शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

गोपीनाथगडाचे लोकार्पण!

By admin | Updated: December 13, 2015 02:45 IST

गोपीनाथ मुंडे यांचे जीवन कायम संघर्षमय राहिले. त्यांच्या संघर्षातूनच भाजपाला राज्यात सत्ता मिळाली, अशी प्रांजळ कबुली भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी येथे

- प्रताप नलावडे, गोपीनाथगड (परळी)गोपीनाथ मुंडे यांचे जीवन कायम संघर्षमय राहिले. त्यांच्या संघर्षातूनच भाजपाला राज्यात सत्ता मिळाली, अशी प्रांजळ कबुली भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी येथे शनिवारी मुंडे यांचे स्मारक असलेल्या गोपीनाथगडाच्या लोकार्पण सोहळ््यात दिली.राज्यात भाजपाला वैभव प्राप्त करून देत असतानाच मुंडे यांनी तळागाळातील लोकांपर्यंत पक्षाचे काम पोहोचविण्याचे काम केले असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात मुंडे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्याच ठिकाणी गोपीनाथगडाच्या माध्यमातून त्यांचे स्मृतिस्थळ तयार करण्यात आले आहे. अष्टकोनी कमळाच्या आकारात समाधिस्थळ असून, त्याची उंची ७२ फूट आहे. त्याच्याच बाजूला २२ फूट उंचीचा त्यांचा पंचधातूपासून तयार केलेला पुतळाही उभारण्यात आला आहे. त्याचे अनावरण आणि ५० फूट उंचीच्या प्रवेशद्वाराचे उद्घाटन अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.गोपीनाथगडाची निर्मिती समाजाच्या पैशांतून झाल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. गोपीनाथरावांच्या मृत्युनंतर पंकजा यांनी नेतृत्व स्वीकारून लोकांना दिलासा दिल्याचेही ते म्हणाले. गोपीनाथगडाच्या माध्यमातून समाजातील गोरगरीब आणि मजुरांच्या आर्थिक उन्नतीचा विडा आपण उचलला असून, बाबांना अपेक्षित असलेल्या विकासाचे आणि समाजकार्याचे माध्यम म्हणून हा गड कार्यरत राहणार असल्याची ग्वाही ग्रामीण विकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. भगवानगडाचे नामदेव महाराज शास्त्री यांनी, आता पंकजाला जे काही मनातील बोलायचे असेल आणि जे काही निर्णय जाहीर करायचे असतील, ते तिने गोपीनाथगडावरून करावेत, असे सांगत भगवानगड हा आता श्रद्धेचा असेल, तर गोपीनाथगड हा राजकारणासाठी असेल, असे स्पष्ट केले. राज्याच्या प्रभारी सरोज पांडे, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महसूलमंत्री एकनाथ खडसे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, परिवहनमंत्री दिवाकर रावते, शिक्षणमंत्री विनोद तावडे, खा. प्रीतम मुंडे, खा. रामदास आठवले, खा. राजू शेट्टी, रासपचे अध्यक्ष महादेव जानकर, आ. विनायक मेटे आदी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.एक पोते भरून चेकस्मारकासाठी एक वीट आपलीही असावी, असे वाटणारे लोक हे अगदी ऊसतोडणी कामगार म्हणून काम करणारे आहेत. एका महिलेने अकरा रूपये आपल्या हातावर ठेवत गडासाठी हे माझे पैसे घे, असे अधिकारवाणीने सांगितले. गडासाठी आलेल्या पैशांचे चेकने एक पोते भरले असून, दोन कोटी रुपयांचा निधी जमा झाल्याचेही पंकजा यांनी सांगितले.