शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

सरकारने टाळला अखंड महाराष्ट्राचा ठराव!

By admin | Updated: April 14, 2016 01:11 IST

विधीमंडळ कामकाजाच्या नियमांवर बोट ठेवत शिवसेना, शेकाप आणि काँग्रेस-राष्ट्रवादीने आणलेला अखंड महाराष्ट्राचा ठराव सरकारने खुबीने टाळत स्वत:ची सुटका करून घेतली.

मुंबई : विधीमंडळ कामकाजाच्या नियमांवर बोट ठेवत शिवसेना, शेकाप आणि काँग्रेस-राष्ट्रवादीने आणलेला अखंड महाराष्ट्राचा ठराव सरकारने खुबीने टाळत स्वत:ची सुटका करून घेतली.मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, खान्देश आणि विदर्भाचा समावेश असलेला अखंड महाराष्ट्र निरंतर कायम ठेवण्याची शिफारस राज्यपाल व केंद्र शासनाकडे करण्यासंबंधीचा ठराव शिवसेनेने नियम २३ ब अंतर्गत दहा दिवसांपूर्वी विधान परिषद सभापतींकडे दिला होता. शिवाय, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, काँग्रेसचे शरद रणपिसे, संजय दत्त आणि शेकापचे जयंत पाटील यांनीही आपला स्वतंत्र ठराव दिला होता. हा ठराव सभागृहात मांडावा, अशी जोरदार मागणी मंगळवारी सदस्यांनी सभापतींकडे केली होती. त्यामुळे बुधवारी सर्वांचेच लक्ष्य या प्रस्तावाकडे लागले होते. कार्यक्रम पत्रिकेत या प्रस्तावाचा समावेश करण्यात आला नव्हता. मात्र, प्रश्नोत्तराच्या तासानंतर सभापतींनी स्वत:च याबाबत निवेदन करत प्रस्ताव पुढील अधिवेशनात घेण्यात येणार असल्याची घोषणा केली. सदर ठरावावर सांगोपांग विचार करावा लागणार आहे. विधी व न्याय खात्याचे मत घेतल्यानंतर कामकाज सल्लागार समितीमध्ये हा ठराव कधी घ्यायचा याबाबत ठरवू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले असल्यामुळे हा ठराव पुढील अधिवेशनात येईल, असे सभापतींनी स्पष्ट केले. तसेच यावर कोणालाच बोलता येणार नाही, असे निर्देशही दिले. म्हणून टाळला प्रस्तावशिवसेना आणि विरोधी पक्षांनी नियम २३ ब अंतर्गत प्रस्ताव दिला होता. या नियमानुसार एखादा प्रस्ताव आल्यास त्यावर मतदान मागता येते. आधीच विधान परिषदेत विरोधकांचे संख्याबळ जास्त, त्यात शिवसेनाही सामील झाली. त्यामुळे या ठरावाच्या निमित्ताने सरकारला विदर्भाबाबत अधिकृत भूमिका मांडणे भाग पडले असते आणि भाजपासाठी ती अडचणीची बाब ठरली असती म्हणूनच प्रस्ताव मान्य करण्यास भाजपाकडून टाळण्यात आल्याची चर्चा होती.