शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
4
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
5
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
6
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
7
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
8
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
9
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
10
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
11
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
12
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
13
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
14
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
15
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
16
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
17
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
18
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
19
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
20
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

गोंंदिया, भंडारा जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची मुसंडी

By admin | Updated: July 7, 2015 02:18 IST

गोंदिया व भंडारा जिल्हा परिषदेसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी झाली. सर्वच राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेची ठरलेल्या या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे.

गोंदिया/ भंडारा : गोंदिया व भंडारा जिल्हा परिषदेसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी झाली. सर्वच राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेची ठरलेल्या या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली असून, भाजपाचा पुरता सफाया केला आहे. गोंदिया जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कोणालाही स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याने त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. एकूण ५३ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक २०, भाजपाला १७ तर काँग्रेसला १६ जागा मिळाल्या आहेत. २०१० च्या निवडणुकीच्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेसला ७ तर काँग्रेसला ६ जागा जास्त मिळाल्या असून,भाजपाला १० जागा गमवाव्या लागल्या. जिल्ह्णात चारपैकी भाजपाचे तीन आमदार व एक खासदार असताना अवघ्या ७ महिन्यांत जिल्ह्णातील मतदारांनी भाजपा उमेदवारांना नाकारणे हा त्यांच्यासाठी चिंतनाचा विषय झाला आहे.भंडारा जिल्ह्णातील आठपैकी अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी, देवरी आणि गोरेगाव या पंचायत समित्यांवर वर्चस्व कायम राखण्यात भाजपाला यश आले आहे. मात्र यापैकी अर्जुनी मोरगाव पंचायत समितीत भाजपला ७ तर राष्ट्रवादी काँग्रेसला ४ आणि काँग्रेसला ३ जागा मिळाल्या आहेत. भंडारा, पवनी, लाखांदूर व लाखनी पंचायत समितीत काँग्रेसने बाजी मारली आहे. तुमसर, साकोली, मोहाडीत भाजपाने गड राखला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)---------आमदारांच्या सौभाग्यवतीचा पराभवआमगाव-देवरीतील भाजपाचे आमदार संजय पुराम यांच्या पत्नी तथा जिल्हा परिषदेच्या मावळत्या महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम यांचा काँग्रेसच्या उषा शहारे यांनी २९९ मतांनी त्यांचा पराभव केला़----------भाजपाच्या शेतकरी विरोधी धोरणाला कंटाळून मतदारांनी जो जनाधार दिला त्याचा आम्ही कधीही अवमान करणार नाही. भाजपाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याच्या भाजपाच्या षडयंत्राला जनतेने धडा शिकविला आहे. - विजय वडेट्टीवार,उपनेते, विधानसभा ----------शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्याचा परिणाम भाजपाला दोन्ही जिल्ह्णांमध्ये भोगावा लागला. लोकसभा निवडणुकीत जरी बदल घडून आला असला तरी आपण केलेल्या विकास कामांची जाण आता मतदारांना होऊ लागली आहे. त्यामुळे त्यांनी भाजपाला नाकारत हा कौल दिला आहे.  - खासदार प्रफुल पटेल, ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेस-----------वर्तमान स्थितीत मतदार राजाने दिलेल्या जनाधाराचा आम्ही सन्मान करतो. भाजपाला कमी जागा का मिळाल्या यावर चिंतन केले जाईल. - राजकुमार बडोले, सामाजिक न्याय मंत्री.