शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गोसेखुर्द आणि निम्न वर्धाची दारे उघडली

By admin | Updated: July 24, 2014 00:56 IST

अप्पर वर्धा धरणातील जलसाठ्यात वाढ झाल्याने दुपारपासून निम्न वर्धा धरणाचे सर्व ३१ दारे दीड मीटरने उघडण्यात आली. ३५१६ दलघमी पाण्याचा विसर्ग सुरू आहे. भंडारातील गोसेखुर्द धरणाचे

जनजीवन प्रभावित : नागपुरात एकाचा तर अमरावतीत चौघांचा मृत्यू, वाहतूक विस्कळीत, गडचिरोली-नागपूर मार्ग बंदनागपूर : अप्पर वर्धा धरणातील जलसाठ्यात वाढ झाल्याने दुपारपासून निम्न वर्धा धरणाचे सर्व ३१ दारे दीड मीटरने उघडण्यात आली. ३५१६ दलघमी पाण्याचा विसर्ग सुरू आहे. भंडारातील गोसेखुर्द धरणाचे १७ दारे तीन मीटर तर १६ दारे अडीच मीटरने उघडण्यात आली. उपराजधानीतील अलंकार चौकाजवळून दुचाकीने जात असलेल्या दोन तरुण भावंडांवर झाड कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला.नागपुरात अलंकार चौकाजवळून दुचाकीने जात असलेल्या दोन तरुण भावंडांवर झाड कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला. आशुतोष कुंभारे (१८) रा. सुदामनगरी पांढराबोडी असे मृताचे नाव आहे तर स्वप्नील कुंभारे (१६) असे जखमीचे नाव आहे. बुधवारी अचानक सिलिंडर संपल्याने सिलिंडरचा नंबर लावण्यासाठी दोघेही आशुतोष व स्वप्नील आपल्या दुचाकीने जात होते. अचानक झाड कोसळ्याने आशुतोष जागीच मरण पावला. जिल्ह्यातील ४३० घरांचे अंशत: नुकसान झाले. यामध्ये सर्वाधिक ३४० घरांचे नुकसान एकट्या काटोल तालुक्यात झाले. खापरखेडा परिसरातील आठ, नांद येथील पाच, कोराडीतील चार, खापा येथील दोन घरांची भिंत पडली. खापा येथे गोठ्याची भिंत पडून बैलाचा मृत्यू झाला.अमरावती जिल्ह्यात अचलपूर तालुक्यातील शिंदी बु येथे घराची भिंत अंगावर कोसळल्याने नुरजा परवीन जमील शाह (३०) ही महिला ठार झाली. तिचा मुलगा खैजाग (८) गंभीर जखमी झाला. चांदूररेल्वे तालुक्यातील बग्गी येथे घर कोसळल्याने हरिभाऊ शेलोकार (६५), मंदा शेलोकार (६०) हे दाम्पत्य ठार झाले. अंजनगाव सुर्जी तालुक्यात सातेगाव येथे घराची भिंत कोसळून बाळू नारायण रोकडे (५८), यांचा भिंतीखाली दबून मृत्यू झाला. पेढी नदीला पूर आल्यामुळे गावात पाणी शिरले होते. पुसदानजीक पेढी नदीच्या पुरात टाटा सुमो अडकली. या गाडीचा चालकही गाडीतच अडकला होता. त्याला सुखरुप बाहेर काढण्यात आले. जिल्ह्यातील अनेक मार्ग बंद झाले असून वाहतूक कोलमडली आहे. विभागात ५६ मार्गांवरील एसटीच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलडाणा येथे मागील तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरु आहे. अनेक मार्गांवरुन नदी-नाले तुडूंब भरुन वाहत होते. मुख्य मार्गावर मोठे वृक्ष कोसळल्याने काही मार्गांवर वाहनांच्या रांगा लागून तेथील वाहतूक ठप्प झाली होती. वर्धा जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणातील जलसाठ्यात वाढ झाल्याने दुपारपासून निम्न वर्धा धरणाचे सर्व ३१ दरवाजे तब्बल दीड मीटरने उघडण्यात आले. ३५१६ दलघमी पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सर्वाधिक वर्धा तालुक्यात २१०़१० मिमी पावसाची नोंद आहे़ बुधवारी पहाटे जिल्ह्याला वादळाचाही जोरदार तडाखा बसला. यामध्ये कारंजा, आर्वी, आष्टी, वर्धा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. आष्टी तालुक्यातील तळेगाव (श्या.पं़) येथील पोलीस ठाण्याच्या आवारातील झाड कोसळले. दोन घरांच्या भिंतीही कोसळल्या. चिस्तुर येथील दोन घरे जमीनदोस्त झाली. वादळामुळे सेलू तालुक्यातील केळीच्या बागांसह कारंजा, आष्टी तालुक्यातील संत्राच्या बागांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शिरपूर (बोके) या गावाला पुराने वेढले तर जळगाव (बेलोरा), नांदपूर या गावात बाकळी नदीचे पाणी शिरले. दोन्ही गावांतील प्रत्येकी ३० कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. आर्वी-तळेगाव (श्या.) हा मार्ग बंद झाला. नागपूर-अमरावती या राष्ट्रीय महामार्र्ग क्र. ६ वरील खडका येथे सुमारे १५ शेतकऱ्यांची शेती पुराच्या प्रवाहाने अक्षरश: खरडून निघाली़ यात पिकांचे मोठे नुकसान झाले. निम्न वर्धा, पोथरा, लाल नाला धरणांतून विसर्ग सुरू असून खैरी धरण ९० टक्के भरले आहे़गेल्या २४ तासांत गडचिरोली जिल्ह्यात सरासरी ६३० मिमी पाऊस झाला. वडसा-कुरखेडा हा मार्ग गाढवी नदीला पूर आल्याने तर गडचिरोली-आरमोरी मार्ग कठाणी नदीला पूर असल्याने बंद आहे. वैनगंगेला पाणी वाढल्याने कठाणी नदीच्या पुलावरून सकाळपासून वाहतूक बंद झाली आहे. त्यामुळे आज नागपूरकडे जाणाऱ्या बसगाड्या खरपुंडीमार्गे आरमोरीकडे रवाना झाल्या. (लोकमत न्यूज नेटवर्क)