शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

#GoodBye2017: वर्षभरात शिक्षकांची सर्वाधिक आंदोलने, मराठा मोर्चाने वेधले लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 07:10 IST

मुंबईच नव्हे, तर राज्याच्या कानाकोप-यातून येणा-या पीडित, कामगार आणि शोषितांसाठी आंदोलनाची पंढरी असलेल्या आझाद मैदानावर, या वर्षीही अनेक एल्गार पाहायला व ऐकायला आले.

मुंबई : मुंबईच नव्हे, तर राज्याच्या कानाकोप-यातून येणा-या पीडित, कामगार आणि शोषितांसाठी आंदोलनाची पंढरी असलेल्या आझाद मैदानावर, या वर्षीही अनेक एल्गार पाहायला व ऐकायला आले. ‘अच्छे दिन’, ‘पारदर्शी कारभार’ व ‘विकासा’च्या मुद्द्यावर सत्तेवर आलेल्या सरकारला सत्ता गमवावी लागेल की काय? अशा आंदोलनांनीही मुंबई व आझाद मैदानावर आपली छाप सोडली. त्यात मराठा क्रांती मोर्चा हा सर्वाधिक लक्षवेधी ठरला, तर सर्वाधिक मोर्चे हे शिक्षण विभागाच्या विरोधात होते. पुढील वर्षीही ही परंपराकायम राहण्याची शक्यता दिसत आहे.काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारच्या विरोधात रण पेटविण्याची सुरुवात भारतीय जनता पार्टी व शिवसेनेच्या विरोधी पक्षनेत्यांनी आझाद मैदानातूनच केली होती. सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी बाकावर असताना, लाखो आंदोलकांना व शेकडो संघटनांना याच मैदानावर सामोरे जात आश्वासने दिली होती. त्याच आश्वासनांचा जाब मागण्यासाठी या वर्षी फक्त आझाद मैदानावर सुमारे ६ हजार १४१ आंदोलने झाली. त्यातील सर्वाधिक आंदोलने ही अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात झाली आहेत.मराठा क्रांती मोर्चाचे वादळकोपर्डी घटनेचा निकाल आणि मराठा आरक्षण या दोन महत्त्वाच्या मागण्यांसाठी मुंबईवर धडकलेल्या मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन, हे गेल्या दोन वर्षांतील सर्वांत मोठे व लक्षवेधी आंदोलन ठरले. २०१६ साली मराठा समाजाने काढलेली बाइक रॅली, तर २०१७ सालातील मोर्चाने सगळ्यांचे लक्ष वेधले. लाखोंच्यासंख्येने मुंबईवर धडकलेल्या या मोर्चाच्या शिस्तबद्धतेने सर्वांचीच मने जिंकली होती.अनुदानाचा तिढा सुटेना!वेतन अनुदानासाठी पात्र ठरलेल्या घोषित, अघोषित आणि विनाअनुदानित शाळांचा प्रश्न अद्याप कायम आहे. त्यामुळे दरवर्षी या प्रश्नावर आक्रमक होणाºया शिक्षकांचा लढा या वर्षीही सुरू होता. त्यात शासनसेवेत १ नोव्हेंबर २००५ सालापासून रुजू झालेल्या शिक्षकांच्या जुन्या पेन्शनचा मुद्दा अद्याप पेटता आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून पुढील वर्षीही सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे.>मनसेचे खळ्ळखट्ट्याकमराठी क्रांती मोर्चाप्रमाणे एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर फेरीवाल्यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली चर्चगेट येथे निघालेला मोर्चाही लक्षवेधी ठरला. या मोर्चात मनसे कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य मुंबईकरही हजारोंच्या संख्येने सामील झाले होते. राजकीय विश्लेषकांच्या दृष्टीकोनातून हा मोर्चा मनसेला राजकीय पटलावर पुनर्जीवित करणारा ठरला. त्यानंतर, मनसेने रेल्वे स्थानकांलगतच्या फेरीवाल्यांच्या विरोधात सुरू केलेले खळ्ळखट्ट्याक आंदोलन आजही मुंबईकरांमध्ये चर्चेचा विषय ठरले आहे.अल्पसंख्याकांवरील हल्ले व महागाईपेट्रोल व डिझेलच्या वाढत्या किमती, नोटाबंदी आणि देशभर अल्पसंख्याकांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ अनेक संघटनांनी छोट्या आणि मोठ्या स्तरावर आझाद मैदानात येत, या वर्षी रोष व्यक्त केला. केंद्र व राज्य शासनाविरोधात अल्पसंख्याकविरोधी असल्याची टीकाही या वेळी झाली. त्यात साहित्यिकांसह, विचारवंत, लेखक प्रथमच आझाद मैदानावर एकवटल्याचेही दिसले.अंगणवाडीतार्इंचा यशस्वी लढा!मानधनवाढ, पोषण आहारात सुधारणा, पेन्शन अशा विविध मागण्यांसाठी या वर्षी संपावर गेलेल्या अंगणवाडी कर्मचाºयांच्या कृती समितीनेही महिला शक्तीचे दर्शन घडविले. आझाद मैदानावर केलेल्या शक्तिप्रदर्शनातून अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने सरकारला नमते घ्यायला भाग पाडले. वांद्रे-कुर्ला संकुल येथे झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत अखेर मागण्या मान्य करूनघेत, अंगणवाडीतार्इंनी लोकशाही आंदोलनांची ताकद दाखवून दिली.>आंदोलनांचीआकडेवारीमहिना आंदोलनांचीसंख्याजानेवारी ६५८फेब्रुवारी ४९४मार्च ७७०एप्रिल ६८७मे ६०१जून ४९३जुलै ४८०आॅगस्ट ७११सप्टेंबर ३६९आॅक्टोबर २८५नोव्हेंबर ३४०डिसेंबर २५३(२५ तारखेपर्यंत)एकूण आंदोलने६ हजार १४१

टॅग्स :Best of 2017बेस्ट ऑफ 2017Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा