शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
4
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
5
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
6
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
7
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
8
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
9
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
10
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
11
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
12
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
13
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
14
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
15
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
16
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
17
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
18
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
19
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
20
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....

गोसेखुर्द आणि निम्न वर्धाची दारे उघडली

By admin | Updated: July 24, 2014 00:56 IST

अप्पर वर्धा धरणातील जलसाठ्यात वाढ झाल्याने दुपारपासून निम्न वर्धा धरणाचे सर्व ३१ दारे दीड मीटरने उघडण्यात आली. ३५१६ दलघमी पाण्याचा विसर्ग सुरू आहे. भंडारातील गोसेखुर्द धरणाचे

जनजीवन प्रभावित : नागपुरात एकाचा तर अमरावतीत चौघांचा मृत्यू, वाहतूक विस्कळीत, गडचिरोली-नागपूर मार्ग बंदनागपूर : अप्पर वर्धा धरणातील जलसाठ्यात वाढ झाल्याने दुपारपासून निम्न वर्धा धरणाचे सर्व ३१ दारे दीड मीटरने उघडण्यात आली. ३५१६ दलघमी पाण्याचा विसर्ग सुरू आहे. भंडारातील गोसेखुर्द धरणाचे १७ दारे तीन मीटर तर १६ दारे अडीच मीटरने उघडण्यात आली. उपराजधानीतील अलंकार चौकाजवळून दुचाकीने जात असलेल्या दोन तरुण भावंडांवर झाड कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला.नागपुरात अलंकार चौकाजवळून दुचाकीने जात असलेल्या दोन तरुण भावंडांवर झाड कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला. आशुतोष कुंभारे (१८) रा. सुदामनगरी पांढराबोडी असे मृताचे नाव आहे तर स्वप्नील कुंभारे (१६) असे जखमीचे नाव आहे. बुधवारी अचानक सिलिंडर संपल्याने सिलिंडरचा नंबर लावण्यासाठी दोघेही आशुतोष व स्वप्नील आपल्या दुचाकीने जात होते. अचानक झाड कोसळ्याने आशुतोष जागीच मरण पावला. जिल्ह्यातील ४३० घरांचे अंशत: नुकसान झाले. यामध्ये सर्वाधिक ३४० घरांचे नुकसान एकट्या काटोल तालुक्यात झाले. खापरखेडा परिसरातील आठ, नांद येथील पाच, कोराडीतील चार, खापा येथील दोन घरांची भिंत पडली. खापा येथे गोठ्याची भिंत पडून बैलाचा मृत्यू झाला.अमरावती जिल्ह्यात अचलपूर तालुक्यातील शिंदी बु येथे घराची भिंत अंगावर कोसळल्याने नुरजा परवीन जमील शाह (३०) ही महिला ठार झाली. तिचा मुलगा खैजाग (८) गंभीर जखमी झाला. चांदूररेल्वे तालुक्यातील बग्गी येथे घर कोसळल्याने हरिभाऊ शेलोकार (६५), मंदा शेलोकार (६०) हे दाम्पत्य ठार झाले. अंजनगाव सुर्जी तालुक्यात सातेगाव येथे घराची भिंत कोसळून बाळू नारायण रोकडे (५८), यांचा भिंतीखाली दबून मृत्यू झाला. पेढी नदीला पूर आल्यामुळे गावात पाणी शिरले होते. पुसदानजीक पेढी नदीच्या पुरात टाटा सुमो अडकली. या गाडीचा चालकही गाडीतच अडकला होता. त्याला सुखरुप बाहेर काढण्यात आले. जिल्ह्यातील अनेक मार्ग बंद झाले असून वाहतूक कोलमडली आहे. विभागात ५६ मार्गांवरील एसटीच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलडाणा येथे मागील तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरु आहे. अनेक मार्गांवरुन नदी-नाले तुडूंब भरुन वाहत होते. मुख्य मार्गावर मोठे वृक्ष कोसळल्याने काही मार्गांवर वाहनांच्या रांगा लागून तेथील वाहतूक ठप्प झाली होती. वर्धा जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणातील जलसाठ्यात वाढ झाल्याने दुपारपासून निम्न वर्धा धरणाचे सर्व ३१ दरवाजे तब्बल दीड मीटरने उघडण्यात आले. ३५१६ दलघमी पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सर्वाधिक वर्धा तालुक्यात २१०़१० मिमी पावसाची नोंद आहे़ बुधवारी पहाटे जिल्ह्याला वादळाचाही जोरदार तडाखा बसला. यामध्ये कारंजा, आर्वी, आष्टी, वर्धा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. आष्टी तालुक्यातील तळेगाव (श्या.पं़) येथील पोलीस ठाण्याच्या आवारातील झाड कोसळले. दोन घरांच्या भिंतीही कोसळल्या. चिस्तुर येथील दोन घरे जमीनदोस्त झाली. वादळामुळे सेलू तालुक्यातील केळीच्या बागांसह कारंजा, आष्टी तालुक्यातील संत्राच्या बागांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शिरपूर (बोके) या गावाला पुराने वेढले तर जळगाव (बेलोरा), नांदपूर या गावात बाकळी नदीचे पाणी शिरले. दोन्ही गावांतील प्रत्येकी ३० कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. आर्वी-तळेगाव (श्या.) हा मार्ग बंद झाला. नागपूर-अमरावती या राष्ट्रीय महामार्र्ग क्र. ६ वरील खडका येथे सुमारे १५ शेतकऱ्यांची शेती पुराच्या प्रवाहाने अक्षरश: खरडून निघाली़ यात पिकांचे मोठे नुकसान झाले. निम्न वर्धा, पोथरा, लाल नाला धरणांतून विसर्ग सुरू असून खैरी धरण ९० टक्के भरले आहे़गेल्या २४ तासांत गडचिरोली जिल्ह्यात सरासरी ६३० मिमी पाऊस झाला. वडसा-कुरखेडा हा मार्ग गाढवी नदीला पूर आल्याने तर गडचिरोली-आरमोरी मार्ग कठाणी नदीला पूर असल्याने बंद आहे. वैनगंगेला पाणी वाढल्याने कठाणी नदीच्या पुलावरून सकाळपासून वाहतूक बंद झाली आहे. त्यामुळे आज नागपूरकडे जाणाऱ्या बसगाड्या खरपुंडीमार्गे आरमोरीकडे रवाना झाल्या. (लोकमत न्यूज नेटवर्क)