शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

‘गोसेखुर्द’ अधांतरीच

By admin | Updated: August 6, 2015 01:04 IST

विदर्भातील महत्त्वाकांक्षी गोसेखुर्द (इंदिरासागर) प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्पाची मान्यता मिळून सहा वर्षे होऊनही हा प्रकल्प अद्याप पूर्ण झालेला नाही.

नंदू परसावार, भंडाराविदर्भातील महत्त्वाकांक्षी गोसेखुर्द (इंदिरासागर) प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्पाची मान्यता मिळून सहा वर्षे होऊनही हा प्रकल्प अद्याप पूर्ण झालेला नाही. त्यामुळे या प्रकल्पाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना पावसावरच विसंबून राहावे लागत आहे.गोसेखुर्दला केंद्र सरकारच्या एआयबीपीअंतर्गत (एक्सिलेरेटेड इरिगेशन बेनिफिट प्रोग्राम) २००९मध्ये राष्ट्रीय प्रकल्प म्हणून मान्यता देण्यात आली. सोबतच निधी देऊन प्रकल्प पाच वर्षांत पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने कार्यक्रम आखला होता. मात्र वर्षामागून वर्षे लोटली, परंतु पुनर्वसन झाले नाही. प्रकल्पाच्या डाव्या व उजवा कालव्याचे कामही अपूर्णावस्थेत आहे. कालवा बांधकामात अनियमितता झाल्याचे उघडकीस आल्यानंतर निकृष्ट बांधकामाची उच्चस्तरीय चौकशी सुरू करण्यात आली. ही चौकशी अद्याप सुरूच असल्यामुळे केंद्र सरकारकडून देण्यात येणाऱ्या निधीत अडचणी येत आहेत. प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात ३४ गावे पूर्णत: तर ७० गावे अंशत: बाधित होतात. यात पूर्णत: बाधित ३४ पैकी २८ गावांचे तीन टप्प्यांत विविध ठिकाणी पुनर्वसन करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात १७ गावांचे पुनर्वसन करायचे होते. परंतु यापैकी सहा गावांचे पुनर्वसन न झाल्याने जलस्तर वाढविण्यात अडचणी येत आहेत. तिसऱ्या टप्प्यात १२ पैकी दोनच गावांचे पुनर्वसन झाले आहे.