शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
5
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
6
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
7
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
8
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
9
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
10
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
11
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
12
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
13
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
14
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
15
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
16
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
17
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
18
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
19
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
20
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा

कऱ्हाडात रिक्षावाल्यांना ‘अच्छे दिन’!

By admin | Updated: December 25, 2014 00:15 IST

नव्या वर्षाच्या मुहूर्तावर ‘ड्रेसकोड’ : पोलीस उपधीक्षकांचा पुढाकार, शिस्तीसाठीही प्रयत्न

कऱ्हाड : शहरातील रस्त्यांवर सध्या शेकडो रिक्षा धावतायत; पण कधी प्रवाशांशी होणाऱ्या वादामुळे तर कधी अंतर्गत कलहामुळे रिक्षा व्यवसाय वारंवार चर्चेत येतो. ज्यावेळी अशी वादाची प्रकरणे पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचतात, त्यावेळी त्याचा त्रासही रिक्षावाल्यालाच सहन करावा लागतो. ही परिस्थिती बदलण्यासाठी आणि या व्यावसायिकांना शिस्त लावण्यासाठी आता कऱ्हाडच्या पोलीस उपाधीक्षकांनीच पुढाकार घेतलाय. सर्व रिक्षा संघटनांनाही त्यासाठी सरसावल्या आहेत. कऱ्हाडसह परिसरामध्ये परवानाधारक रिक्षांची संख्या एक हजार सातशेच्या आसपास असून, प्रत्यक्षात चार हजारांहून अधिक रिक्षांमधून प्रवासी वाहतूक केली जात आहे. त्यामुळे परवानाधारक व्यावसायिकांना त्याचा मोठा फटका सहन करावा लागतोय. कधी-कधी परवानाधारक व खासगी रिक्षा व्यावसायिकांमध्ये वादाचेही प्रसंग उद्भवतात. ही परिस्थिती बदलण्यासाठी दोन दिवसांपूर्वी रिक्षा चालक-मालक संघटना व उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांसह परिवाहन अधिकाऱ्यांची बैठक पार पडली़ बैठकीमध्ये रिक्षा चालक-मालकांच्या अडीअडचणींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच उपाधीक्षक व परिवहन अधिकाऱ्यांनी त्यांना शिस्तीबाबत मार्गदर्शनही केली. दरम्यान, या व्यवसायाला मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी रिक्षा चालक व मालकांचे व्यक्तिमत्त्व बदलण्याची गरज बैठकीवेळी व्यक्त झाली. रिक्षाचालकांनी प्रवासी वाहतुकीचे नियम पाळण्याबरोबरच त्यांना इतर सुचनाही बैठकीवेळी करण्यात आल्या. दरम्यान, १ जानेवारी २०१५ पासून शहरातल्या परवानाधारक रिक्षा चालकांसाठी खाकी पोशाख सक्तीचा करण्यात आला आहे. पोशाखावर बॅच असणेही बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच रिक्षाच्या मालकांसाठी पांढऱ्या रंगाचा पोषाख सक्तीचा करण्यात आला आहे. प्रवासी वाहतूक करताना ज्या रिक्षाचालक-मालकांकडे अधिकृत परवाना नसेल त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी मितेश घट्टे व परिवहन अधिकारी चैतन्य कणसे यांनी पुढाकार घेतला असून, नववर्षामध्ये रिक्षा व्यावसायिकांनी प्रशासनास सहकार्य करून बदल घडवावा, असे आवाहन बैठकीदरम्यान करण्यात आले. (प्रतिनिधी)

 

रिक्षा संघटनांच्या मागण्या

बेकायदा प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी रिक्षांच्या कागदपत्रांची त्वरित तपासणी करून शासन नियमाप्रमाणे संबंधित रिक्षांचा रंग पांढरा असावा. परमिट उतरलेल्या रिक्षा तोच रंग व क्रमांकावर व्यवसाय करीत असून, त्यांच्यावर कारवाई व्हावी. परमिट असलेली रिक्षा कोणत्याही गेटवर थांबेल. गेटवर रिक्षा लावण्यास जो विरोध करेल, त्याच्यावर पोलिसांनी कारवाई करावी. अ‍ॅपेरिक्षा शहरातून बाहेर जाताना व शहरात प्रवेश करताना त्यामध्ये चारच प्रवासी असावेत. रिक्षाचालक व काही वाहतूक पोलिसांमध्ये असलेल्या मित्रतेमुळे पोलीस आणि संघटनाही बदनाम होते. संबंधित पोलिसांना समज द्यावी. १ जानेवारीपासून रिक्षांच्या कागदपत्रांची तपासणी करून पोलिसांच्या वतीने तपासणी केलेल्या रिक्षावर स्टिकर लावण्यात यावेत.

 

सर्वसामान्यांच्या दृष्टीने रिक्षा हे प्रवासाचे महत्त्वाचे वाहन आहे. मात्र, दुर्दैवाने काही चालकांतील चुकीच्या प्रवृत्तीमुळे रिक्षा व्यावसायिकांची निष्ठा व उत्तरदायित्व याबाबत समाजामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण होते. रिक्षाचालकाने वर्दी घातल्यास सुखद चित्र निर्माण होईल. - मितेश घट्टे, पोलीस उपाधीक्षक