शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

स्वच्छ, गतिमान व विकासाकडे नेणारे सरकार - राज्यपाल

By admin | Updated: November 12, 2014 17:13 IST

राज्यात २४ तास वीज व पाणी, प्रमुख शहरांना जोडण्यासाठी महामार्ग व एक्सप्रेस वेची बांधणी असा फडणवीस सरकारचा अजेंडा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी विधीमंडळातील अभिभाषणातून मांडला आहे.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. १२ - राज्यात २४ तास वीज व पाणी, राज्यांतील प्रमुख शहरांना जोडण्यासाठी महामार्ग व एक्सप्रेस वेची बांधणी, सहकारी बँकांचे पुनरुज्जीवन, पोलिस दलाचे आधुनिकीकरण असा फडणवीस सरकारचा अजेंडा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी विधीमंडळातील अभिभाषणातून मांडला आहे. राज्यपालांच्या अभिभाषणादरम्यान शिवसेना आमदारांनी राज्यपाल चले जाव, दादागिरी नही चलेगी अशी घोषण देत विरोध दर्शवला आहे. 
फडणवीस सरकारच्या पहिल्या अधिवेशनादरम्यान राज्यपाल विद्यासागर राव यांनी दोन्ही सभागृहांना संबोधित केले. राज्यपालांनी अभिभाषण करु नये अशी मागणी करणारे पत्रच काँग्रेस आमदारांनी राज्यपालांना पाठवले. मात्र यानंतरही राज्यपाल अभिभाषणासाठी विधीमंडळात पोहोचले. यानंतर शिवसेना आमदारांनी राज्यपालांची गाडी रोखून ठेवली. सुमारे पाच ते दहा मिनीटानंतर राज्यपालांनी गर्दीतून मार्ग काढत विधीमंडळ गाठले. भाषणाच्या अखेरीस काँग्रेस आमदारांनी सभात्याग करत आपला विरोध दर्शवला.
 
राज्यपालांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
> महाराष्ट्रातील नवीन सरकार विकासासाठी आणि जनतेच्या अपेक्षापूर्ण करण्यासाठी कटीबद्ध
> सरकारच्या व्हिजन डॉक्यूमेंटमधील आश्वासनं लवकरात लवकर पूर्ण करण्याचे प्रयत्न.
> राज्यातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी प्रयत्न करणार 
> आपले सरकार या नावाने नवीन संकेतस्थ व मोबाईल अ‍ॅप तयार करणार 
> मुंबईतील अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचा तर इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारणार 
> उद्योगधंद्यांना चालना देण्यासाठी जाचक अटी रद्द करणार 
> पोलिस दलाचे आधुनिकीकरण करताना त्यांना चांगली निवासस्थान व त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी उत्तम सुविधा उपलब्ध करुन देण्यास नवीन सरकार कटीबद्ध
> सिंचनाचे रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी विशेष तरतूद
> नवी मुंबईतील विमानतळाच्या कामाला वेग देणार
> सहकारी बँकांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी दोन महिन्यात नवीन धोरण मांडणार
> पर्यायी व्यवस्था तयार करुन एलबीटी रद्द करणार 
> जलसंधारण, सौर उर्जेला प्राधान्य
> ई टेंडरिंग सुविधा वापरण्यास प्राधान्य
> पुण्याला देशातील आयटी हब बनवणार 
> मराठवाड्यात स्वीट लाइम युनिट सुरु करणार 
> नागपूरमध्ये संत्र्यांवर प्रक्रिया करणारे युनिट
> दलित अत्याचार रोखण्यासाठी कठोर धोरण आणि या खटल्यांचा तातडीने निकाल लागावा यासाठी प्रयत्न करणार