शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
2
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
3
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
4
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
5
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
6
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
7
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
8
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
9
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
10
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
11
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
12
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
13
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
14
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
15
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
16
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
17
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
18
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
19
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
20
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?

गोंंदिया, भंडारा जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची मुसंडी

By admin | Updated: July 7, 2015 02:18 IST

गोंदिया व भंडारा जिल्हा परिषदेसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी झाली. सर्वच राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेची ठरलेल्या या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे.

गोंदिया/ भंडारा : गोंदिया व भंडारा जिल्हा परिषदेसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी झाली. सर्वच राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेची ठरलेल्या या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली असून, भाजपाचा पुरता सफाया केला आहे. गोंदिया जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कोणालाही स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याने त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. एकूण ५३ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक २०, भाजपाला १७ तर काँग्रेसला १६ जागा मिळाल्या आहेत. २०१० च्या निवडणुकीच्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेसला ७ तर काँग्रेसला ६ जागा जास्त मिळाल्या असून,भाजपाला १० जागा गमवाव्या लागल्या. जिल्ह्णात चारपैकी भाजपाचे तीन आमदार व एक खासदार असताना अवघ्या ७ महिन्यांत जिल्ह्णातील मतदारांनी भाजपा उमेदवारांना नाकारणे हा त्यांच्यासाठी चिंतनाचा विषय झाला आहे.भंडारा जिल्ह्णातील आठपैकी अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी, देवरी आणि गोरेगाव या पंचायत समित्यांवर वर्चस्व कायम राखण्यात भाजपाला यश आले आहे. मात्र यापैकी अर्जुनी मोरगाव पंचायत समितीत भाजपला ७ तर राष्ट्रवादी काँग्रेसला ४ आणि काँग्रेसला ३ जागा मिळाल्या आहेत. भंडारा, पवनी, लाखांदूर व लाखनी पंचायत समितीत काँग्रेसने बाजी मारली आहे. तुमसर, साकोली, मोहाडीत भाजपाने गड राखला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)---------आमदारांच्या सौभाग्यवतीचा पराभवआमगाव-देवरीतील भाजपाचे आमदार संजय पुराम यांच्या पत्नी तथा जिल्हा परिषदेच्या मावळत्या महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम यांचा काँग्रेसच्या उषा शहारे यांनी २९९ मतांनी त्यांचा पराभव केला़----------भाजपाच्या शेतकरी विरोधी धोरणाला कंटाळून मतदारांनी जो जनाधार दिला त्याचा आम्ही कधीही अवमान करणार नाही. भाजपाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याच्या भाजपाच्या षडयंत्राला जनतेने धडा शिकविला आहे. - विजय वडेट्टीवार,उपनेते, विधानसभा ----------शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्याचा परिणाम भाजपाला दोन्ही जिल्ह्णांमध्ये भोगावा लागला. लोकसभा निवडणुकीत जरी बदल घडून आला असला तरी आपण केलेल्या विकास कामांची जाण आता मतदारांना होऊ लागली आहे. त्यामुळे त्यांनी भाजपाला नाकारत हा कौल दिला आहे.  - खासदार प्रफुल पटेल, ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेस-----------वर्तमान स्थितीत मतदार राजाने दिलेल्या जनाधाराचा आम्ही सन्मान करतो. भाजपाला कमी जागा का मिळाल्या यावर चिंतन केले जाईल. - राजकुमार बडोले, सामाजिक न्याय मंत्री.