शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

खूशखबर! गिरणी कामगारांना 50 टक्के घरे राखीव

By admin | Updated: May 17, 2017 10:50 IST

एमएमआरडीए क्षेत्रातील भाडेतत्वावरील घर योजनेत गिरणी कामागारांना 50 टक्के घरे राखीव ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 17 - एमएमआरडीए क्षेत्रातील भाडेतत्वावरील घर योजनेत गिरणी कामागारांना 50 टक्के घरे राखीव ठेवण्याचा निर्णय राज्य  सरकारने घेतला आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाडेतत्वावरील घर योजनेत गिरणी कामगारांसाठी 50 टक्के घरे राखीव ठेवण्याला मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे गिरणी कामागारांना आणखी 7700 घरे उपलब्ध होणार आहेत. 
 
यापूर्वी राज्य सरकारने गिरणी कामगारांना 10, 768 घरांचे वाटप केले आहे. आता हाच आकडा 18,468 होणार आहे. समाजातील सर्व घटकांना परवडणारी घरे उपलब्ध करुन देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी टि्वटरवरुन या निर्णयाची माहिती दिली. 
 
राज्य सरकारकडून आतापर्यंत बंद गिरण्याच्या जागांवर बांधण्यात आलेल्या घरांचे गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांना वाटप केले आहे. म्हाडाच्या माध्यमातून राज्य सरकारने ही घरे बांधली आहेत. प्रत्यक्षात गिरणी कामागारांचा आकडा लाखोच्या घरात आहे. त्यातुलनेत घराची संख्या तुटपुंजी आहे.