शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
6
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
7
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
8
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
9
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
10
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
11
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
12
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
13
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
14
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
15
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
16
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
17
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
18
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
19
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
20
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा

गोपीनाथगडाचे लोकार्पण!

By admin | Updated: December 13, 2015 02:45 IST

गोपीनाथ मुंडे यांचे जीवन कायम संघर्षमय राहिले. त्यांच्या संघर्षातूनच भाजपाला राज्यात सत्ता मिळाली, अशी प्रांजळ कबुली भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी येथे

- प्रताप नलावडे, गोपीनाथगड (परळी)गोपीनाथ मुंडे यांचे जीवन कायम संघर्षमय राहिले. त्यांच्या संघर्षातूनच भाजपाला राज्यात सत्ता मिळाली, अशी प्रांजळ कबुली भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी येथे शनिवारी मुंडे यांचे स्मारक असलेल्या गोपीनाथगडाच्या लोकार्पण सोहळ््यात दिली.राज्यात भाजपाला वैभव प्राप्त करून देत असतानाच मुंडे यांनी तळागाळातील लोकांपर्यंत पक्षाचे काम पोहोचविण्याचे काम केले असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात मुंडे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्याच ठिकाणी गोपीनाथगडाच्या माध्यमातून त्यांचे स्मृतिस्थळ तयार करण्यात आले आहे. अष्टकोनी कमळाच्या आकारात समाधिस्थळ असून, त्याची उंची ७२ फूट आहे. त्याच्याच बाजूला २२ फूट उंचीचा त्यांचा पंचधातूपासून तयार केलेला पुतळाही उभारण्यात आला आहे. त्याचे अनावरण आणि ५० फूट उंचीच्या प्रवेशद्वाराचे उद्घाटन अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.गोपीनाथगडाची निर्मिती समाजाच्या पैशांतून झाल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. गोपीनाथरावांच्या मृत्युनंतर पंकजा यांनी नेतृत्व स्वीकारून लोकांना दिलासा दिल्याचेही ते म्हणाले. गोपीनाथगडाच्या माध्यमातून समाजातील गोरगरीब आणि मजुरांच्या आर्थिक उन्नतीचा विडा आपण उचलला असून, बाबांना अपेक्षित असलेल्या विकासाचे आणि समाजकार्याचे माध्यम म्हणून हा गड कार्यरत राहणार असल्याची ग्वाही ग्रामीण विकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. भगवानगडाचे नामदेव महाराज शास्त्री यांनी, आता पंकजाला जे काही मनातील बोलायचे असेल आणि जे काही निर्णय जाहीर करायचे असतील, ते तिने गोपीनाथगडावरून करावेत, असे सांगत भगवानगड हा आता श्रद्धेचा असेल, तर गोपीनाथगड हा राजकारणासाठी असेल, असे स्पष्ट केले. राज्याच्या प्रभारी सरोज पांडे, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महसूलमंत्री एकनाथ खडसे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, परिवहनमंत्री दिवाकर रावते, शिक्षणमंत्री विनोद तावडे, खा. प्रीतम मुंडे, खा. रामदास आठवले, खा. राजू शेट्टी, रासपचे अध्यक्ष महादेव जानकर, आ. विनायक मेटे आदी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.एक पोते भरून चेकस्मारकासाठी एक वीट आपलीही असावी, असे वाटणारे लोक हे अगदी ऊसतोडणी कामगार म्हणून काम करणारे आहेत. एका महिलेने अकरा रूपये आपल्या हातावर ठेवत गडासाठी हे माझे पैसे घे, असे अधिकारवाणीने सांगितले. गडासाठी आलेल्या पैशांचे चेकने एक पोते भरले असून, दोन कोटी रुपयांचा निधी जमा झाल्याचेही पंकजा यांनी सांगितले.