शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

स्वच्छ, गतिमान व विकासाकडे नेणारे सरकार - राज्यपाल

By admin | Updated: November 12, 2014 17:13 IST

राज्यात २४ तास वीज व पाणी, प्रमुख शहरांना जोडण्यासाठी महामार्ग व एक्सप्रेस वेची बांधणी असा फडणवीस सरकारचा अजेंडा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी विधीमंडळातील अभिभाषणातून मांडला आहे.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. १२ - राज्यात २४ तास वीज व पाणी, राज्यांतील प्रमुख शहरांना जोडण्यासाठी महामार्ग व एक्सप्रेस वेची बांधणी, सहकारी बँकांचे पुनरुज्जीवन, पोलिस दलाचे आधुनिकीकरण असा फडणवीस सरकारचा अजेंडा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी विधीमंडळातील अभिभाषणातून मांडला आहे. राज्यपालांच्या अभिभाषणादरम्यान शिवसेना आमदारांनी राज्यपाल चले जाव, दादागिरी नही चलेगी अशी घोषण देत विरोध दर्शवला आहे. 
फडणवीस सरकारच्या पहिल्या अधिवेशनादरम्यान राज्यपाल विद्यासागर राव यांनी दोन्ही सभागृहांना संबोधित केले. राज्यपालांनी अभिभाषण करु नये अशी मागणी करणारे पत्रच काँग्रेस आमदारांनी राज्यपालांना पाठवले. मात्र यानंतरही राज्यपाल अभिभाषणासाठी विधीमंडळात पोहोचले. यानंतर शिवसेना आमदारांनी राज्यपालांची गाडी रोखून ठेवली. सुमारे पाच ते दहा मिनीटानंतर राज्यपालांनी गर्दीतून मार्ग काढत विधीमंडळ गाठले. भाषणाच्या अखेरीस काँग्रेस आमदारांनी सभात्याग करत आपला विरोध दर्शवला.
 
राज्यपालांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
> महाराष्ट्रातील नवीन सरकार विकासासाठी आणि जनतेच्या अपेक्षापूर्ण करण्यासाठी कटीबद्ध
> सरकारच्या व्हिजन डॉक्यूमेंटमधील आश्वासनं लवकरात लवकर पूर्ण करण्याचे प्रयत्न.
> राज्यातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी प्रयत्न करणार 
> आपले सरकार या नावाने नवीन संकेतस्थ व मोबाईल अ‍ॅप तयार करणार 
> मुंबईतील अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचा तर इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारणार 
> उद्योगधंद्यांना चालना देण्यासाठी जाचक अटी रद्द करणार 
> पोलिस दलाचे आधुनिकीकरण करताना त्यांना चांगली निवासस्थान व त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी उत्तम सुविधा उपलब्ध करुन देण्यास नवीन सरकार कटीबद्ध
> सिंचनाचे रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी विशेष तरतूद
> नवी मुंबईतील विमानतळाच्या कामाला वेग देणार
> सहकारी बँकांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी दोन महिन्यात नवीन धोरण मांडणार
> पर्यायी व्यवस्था तयार करुन एलबीटी रद्द करणार 
> जलसंधारण, सौर उर्जेला प्राधान्य
> ई टेंडरिंग सुविधा वापरण्यास प्राधान्य
> पुण्याला देशातील आयटी हब बनवणार 
> मराठवाड्यात स्वीट लाइम युनिट सुरु करणार 
> नागपूरमध्ये संत्र्यांवर प्रक्रिया करणारे युनिट
> दलित अत्याचार रोखण्यासाठी कठोर धोरण आणि या खटल्यांचा तातडीने निकाल लागावा यासाठी प्रयत्न करणार