बुलडाणा : भाजपाचे सरकार हे शेतकऱ्यांच्या प्रती संवेदनशील नाही. त्यांना शेतकऱ्यांशी काहीही घेणे-देणे नाही. केवळ घोषणांचा पाऊस अन् स्वप्ने दाखविणारे हे सरकार असल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.विखे पाटील बुलडाण्यात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, मंत्र्यांमध्ये वर्चस्व व नेतृत्वाची स्पर्धा लागली आहे. आमच्या सरकारने टँकरसाठी तहसील स्तरावर अधिकार दिले होते. या सरकारने विभागीय स्तरावर अधिकार दिल्याने टँकर मंजुरीसाठी ग्रामस्थांना हेलपाटे मारावे लागत आहेत़ या सरकारमध्ये सेनेचे अस्तित्व जाणवत नसून, ते केवळ भाजपामागे फरफटत जात असल्याची टीकाही त्यांनी केली.सानंदांवर राजकीय सूडबुद्धीने कारवाईकाँग्रेसचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्यावर भाजपा सरकार राजकीय सूडबुद्बीने कारवाई करीत असल्याचा आरोप राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. खामगाव नगरपालिका इमारत बांधकाम प्रकरणात आर्टिटेक्ट नियुक्ती प्रकरणात अपहार झाल्याचा ठपका ठेवत माजी आ. सानंदा सध्या न्यायालयीन कोठडीत असून, प्रकृती अस्वस्थतेच्या कारणावरून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल आहेत. विखे पाटील यांनी शुक्रवारी रुग्णालयात सानंदांची भेट घेऊन या प्रकरणात काँग्रेस त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याची ग्वाही दिली.
घोषणांचा पाऊस अन् स्वप्ने दाखविणारे सरकार
By admin | Updated: February 13, 2016 01:47 IST