शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

रात्रभर गजबज; पण सुरक्षेचे काय?

By admin | Updated: July 1, 2016 02:21 IST

नाइटलाइफच्या निमित्ताने धनदांडग्यांची सुरू होणारी चंगळ पोलिसांसाठी मात्र डोकेदुखी ठरणारी आहे.

मुंबई : नाइटलाइफच्या निमित्ताने धनदांडग्यांची सुरू होणारी चंगळ पोलिसांसाठी मात्र डोकेदुखी ठरणारी आहे. रात्रीच्या वेळी महिला सुरक्षेबरोबरच, नशेबाज, गर्दुल्ले, स्मगलर यांसह कायदा व सुव्यवस्थेचा अतिरिक्त भार पोलिसांवर पडणार आहे. अपुऱ्या मनुष्यबळाच्या आधारावर यावर कशा पद्धतीने नियंत्रण आणायचे याबाबत पोलीस दलात चर्चा सुरू झाली आहे.मुंबई पोलीस दलातील ३५ हजार पोलिसांच्या फौजफाट्यावर मुंबईकरांची सुरक्षा आहे. मुंबईकरांना पुरेसे संरक्षण नाही. शक्ती मिल आणि इस्थर अनुह्यासारखी प्रकरणे अद्याप ताजी आहेत. मुंबईचा वाढता आवाका लक्षात घेता सुरक्षा यंत्रणा कमी पडते. रात्रीही मुंबई व्यापार-पर्यटनाच्या माध्यमातून सुरू झाल्यास त्याचा ताण नक्की येणार आहे. मुंबईला खरोखर पाश्चिमात्य देशांमधील शहरांसारखा नाइटलाइफचा दर्जा द्यायचा असल्यास सर्वप्रथम पोलिसांचे मुबलक संख्याबळ वाढविणे, त्यांचे सक्षमीकरण, आधुनिकीकरणासाठी त्यांना पुरेशा नागरी सुविधा देणे आणि कायद्यातील शिक्षा कडक करून गुन्हेगारांच्या मनात कायद्याची जरब बसविण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घ्यावे लागतील. या साऱ्यांचा विचार करता, नाइटलाइफआधी मुंबईकरांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी आग्रह धरावा आणि मगच नाइटलाइफचा अट्टाहास करणे योग्य असल्याचे निवृत्त एसीपी वसंत ढोबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.वाहतूक पोलिसांवरही ताणया निर्णयामुळे मुंबई वाहतूक पोलिसांवर मात्र कामाचा प्रचंड ताण वाढणार असल्याचे वरिष्ठ अधिकारी सांगतात. सध्या ३,३00 एवढे मनुष्यबळ मुंबई वाहतूक पोलिसांकडे असून, दुप्पट मनुष्यबळाची गरज असतानाही तेवढ्याच मनुष्यबळात काम करावे लागत आहे. लाखोंच्या संख्येने होत असलेल्या केसेस आणि कमी मनुष्यबळ असल्याने वाहतूक पोलिसांवर कामाचा प्रचंड ताण पडत आहे. नाइटलाइफला परवानगी मिळाल्याने हा ताण आणखीच वाढेल, अशी भीतीच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. दारू पिऊन वाहन चालवणे तसेच बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्या वाहनचालकांना रोखण्यासाठी २00 ते २५0च्या दरम्यान वाहतूक पोलीस तैनात असतात. नाइटलाइफ सुरू झाल्यावर त्यांची संख्या अधिक वाढवावी लागेल.‘अनेक गोष्टींची तरतूद करावी लागेल’टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सच्या रिसर्च आणि डेव्हलपमेंट विभागाच्या सहायक प्राध्यापक अस्फा डोकाडिया यांनी सांगितले, नव्या निर्णयाचे स्वागत आहे. रात्री कामावरून घरी येणाऱ्या महिलांना यामुळे दिलासा मिळेल. कोणत्याही क्षणी वस्तू मिळू शकतील. असे असले तरी या नाइटलाइफसाठी अनेक गोष्टींची तरतूद करणे आवश्यक आहे. कामगारांना यासाठी विशेष ट्रेनिंगसुद्धा देणे आवश्यक आहे. या निर्णयामुळे अनेक अडचणी सुटतील.‘रात्रीच्या वेळी सुविधा असणे चांगले’ : सामाजिक कार्यकर्ते कृष्णा चांदुगडे म्हणाले, ‘नाइटलाइफ’ या शब्दाला वेगळेच ग्लॅमर दिल्यामुळे याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. मुंबई हे शहर कधीही न थांबणारे आहे. येथे हजारो कामगार काम करीत असतात. त्यांच्यासाठी रात्रीच्या वेळी सुविधा उपलब्ध असणे चांगलेच आहे. त्यामुळे या निर्णयाला पाठिंबा आहे. सर्वसामान्यांनीही या नजरेने पाहिले तर ते वावगे वाटणार नाही.