शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

दुष्काळ निवारणासाठी शासन कटिबद्ध - राज्यपाल

By admin | Updated: March 10, 2016 03:55 IST

राज्यात येत्या वर्षांत पायाभूत सुविधांचे मोठे जाळे निर्माण करण्यासाठीच्या प्रकल्पांची कामे वेगाने केली जातील. तसेच, दुष्काळ निवारणासाठी प्रभावी उापययोजनांवर सरकार लक्ष केंद्रीत करेल

मुंबई : राज्यात येत्या वर्षांत पायाभूत सुविधांचे मोठे जाळे निर्माण करण्यासाठीच्या प्रकल्पांची कामे वेगाने केली जातील. तसेच, दुष्काळ निवारणासाठी प्रभावी उापययोजनांवर सरकार लक्ष केंद्रीत करेल, असे राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी आजअर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधिमंडळाच्या संयुक्त सभागृहात अभिभाषणात सांगितले. राज्यातील पाच महसूल विभागांना जोडणारा नागपूर-मुंबई अतिजलद दळणवळण द्रुतगती महामार्ग बांधण्याचे काम यंदा हाती घेण्यात येणार असून जो देशातील सर्वात लांब हरितक्षेत्र द्रुतगती महामार्ग असेल. सुमारे १५० किलोमीटर लांबीच्या प्रस्तावित पुणे चक्र ाकार मार्गाचे बांधकाम लवकरच सुरु करण्यात येईल. ठाणे खाडीवरील पुलाचे बांधकामसुद्धा सुरु करण्यात येईल. तसेच, खोपोली पथकर नाका ते कुसगावच्या दरम्यान सुमारे ८.२ किलोमीटरचा बोगदा आणि ४किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग बांधण्यात येईल, असे राज्यपालांनी सांगितले. ठाणे-घोडबंदर रोड, विदर्भातील २७ रेल्वे उड्डाणपूल, वाकण-पाली-खोपोली रस्त्याचे चौपदरीकरण, ठाणे ते बोरीवली भुयारी मार्ग आणि कल्याण-डोंबिवली-शिळफाटा उन्नत मार्ग बांधण्याची जबाबदारी राज्य रस्ते विकास महामंडळाला देण्यात आली आहे, असे ते म्हणाले. दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारने ३ हजार ४९ कोटी रुपयांचे सहाय्य केले आहे. पीककर्जावरील तीन महिन्यांचे व्याज माफ केले आहे. पीक कर्जाची पुनर्रचना करण्यात आली. कर्जावरील व्याज माफ करून कर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्यात आली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त वर्धा-सेवाग्राम-पवनारचा विकास करणार. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनकार्याशी निगिडत पाच ठिकाणांचा केंद शासनाकडून ‘पंचतीर्थ’ म्हणून विकास केला जाणार असून त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील आंबवडे गावाचा आणि मुंबईतील इंदू मिलचा समावेश करण्यात आला आहे. पुणे येथील सीसीटीव्ही प्रकल्प पूर्ण तर मुंबई, ठाणे, औरंगाबाद व सोलापूर येथील सीसीटीव्ही प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यावर भर. कोराडी (जि.नागपूर) येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्रात १९८० मेगावॅट व चंद्रपूर येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्रात एक हािर मेगावॅट इतक्या क्षमतेचे नवीन वीज निर्मिती संच कार्यरत होणार.