शहरं
Join us  
Trending Stories
1
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
3
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
4
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
5
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
6
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
7
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
8
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
9
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
10
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
11
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
12
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
13
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
14
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
15
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
16
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
17
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
18
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
19
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
20
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा

कऱ्हाडात रिक्षावाल्यांना ‘अच्छे दिन’!

By admin | Updated: December 25, 2014 00:15 IST

नव्या वर्षाच्या मुहूर्तावर ‘ड्रेसकोड’ : पोलीस उपधीक्षकांचा पुढाकार, शिस्तीसाठीही प्रयत्न

कऱ्हाड : शहरातील रस्त्यांवर सध्या शेकडो रिक्षा धावतायत; पण कधी प्रवाशांशी होणाऱ्या वादामुळे तर कधी अंतर्गत कलहामुळे रिक्षा व्यवसाय वारंवार चर्चेत येतो. ज्यावेळी अशी वादाची प्रकरणे पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचतात, त्यावेळी त्याचा त्रासही रिक्षावाल्यालाच सहन करावा लागतो. ही परिस्थिती बदलण्यासाठी आणि या व्यावसायिकांना शिस्त लावण्यासाठी आता कऱ्हाडच्या पोलीस उपाधीक्षकांनीच पुढाकार घेतलाय. सर्व रिक्षा संघटनांनाही त्यासाठी सरसावल्या आहेत. कऱ्हाडसह परिसरामध्ये परवानाधारक रिक्षांची संख्या एक हजार सातशेच्या आसपास असून, प्रत्यक्षात चार हजारांहून अधिक रिक्षांमधून प्रवासी वाहतूक केली जात आहे. त्यामुळे परवानाधारक व्यावसायिकांना त्याचा मोठा फटका सहन करावा लागतोय. कधी-कधी परवानाधारक व खासगी रिक्षा व्यावसायिकांमध्ये वादाचेही प्रसंग उद्भवतात. ही परिस्थिती बदलण्यासाठी दोन दिवसांपूर्वी रिक्षा चालक-मालक संघटना व उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांसह परिवाहन अधिकाऱ्यांची बैठक पार पडली़ बैठकीमध्ये रिक्षा चालक-मालकांच्या अडीअडचणींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच उपाधीक्षक व परिवहन अधिकाऱ्यांनी त्यांना शिस्तीबाबत मार्गदर्शनही केली. दरम्यान, या व्यवसायाला मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी रिक्षा चालक व मालकांचे व्यक्तिमत्त्व बदलण्याची गरज बैठकीवेळी व्यक्त झाली. रिक्षाचालकांनी प्रवासी वाहतुकीचे नियम पाळण्याबरोबरच त्यांना इतर सुचनाही बैठकीवेळी करण्यात आल्या. दरम्यान, १ जानेवारी २०१५ पासून शहरातल्या परवानाधारक रिक्षा चालकांसाठी खाकी पोशाख सक्तीचा करण्यात आला आहे. पोशाखावर बॅच असणेही बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच रिक्षाच्या मालकांसाठी पांढऱ्या रंगाचा पोषाख सक्तीचा करण्यात आला आहे. प्रवासी वाहतूक करताना ज्या रिक्षाचालक-मालकांकडे अधिकृत परवाना नसेल त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी मितेश घट्टे व परिवहन अधिकारी चैतन्य कणसे यांनी पुढाकार घेतला असून, नववर्षामध्ये रिक्षा व्यावसायिकांनी प्रशासनास सहकार्य करून बदल घडवावा, असे आवाहन बैठकीदरम्यान करण्यात आले. (प्रतिनिधी)

 

रिक्षा संघटनांच्या मागण्या

बेकायदा प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी रिक्षांच्या कागदपत्रांची त्वरित तपासणी करून शासन नियमाप्रमाणे संबंधित रिक्षांचा रंग पांढरा असावा. परमिट उतरलेल्या रिक्षा तोच रंग व क्रमांकावर व्यवसाय करीत असून, त्यांच्यावर कारवाई व्हावी. परमिट असलेली रिक्षा कोणत्याही गेटवर थांबेल. गेटवर रिक्षा लावण्यास जो विरोध करेल, त्याच्यावर पोलिसांनी कारवाई करावी. अ‍ॅपेरिक्षा शहरातून बाहेर जाताना व शहरात प्रवेश करताना त्यामध्ये चारच प्रवासी असावेत. रिक्षाचालक व काही वाहतूक पोलिसांमध्ये असलेल्या मित्रतेमुळे पोलीस आणि संघटनाही बदनाम होते. संबंधित पोलिसांना समज द्यावी. १ जानेवारीपासून रिक्षांच्या कागदपत्रांची तपासणी करून पोलिसांच्या वतीने तपासणी केलेल्या रिक्षावर स्टिकर लावण्यात यावेत.

 

सर्वसामान्यांच्या दृष्टीने रिक्षा हे प्रवासाचे महत्त्वाचे वाहन आहे. मात्र, दुर्दैवाने काही चालकांतील चुकीच्या प्रवृत्तीमुळे रिक्षा व्यावसायिकांची निष्ठा व उत्तरदायित्व याबाबत समाजामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण होते. रिक्षाचालकाने वर्दी घातल्यास सुखद चित्र निर्माण होईल. - मितेश घट्टे, पोलीस उपाधीक्षक