शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
2
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
3
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले
4
Ceasefire Violation: पाकिस्तानच्या कुरघोडीनंतर PM मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक
5
India Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान युद्धबंदी, एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचे सवाल, म्हणाले, 'धर्माबद्दल विचारून...'
6
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
7
रणवीर अलाहाबादिया पुन्हा फसला, मागितली पाकिस्तानी नागरिकांची माफी! भारतीय म्हणाले- 'तू तिकडेच जाऊन रहा'
8
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
9
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
10
UPI व्यवहारात अशी होते फसवणूक; आर्थिक नुकसान टाळण्यासाठी 'या' टीप्स फोलो करा
11
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
12
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
13
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
14
IND W vs SL W Final : फायनलमध्ये स्मृती मानधनाचा तोरा! तिच्या भात्यातून आली सलग दुसरी फिफ्टी
15
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
16
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
17
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
19
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
20
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू

सरकारची दोनदा वर्षपूर्ती !

By admin | Updated: December 3, 2015 09:12 IST

राज्यातील शिवसेना-भाजपा युती सरकारची वर्षपूर्ती ३१ आॅक्टोबर रोजी मोठ्या धूमधडाक्यात साजरी झालेली असताना, आता पुन्हा नव्याने वर्षपूर्तीचा सोहळा आयोजित करून, शिवसेनेने

- अतुल कुलकर्णी,  मुंबई

राज्यातील शिवसेना-भाजपा युती सरकारची वर्षपूर्ती ३१ आॅक्टोबर रोजी मोठ्या धूमधडाक्यात साजरी झालेली असताना, आता पुन्हा नव्याने वर्षपूर्तीचा सोहळा आयोजित करून, शिवसेनेने आपला सवतासुभा कायम ठेवला आहे. त्यामुळे एकाच सरकारची दोनदा वर्षपूर्ती, अशी अजब घटना राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच घडत आहे.शिवसेनेने आपल्या ‘सत्तेचा’ वर्षपूर्ती समारंभ गुरुवारी रवींद्र नाट्य मंदिरात सायंकाळी ४ वाजता आयोजित केला आहे. या कार्यक्रमात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते, शिवसेनेच्या दहा मंत्र्यांच्या कार्यपुस्तिकांचे प्रकाशन होणार आहे. यासाठी शिवसेनेने केलेल्या जाहिरातीत बाळासाहेब, उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्यासह दहा मंत्र्यांचे फोटो छापले आहेत. ‘आमच्यात कोणताही वाद नाही, जर शिवसेनेचे मंत्री नाराज असते, तर त्यांनी आपली नाराजी मंत्रिमंडळ बैठकीत बोलून दाखवली असती,’ असे सांगणारे भाजपा नेते शिवसेनेच्या वर्षपूर्ती सोहळ्याबद्दल काहीही बोलायला तयार नाहीत. कदाचित शनिवारी शपथविधी !मंत्रिमंडळाचा गुरुवारी विस्तार होणार नाही, ही माहिती स्वत: मुख्यमंत्री फडणवीस यांनीच ‘लोकमत’शी बोलताना दिली. मात्र, नागपूर अधिवेशनाच्या आधी विस्तार होऊ शकतो, असे सांगत विस्ताराबाबतची उत्सुकता कायम ठेवली. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी कदाचित शपथविधी होऊ शकतो. त्यात एखाद्या विद्यमान मंत्र्याची घरवापसी होऊ शकते व काहींची खाती बदलली जाऊ शकतात. शिवसेनेने त्यांची दोन नावे तयार ठेवल्याचे समजते.वर्षपूर्तीनिमित्त काढल्या जाणाऱ्या अहवालासाठी सेनेने प्रस्तावना मागितल्याची माहिती, स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच ‘लोकमत’ला दिली. आपण अद्याप प्रस्तावना दिलेली नाही, पण कदाचित आज लिहून देईन, असेही ते म्हणाले. - ‘सेनेच्या वर्षपूर्तीविषयी आपल्याला काहीही माहिती नाही, आपण पेपर वाचलेला नाही,’ असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले. मात्र, खा. अनिल देसाई यांच्यासोबत विधानपरिषदेच्या जागांबद्दल बैठक झाल्याचे ते म्हणाले.- फडणवीस सरकारने ३१ आॅक्टोबरला वर्षपूर्ती साजरी केली, त्यावेळी शिवसेनेच्या मंत्र्यांनी ‘आम्हाला कुठे वर्ष पूर्ण झाले?’ असे सांगत त्या सोहळ्यातून अंग काढून घेतले होते. भाजपा-सेनेचे जागावाटप : विधान परिषदेच्या आठ जागांसंदर्भात नवी दिल्ली येथे बुधवारी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि सेनेचे खा. अनिल देसाई यांच्यात चर्चा झाली. यातील मुंबई, अकोला-बुलडाणा-वाशिम आणि अहमदनगर अशा तीन जागा शिवसेना तर उर्वरित पाच जागा भाजपा लढविणार आहे.