शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

कारखानदारांचा शासन निर्णयास ठेंगा

By admin | Updated: December 16, 2015 00:17 IST

साखर आयुक्तांनी बोलाविली शुक्रवारी बैठक : पहिला हप्ता ८० टक्के अशक्य

अशोक डोंबाळे --सांगली -ऊस उत्पादकांना एफआरपीच्या ८० टक्क्यांचा पहिला हप्ता आणि २० टक्क्यांचा दुसरा हप्ता देण्याचा तोडगा जिल्ह्यातील साखर कारखानदारांना मान्य नसून, त्यांनी शासनआदेश धुडकावला आहे. त्यामुळे साखर आयुक्तांनी दि. १८ डिसेंबरला पुणे येथे साखर कारखानदारांची बैठक बोलावली आहे, या बैठकीनंतर जिल्ह्यातील साखर कारखानदारांचीही बैठक होऊन, त्यानंतरच ऊस उत्पादकांना कसे आणि किती बिल द्यायचे, याबाबतचा निर्णय होणार आहे.ऊस दराच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी नागपूर येथे साखर कारखानदारांचे प्रतिनिधी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटीलही उपस्थित होते. त्यात एफआरपीच्या ८० टक्क्यांचा पहिला हप्ता आणि २० टक्क्यांचा दुसरा हप्ता देण्याचा तोडगा काढण्यात आला. संघटनेच्या प्रतिनिधींसह काही साखर कारखानदारांनी शासनाचा हा तोडगा मान्य केला. सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदारांना मात्र हा तोडगा मान्य नाही. शासनाने ‘८०-२०’चा तोडगा काढून जबाबदारी झटकली आहे. शासनाने आतापर्यंत राज्य बँकेकडून कर्जपुरवठा करण्यासह, करामध्ये सवलत आणि साखर निर्यातीच्या केवळ घोषणाच केल्या आहेत. राज्य बँकेने साखर मूल्यांकनाच्या ९० टक्के कर्जपुरवठा करण्याची सहकारमंत्र्यांनी घोषणा केली, पण बँकेकडून सध्याही ८५ टक्केच कर्जपुरवठा केला जात आहे. साखर उद्योगासमोरील या प्रश्नांवर शासनाने कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या नाहीत. हे धोरण पूर्णत: चुकीचे असल्याच्या प्रतिक्रिया कारखानदारांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केल्या.एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना शंभर टक्के मिळालीच पाहिजे. परंतु, ती देण्यासाठी कारखानदारांसमोरच्या प्रश्नांची सोडवणूकही शासनाने केली पाहिजे, अशीही प्रतिक्रिया काही प्रतिनिधींनी व्यक्त केली. साखर आयुक्तांनी दि. १८ डिसेंबर रोजी पुणे येथे साखर कारखान्यांच्या अध्यक्षांची बैठक बोलविली आहे. ही बैठक वादळी ठरण्याची शक्यता आहे. कारखानदारांना ‘८०-२०’चा तोडगा मान्य नसल्यामुळे, ते साखर आयुक्तांनाच एफआरपी कशी द्यावी, याचा जाब विचारणार आहेत.जिल्ह्यातील शेतकऱ्याला : एक पैसाही नाहीकोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी, शासनाचा निर्णय होईल तेव्हा होईल, तोपर्यंत शेतकऱ्यांना मदत करायची म्हणून पहिला हप्ता प्रति टन १७०० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला आहे. सातारा जिल्ह्यानेही प्रति टन १६०० रुपयेप्रमाणे पहिला हप्ता दिला आहे. पुणे, सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यातही पहिला हप्ता कमी-जास्त प्रमाणात दिला आहे. पण, सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत एक रुपयाही मिळालेला नाही. साखर कारखानदारांची बैठक होऊन शेतकऱ्यांना पैसे मिळण्यास आणखी आठ दिवस लागण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांची आर्थिक कोंडीसाखर कारखानदार, राज्य सरकार आणि संघटनांच्या संघर्षात ऊस उत्पादकांची फरफट होत आहे. शासनाने तोडगा काढून चार दिवस झाले तरीही, जिल्ह्यातील साखर कारखाने ऊस उत्पादकांना बिल देण्यास तयार नाहीत. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. सा ख र का र खा न दा र म्ह ण ता त...साखर उद्योग अडचणीत असल्यामुळे एफआरपीची रक्कम कारखानदार देऊ शकत नाहीत, हेही त्यांना माहीत आहे. असे असताना केवळ एफआरपीसाठी दोन हप्ते करून प्रश्न सुटणार नाही. कारखानदारांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी करामध्ये सवलत आणि शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम देण्यासाठी जी रक्कम कमी पडेल, ती अनुदानरूपाने दिली पाहिजे. ‘८०-२०’चा तोडगा काढून सरकार स्वत:ची जबाबदारी झटकत आहे. - मोहनराव कदम, अध्यक्ष, सोनहिरा साखर कारखाना.एफआरपी दोन टप्प्यात देण्याचा तोडगा आम्हाला मान्य नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनीही एकरकमीवरून असा तोडगा काढणे चुकीचे आहे. वास्तविक एफआरपी एकरकमी देण्यासाठी कारखानदारांना कमी पडणारी रक्कम अनुदानरूपाने देण्याची गरज होती. परंतु, याबाबत शासनाने कोणताही निर्णय न घेता दोन हप्ते केले. साखर आयुक्तांच्या बैठकीनंतर कारखानदारांची बैठक होईल. त्यानंतरच दराचा तोडगा निघणार आहे.- अरुण लाड, अध्यक्ष, क्रांती साखर कारखाना, कुंडल.एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना देणे कायद्यानेच बंधनकारक आहे. परंतु, साखरेचे दर कमी-जास्त होत असल्यामुळे दोन टप्प्यामध्ये ती देता येणे सध्या तरी कठीण झाले आहे. याबाबत सर्व कारखानदारांच्या बैठकीत जो निर्णय होईल, त्यानुसार आम्ही बिल देण्यास बांधील आहोत. येत्या चार दिवसात याबाबत निर्णय होण्याची अपेक्षा आहे.- मानसिंगराव नाईक, अध्यक्ष, विश्वास साखर कारखानाराज्य शासनाने एफआरपी देण्याबाबत ८० टक्के पहिला हप्ता आणि २० टक्के दुसरा हप्ता देण्याचा तोडगा आम्हाला मान्य आहे. सांगली जिल्ह्यातील इतर साखर कारखाने याबाबत कोणती भूमिका घेणार आहेत, ते पाहूनच आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यावर बिल वर्ग करणार आहोत. येत्या आठ दिवसांमध्ये आम्ही बिलाबाबत निर्णय घेणार आहे. - पृथ्वीराज देशमुख, अध्यक्ष, केन अ‍ॅग्रो साखर कारखाना..