शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
4
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
5
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
6
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
7
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
8
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
9
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
11
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
12
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
13
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
14
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
15
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
16
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
17
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
18
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
19
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
20
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ

गोराई, उत्तन गावांमध्ये उद्या बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2016 02:33 IST

राज्य सरकारने उत्तन-गोराई क्षेत्रांत एमएमआरडीएच्या माध्यमातून नियोजित पर्यटन व मनोरंजन क्षेत्राच्या विकास आराखड्याला नुकतीच मंजुरी दिली.

भार्इंदर : राज्य सरकारने उत्तन-गोराई क्षेत्रांत एमएमआरडीएच्या माध्यमातून नियोजित पर्यटन व मनोरंजन क्षेत्राच्या विकास आराखड्याला नुकतीच मंजुरी दिली. याला स्थानिकांनी तीव्र विरोध दर्शवला असून त्याविरोधात विविध सामाजिक संघटनांच्या सहकार्याने धारावी बेट बचाओ समितीच्या माध्यमातून रविवारी गावबंदची हाक दिली आहे.सरकारने मुंबई उपनगरांतील गोराई-मनोरी व मीरा-भार्इंदर पालिका क्षेत्रांतील उत्तन, पाली, चौक, डोंगरी, तारोडी गावांत विशेष आर्थिक क्षेत्र २००६ मध्ये प्रस्तावित केले होते. त्याविरोधात स्थानिकांनी धारावी बेट बचाओ समितीच्या माध्यमातून सतत सहा वर्षे लढा देत विकास आराखड्यावर सुमारे ३१ हजार हरकती घेतल्या. या विरोधामुळे सरकारने तो प्रस्ताव मागे घेतला. त्यानंतर २०११ मध्ये राज्य सरकारने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून गावांत विशेष पर्यटन क्षेत्र जाहीर केले. त्यात सरकारने महामंडळाची सुमारे १२०० एकर जमीन विक्रीस काढली. त्यावर, प्रस्तावित असलेल्या पंचतारांकित हॉटेलला स्थानिकांनी विरोध करून त्यातील काही जमिनी स्थानिकांच्या नावे असल्याचा दावा केला. त्यालाही मागे घेण्यास स्थानिकांनी सरकारला भाग पाडले. या गावांत मोठ्या प्रमाणात मच्छीमारांचे वास्तव्य आहे. त्यांच्यावर गंडांतर आणण्याचे सरकारचे कारस्थान असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी या क्षेत्रांना विरोध दर्शवला. त्यानंतर, राज्य सरकारने २०१२ मध्ये पुन्हा एमएमआरडीएच्या माध्यमातून पर्यटन व मनोरंजन क्षेत्र विकासाचे भूत स्थानिकांच्या मानगुटीवर बसवले आहे. या क्षेत्राच्या विकास आराखड्याला ग्रामस्थ चार वर्षे विरोध करत आहेत. त्यावर, सुमारे ४२ हजार हरकती व सूचना घेतल्यानंतरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याला मान्यता दिली. या नियोजित क्षेत्रासाठी अलीकडेच गोराई ते मनोरी खाडीदरम्यान सुमारे ६०० कोटी खर्चाच्या उड्डाणपुलाच्या बांधकामास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. (प्रतिनिधी)>इको-सेन्सेटिव्ह झोन पायदळीया क्षेत्रामुळे सरकारनेच जाहीर केलेला ‘इको-सेन्सेटिव्ह झोन’ पायदळी तुडवला जाणार असून अनेक खारफुटी क्षेत्र व हिरवळ नष्ट होणार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या आराखड्याला मंजुरी दिली असली तरी त्याला तीव्र विरोध दर्शवण्यासाठी रविवारी सर्व गावांत बंदची हाक देण्यात आल्याचे समितीचे अध्यक्ष जोसेफ घोन्सालवीस यांनी सांगितले.