शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

गोसेखुर्द आणि निम्न वर्धाची दारे उघडली

By admin | Updated: July 24, 2014 00:56 IST

अप्पर वर्धा धरणातील जलसाठ्यात वाढ झाल्याने दुपारपासून निम्न वर्धा धरणाचे सर्व ३१ दारे दीड मीटरने उघडण्यात आली. ३५१६ दलघमी पाण्याचा विसर्ग सुरू आहे. भंडारातील गोसेखुर्द धरणाचे

जनजीवन प्रभावित : नागपुरात एकाचा तर अमरावतीत चौघांचा मृत्यू, वाहतूक विस्कळीत, गडचिरोली-नागपूर मार्ग बंदनागपूर : अप्पर वर्धा धरणातील जलसाठ्यात वाढ झाल्याने दुपारपासून निम्न वर्धा धरणाचे सर्व ३१ दारे दीड मीटरने उघडण्यात आली. ३५१६ दलघमी पाण्याचा विसर्ग सुरू आहे. भंडारातील गोसेखुर्द धरणाचे १७ दारे तीन मीटर तर १६ दारे अडीच मीटरने उघडण्यात आली. उपराजधानीतील अलंकार चौकाजवळून दुचाकीने जात असलेल्या दोन तरुण भावंडांवर झाड कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला.नागपुरात अलंकार चौकाजवळून दुचाकीने जात असलेल्या दोन तरुण भावंडांवर झाड कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला. आशुतोष कुंभारे (१८) रा. सुदामनगरी पांढराबोडी असे मृताचे नाव आहे तर स्वप्नील कुंभारे (१६) असे जखमीचे नाव आहे. बुधवारी अचानक सिलिंडर संपल्याने सिलिंडरचा नंबर लावण्यासाठी दोघेही आशुतोष व स्वप्नील आपल्या दुचाकीने जात होते. अचानक झाड कोसळ्याने आशुतोष जागीच मरण पावला. जिल्ह्यातील ४३० घरांचे अंशत: नुकसान झाले. यामध्ये सर्वाधिक ३४० घरांचे नुकसान एकट्या काटोल तालुक्यात झाले. खापरखेडा परिसरातील आठ, नांद येथील पाच, कोराडीतील चार, खापा येथील दोन घरांची भिंत पडली. खापा येथे गोठ्याची भिंत पडून बैलाचा मृत्यू झाला.अमरावती जिल्ह्यात अचलपूर तालुक्यातील शिंदी बु येथे घराची भिंत अंगावर कोसळल्याने नुरजा परवीन जमील शाह (३०) ही महिला ठार झाली. तिचा मुलगा खैजाग (८) गंभीर जखमी झाला. चांदूररेल्वे तालुक्यातील बग्गी येथे घर कोसळल्याने हरिभाऊ शेलोकार (६५), मंदा शेलोकार (६०) हे दाम्पत्य ठार झाले. अंजनगाव सुर्जी तालुक्यात सातेगाव येथे घराची भिंत कोसळून बाळू नारायण रोकडे (५८), यांचा भिंतीखाली दबून मृत्यू झाला. पेढी नदीला पूर आल्यामुळे गावात पाणी शिरले होते. पुसदानजीक पेढी नदीच्या पुरात टाटा सुमो अडकली. या गाडीचा चालकही गाडीतच अडकला होता. त्याला सुखरुप बाहेर काढण्यात आले. जिल्ह्यातील अनेक मार्ग बंद झाले असून वाहतूक कोलमडली आहे. विभागात ५६ मार्गांवरील एसटीच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलडाणा येथे मागील तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरु आहे. अनेक मार्गांवरुन नदी-नाले तुडूंब भरुन वाहत होते. मुख्य मार्गावर मोठे वृक्ष कोसळल्याने काही मार्गांवर वाहनांच्या रांगा लागून तेथील वाहतूक ठप्प झाली होती. वर्धा जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणातील जलसाठ्यात वाढ झाल्याने दुपारपासून निम्न वर्धा धरणाचे सर्व ३१ दरवाजे तब्बल दीड मीटरने उघडण्यात आले. ३५१६ दलघमी पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सर्वाधिक वर्धा तालुक्यात २१०़१० मिमी पावसाची नोंद आहे़ बुधवारी पहाटे जिल्ह्याला वादळाचाही जोरदार तडाखा बसला. यामध्ये कारंजा, आर्वी, आष्टी, वर्धा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. आष्टी तालुक्यातील तळेगाव (श्या.पं़) येथील पोलीस ठाण्याच्या आवारातील झाड कोसळले. दोन घरांच्या भिंतीही कोसळल्या. चिस्तुर येथील दोन घरे जमीनदोस्त झाली. वादळामुळे सेलू तालुक्यातील केळीच्या बागांसह कारंजा, आष्टी तालुक्यातील संत्राच्या बागांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शिरपूर (बोके) या गावाला पुराने वेढले तर जळगाव (बेलोरा), नांदपूर या गावात बाकळी नदीचे पाणी शिरले. दोन्ही गावांतील प्रत्येकी ३० कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. आर्वी-तळेगाव (श्या.) हा मार्ग बंद झाला. नागपूर-अमरावती या राष्ट्रीय महामार्र्ग क्र. ६ वरील खडका येथे सुमारे १५ शेतकऱ्यांची शेती पुराच्या प्रवाहाने अक्षरश: खरडून निघाली़ यात पिकांचे मोठे नुकसान झाले. निम्न वर्धा, पोथरा, लाल नाला धरणांतून विसर्ग सुरू असून खैरी धरण ९० टक्के भरले आहे़गेल्या २४ तासांत गडचिरोली जिल्ह्यात सरासरी ६३० मिमी पाऊस झाला. वडसा-कुरखेडा हा मार्ग गाढवी नदीला पूर आल्याने तर गडचिरोली-आरमोरी मार्ग कठाणी नदीला पूर असल्याने बंद आहे. वैनगंगेला पाणी वाढल्याने कठाणी नदीच्या पुलावरून सकाळपासून वाहतूक बंद झाली आहे. त्यामुळे आज नागपूरकडे जाणाऱ्या बसगाड्या खरपुंडीमार्गे आरमोरीकडे रवाना झाल्या. (लोकमत न्यूज नेटवर्क)