंडित केल्याचे समजते. येथील इमारतींच्या जिन्यावर विजेची व्यवस्था नाही. वसाहतीत धूरफवारणी होत नसल्याने डासांचा प्रादूर्भाव वाढला आहे. वसाहतीला संरक्षण भिंत नसल्याने भटके प्राणी, फेरीवाल्यांचा सर्रास वावर असतो. पोलिसांनी जप्त केलेल्या गाड्याही याच परिसरात उभ्या असतात. या वसाहतीला पालिकेकडून दिवसातून अर्धा तास पाणी दिले जाते. येथे नळजोडण्या वाढवण्याची मागणीही गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. (वार्ताहर)पाण्याची टाकी झाली धोकादायकवसाहतीत पिण्याच्या पाण्याच्या टाक्या नियमित स्वच्छ केल्या जात नाही. त्यामुळे सतत आरोग्याच्या व्याधी उद्भवतात. पाणी सोडणारा कर्मचारी स्वत:च्या सोयीनुसार काम करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. इमारतीला रंगरंगोटी करण्यात आलेली नाही. येथील पाण्याची टाकी इतकी धोकादायक झाली आहे की कधीही कोसळू शकते. इमारतीला तडे गेले आहेत.