शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
3
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
4
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
5
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
6
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
7
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
8
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
9
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
10
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
11
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
12
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
13
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
14
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
15
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
16
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
17
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
18
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
19
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
20
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!

‘गोसेखुर्द’ अधांतरीच

By admin | Updated: August 6, 2015 01:04 IST

विदर्भातील महत्त्वाकांक्षी गोसेखुर्द (इंदिरासागर) प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्पाची मान्यता मिळून सहा वर्षे होऊनही हा प्रकल्प अद्याप पूर्ण झालेला नाही.

नंदू परसावार, भंडाराविदर्भातील महत्त्वाकांक्षी गोसेखुर्द (इंदिरासागर) प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्पाची मान्यता मिळून सहा वर्षे होऊनही हा प्रकल्प अद्याप पूर्ण झालेला नाही. त्यामुळे या प्रकल्पाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना पावसावरच विसंबून राहावे लागत आहे.गोसेखुर्दला केंद्र सरकारच्या एआयबीपीअंतर्गत (एक्सिलेरेटेड इरिगेशन बेनिफिट प्रोग्राम) २००९मध्ये राष्ट्रीय प्रकल्प म्हणून मान्यता देण्यात आली. सोबतच निधी देऊन प्रकल्प पाच वर्षांत पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने कार्यक्रम आखला होता. मात्र वर्षामागून वर्षे लोटली, परंतु पुनर्वसन झाले नाही. प्रकल्पाच्या डाव्या व उजवा कालव्याचे कामही अपूर्णावस्थेत आहे. कालवा बांधकामात अनियमितता झाल्याचे उघडकीस आल्यानंतर निकृष्ट बांधकामाची उच्चस्तरीय चौकशी सुरू करण्यात आली. ही चौकशी अद्याप सुरूच असल्यामुळे केंद्र सरकारकडून देण्यात येणाऱ्या निधीत अडचणी येत आहेत. प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात ३४ गावे पूर्णत: तर ७० गावे अंशत: बाधित होतात. यात पूर्णत: बाधित ३४ पैकी २८ गावांचे तीन टप्प्यांत विविध ठिकाणी पुनर्वसन करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात १७ गावांचे पुनर्वसन करायचे होते. परंतु यापैकी सहा गावांचे पुनर्वसन न झाल्याने जलस्तर वाढविण्यात अडचणी येत आहेत. तिसऱ्या टप्प्यात १२ पैकी दोनच गावांचे पुनर्वसन झाले आहे.