शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

वीज दरवाढ रद्दबाबत सरकार बहिरे

By admin | Updated: May 16, 2017 02:24 IST

कृषीपंपांची वीज दरवाढ रद्द करण्याबाबत राज्य सरकार बहिरे झाले आहे. सरकारने याप्रकरणी वेळीच लक्ष घालून वीज दरवाढ रद्द न केल्यास नजीकच्या काळात सरकारच्या

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कृषीपंपांची वीज दरवाढ रद्द करण्याबाबत राज्य सरकार बहिरे झाले आहे. सरकारने याप्रकरणी वेळीच लक्ष घालून वीज दरवाढ रद्द न केल्यास नजीकच्या काळात सरकारच्या पोटात धडकी भरेल असे आंदोलन करू, असा इशारा ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी दिला. प्रसंगी सर्व शेतकरी मंत्रालयाला मानवी साखळी करून घेरावो घालतील, असेही ते म्हणाले.सहकारी पाणीपुरवठा संस्थांच्या कृषीपंपांची वीज दरवाढ रद्द करावी, सर्व कृषीपंपांना वीज मीटर बसवावीत, शेतकऱ्यांची चुकीची वीज बिले थकबाकी दाखवून चालू असलेली बदनामी थांबबावी, आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनच्यावतीने सोमवारी ‘महावितरण’च्या ताराबाई पार्कच्या मुख्य कार्यालयावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार धनंजय महाडिक, शिवसेना आमदार चंद्रदीप नरके, डॉ. सुजित मिणचेकर, प्रकाश आबिटकर, माजी आमदार संजय घाटगे, अरुण लाड, प्रताप होगाडे, बाबासाहेब पाटील-भुयेकर, आण्णासाहेब पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.