शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

दुष्काळ निवारणासाठी शासन कटिबद्ध - राज्यपाल

By admin | Updated: March 10, 2016 03:55 IST

राज्यात येत्या वर्षांत पायाभूत सुविधांचे मोठे जाळे निर्माण करण्यासाठीच्या प्रकल्पांची कामे वेगाने केली जातील. तसेच, दुष्काळ निवारणासाठी प्रभावी उापययोजनांवर सरकार लक्ष केंद्रीत करेल

मुंबई : राज्यात येत्या वर्षांत पायाभूत सुविधांचे मोठे जाळे निर्माण करण्यासाठीच्या प्रकल्पांची कामे वेगाने केली जातील. तसेच, दुष्काळ निवारणासाठी प्रभावी उापययोजनांवर सरकार लक्ष केंद्रीत करेल, असे राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी आजअर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधिमंडळाच्या संयुक्त सभागृहात अभिभाषणात सांगितले. राज्यातील पाच महसूल विभागांना जोडणारा नागपूर-मुंबई अतिजलद दळणवळण द्रुतगती महामार्ग बांधण्याचे काम यंदा हाती घेण्यात येणार असून जो देशातील सर्वात लांब हरितक्षेत्र द्रुतगती महामार्ग असेल. सुमारे १५० किलोमीटर लांबीच्या प्रस्तावित पुणे चक्र ाकार मार्गाचे बांधकाम लवकरच सुरु करण्यात येईल. ठाणे खाडीवरील पुलाचे बांधकामसुद्धा सुरु करण्यात येईल. तसेच, खोपोली पथकर नाका ते कुसगावच्या दरम्यान सुमारे ८.२ किलोमीटरचा बोगदा आणि ४किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग बांधण्यात येईल, असे राज्यपालांनी सांगितले. ठाणे-घोडबंदर रोड, विदर्भातील २७ रेल्वे उड्डाणपूल, वाकण-पाली-खोपोली रस्त्याचे चौपदरीकरण, ठाणे ते बोरीवली भुयारी मार्ग आणि कल्याण-डोंबिवली-शिळफाटा उन्नत मार्ग बांधण्याची जबाबदारी राज्य रस्ते विकास महामंडळाला देण्यात आली आहे, असे ते म्हणाले. दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारने ३ हजार ४९ कोटी रुपयांचे सहाय्य केले आहे. पीककर्जावरील तीन महिन्यांचे व्याज माफ केले आहे. पीक कर्जाची पुनर्रचना करण्यात आली. कर्जावरील व्याज माफ करून कर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्यात आली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त वर्धा-सेवाग्राम-पवनारचा विकास करणार. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनकार्याशी निगिडत पाच ठिकाणांचा केंद शासनाकडून ‘पंचतीर्थ’ म्हणून विकास केला जाणार असून त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील आंबवडे गावाचा आणि मुंबईतील इंदू मिलचा समावेश करण्यात आला आहे. पुणे येथील सीसीटीव्ही प्रकल्प पूर्ण तर मुंबई, ठाणे, औरंगाबाद व सोलापूर येथील सीसीटीव्ही प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यावर भर. कोराडी (जि.नागपूर) येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्रात १९८० मेगावॅट व चंद्रपूर येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्रात एक हािर मेगावॅट इतक्या क्षमतेचे नवीन वीज निर्मिती संच कार्यरत होणार.