शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाशी गद्दारी करणाऱ्याला ठाण्यातून अटक; पाकिस्तानी महिलेच्या संपर्कात, ATS ची मोठी कारवाई
2
Revanth Reddy : "राहुल गांधी पंतप्रधान असते तर त्यांनी PoK परत आणला असता"; रेवंत रेड्डी यांचा मोदींवर निशाणा
3
भयंकर! पंजाबमधील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; ५ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
4
दे दणादण! IRS अधिकारी आपापसात भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; ऑफिसमध्ये तुफान राडा
5
फक्त बचत नाही, 'स्मार्ट' गुंतवणूक करा! करोडपती बनण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा!
6
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
7
शरद तळवलकर यांच्या नातवाला पाहिलंत का? तोदेखील आहे अभिनेता अन् गाजवतोय हॉलिवूड
8
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
9
लोन मिळवून देण्याच्या नावावर सर्वाधिक लोकांना लागलाय चुना, गमावलेत ₹३३,१४८ कोटी
10
"अकाऊंट हॅक झालेलं तर गप्प का बसलात?" सुदेश म्हशिलकरांच्या स्पष्टीकरणानंतर प्राचीचा सवाल, म्हणाली...
11
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
12
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
13
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
14
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
15
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
16
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
17
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
18
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
19
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!

राज्यातील गोवंश हत्याबंदी हायकोर्टात कायम

By admin | Updated: May 7, 2016 04:55 IST

राज्य सरकारच्या सुधारित गोवंश हत्याबंदी कायद्याची घटनात्मक वैधता उच्च न्यायालयाने शुक्रवारी कायम केली. मात्र या कायद्यातील कलम ५ (डी) व ९ (बी) अवैध ठरवून उच्च न्यायालयाने

मुंबई : राज्य सरकारच्या सुधारित गोवंश हत्याबंदी कायद्याची घटनात्मक वैधता उच्च न्यायालयाने शुक्रवारी कायम केली. मात्र या कायद्यातील कलम ५ (डी) व ९ (बी) अवैध ठरवून उच्च न्यायालयाने गोवंशातील प्राण्यांचे मांस (बीफ) बाळगणे गुन्हा नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे अन्य राज्यातून मांस आणून ते बाळगणे आणि खाणे, यापुढे गुन्हा ठरणार नाही.महाराष्ट्र राज्य प्राणी संरक्षण (सुधारित) कायदा, २०१५च्या वैधतेला आव्हान देणाऱ्या सुमारे २९ याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या. बहुतांश याचिकांनी सुधारित कायद्याच्या ५ (सी), ५ (डी), ९ (ए) आणि ९ (बी) या तरतुदींना आव्हान दिले होते. या याचिकांवर शुक्रवारी न्या. अभय ओक व न्या. एस. सी. गुप्ते यांच्या खंडपीठाने निर्णय दिला. सुधारित कायद्याची वैधता उच्च न्यायालयाने कायम केली, मात्र कलम ५ (डी) व ९ (बी) मात्र अवैध ठरवले. या कलमांमुळे नागरिकांना राज्यघटनेने अनुच्छेद २१ अंतर्गत बहाल केलेल्या मूलभूत अधिकारांवर गदा आल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. सुधारित कायद्याच्या ५ (सी) हे कलम गोवंशातील प्राण्यांचे मांस (बीफ) बाळगण्याबद्दल आहे, तर ५ (डी) कलम हे परराज्यात कत्तल केलेल्या गोवंशातील प्राण्यांचे मांस बाळगण्याबद्दलचे आहे. तसेच ९ (बी) हे कलम बीफ न बाळगल्याचे सिद्ध करण्यासंदर्भातील आहे. यातील कलम ५ (डी) व कलम ९ (बी) न्यायालयाने अवैध ठरवले. कायदा अस्तित्वात आल्यापासून एखाद्या व्यक्तीने बाळगलेले मांस गोवंशातील प्राण्याचे आहे अथवा नाही हे जाणून न घेताच गुन्हा नोंदवला जात होता. मात्र उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, यापुढे मांस बाळगलेल्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यापूर्वी ते मांस गोवंशातील प्राण्याचे आहे की नाही, याची पडताळणी तपास यंत्रणेला करणे बंधनकारक असेल. मांस गोवंशातील असल्याचे माहीत असतानाही ते बाळगल्यास पोलीस संबंधितांवर गुन्हा नोंदवू शकणार आहे. अजाणतेपणी मांस बाळगल्यास त्या व्यक्तीवर गुन्हा नोंदवला जाऊ शकत नाही. त्यामुळे ५ (डी) व ९ (बी) ही दोन्ही कलमे नागरिकांच्या ‘गुप्तता बाळगण्याच्या’ राज्यघटनेने बहाल केलेल्या मुलभूत अधिकारावर गदा आणणारी असल्याचे खंडपीठाने म्हटले.राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी या निर्णयावर स्थगिती देण्याची विनंती उच्च न्यायालयाला केली. मात्र नागरिकांच्या मुलभूत अधिकारांवर गदा येत आहे, असे म्हणत न्यायालयाने या निकालावर स्थगिती देण्यास नकार दिला. (प्रतिनिधी)कलम ५ (डी) अवैध ठरवताना खंडपीठाने काय म्हटले ?कायद्यातील कलम ५ (बी) आणि ५ (सी)चा हेतू राज्यातील गोवंशाचे संरक्षण करणे, हा आहे. मात्र कायद्यातील कलम ५ (डी) ही एकच अशी तरतूद आहे, की ज्याचा या हेतूशी संबंध नाही. गोवंशातील प्राण्यांचे मांस खाणे, नागरिकांच्या आरोग्यास घातक आहे म्हणून त्यांना हे खाण्यापासून परावृत्त करणे, हा या कायद्यामागचा हेतू नाही. राज्यातील गोवंशाचे रक्षण करणे, हाच या कायद्यामागचा हेतू आहे, असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले.