शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
4
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
5
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
6
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
7
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
8
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
9
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
10
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
11
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
12
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
13
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
14
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
15
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
16
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
17
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
18
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
19
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
20
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

हुंडा विरोधासाठी गोंधळी समाजाची सोशल चळवळ

By admin | Updated: June 29, 2016 20:21 IST

सोशल मीडिया चुुकीच्या हातात पडले तर कसा विध्वंस होऊ शकतो हे आपण वेळोवेळी बघतच आहोत. पण या माध्यमाचा सकारात्मक वापर केल्यास त्याचे सोनेही होऊ शकते याचा

सतीश डोंगरे, नाशिकसोशल मीडिया चुुकीच्या हातात पडले तर कसा विध्वंस होऊ शकतो हे आपण वेळोवेळी बघतच आहोत. पण या माध्यमाचा सकारात्मक वापर केल्यास त्याचे सोनेही होऊ शकते याचा जणू काही आदर्शच गोंधळी समाजाने घालून दिला आहे. हुंड्यासारख्या अनिष्ट पद्धतीला विरोध करण्यासाठी समाजातील समविचारी लोकांनी एकत्र येऊन ‘व्हॉट्स अ‍ॅप आणि हाईक’वर ग्रुप तयार करून या विरोधात चळवळ उभी केली आहे. या ग्रुपमध्ये राज्यातीलच नव्हे तर राज्याबाहेरील समाजातील लोक सदस्य आहेत.वास्तविक गोंधळी समाजात पूर्वीपासूनच हुंडा पद्धतीला प्राधान्य दिले जाते. अलीकडच्या काळात यात काहीसा बदल झाला असून, हुंडा ‘नवऱ्या मुलाला महागड्या वस्तूच्या स्वरूपात किंवा वधूकडच्या लोकांनी दोन्ही बाजूचे लग्न धुमधडाक्यात लावून द्यावे’ या अटीवर घेतला जातो; मात्र यामुळे वधूकडील मंडळींवर येणारा आर्थिक ताण हा असह्य असतो. यासर्व बाबींचा सारासार विचार करून नाशिकमधील विजय रेणुके यांनी सोशल मीडियावर हुंडाविरोधी चळवळ उभारण्याचे ठरविले. त्यासाठी सुरुवातीला त्यांनी व्हॉट्स अ‍ॅपवर ‘शुभमंगल गोंधळी’ या नावाने गु्रप तयार केला.

                                            

ग्रुपच्या माध्यमातून इच्छित वधू-वर शोधले जाऊ लागले; मात्र त्याचबरोबर हुंडाविरोधी सूरही उमटू लागला. पुढे हुंड्याला पाठबळ देणारे अन् हुंड्याला विरोध करणारे असे दोन गट समोर आले. परंतु हुंड्यामुळे होणारे दूरगामी परिणाम बघता हुंड्याला पाठबळ देणारी मंडळी काही दिवसांमध्येच हुंडाविरोधी झाली. त्यानंतर ग्रुपचे नाव ‘हुंडा विरोधी वधू-वर (गोंधळी)’ असे ठेवण्यात आले. ग्रुपमधील सदस्यांची वाढती संख्या लक्षात घेता ‘हाईक’ या सोशल माध्यमावर हा ग्रुप सध्या चालविला जात आहे. ग्रुपमध्ये वधू-वरांचा सहभाग अधिक असून समाजात व्यापक जनजागृती करण्याचे काम केले जात आहे. गु्रपमध्ये २६० सदस्य‘हुंडाविरोधी वधू-वर ग्रुप (गोंधळी)’ या ग्रुपमध्ये महाराष्ट्रासह इतर राज्यातील तब्बल २६० सदस्य आहेत. यामध्ये समाजातील तरुण-तरुणी सदस्य आहेत. त्याचबरोबर २० टक्के पालकांचादेखील समावेश आहे. ही सर्व मंडळी ‘हुंडा देणार नाही अन् घेणारही नाही’ या तत्त्वाप्रमाणे ग्रुपमध्ये सहभागी झाले आहेत. गेल्या वर्षभरापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून हुंडाविरोधी चळवळ चालविली जात आहे. ‘हुंडाविरोधी वधू-वर (गोंधळी)’ या ग्रुपमुळे समाजात हुंडाविरोधी गट निर्माण झाला आहे. हुंड्यामुळे होणारे दुष्परिणाम एकमेकांना शेअर केले जात असल्याने लोकांमध्ये चांगल्या पद्धतीने जनजागृती होत आहे. त्यातच ग्रुपमध्ये सदस्यांची संख्या वाढतच असल्याने समाजातील लोक हुंडा या पद्धतीला कडाडून विरोध करीत असल्याचे बघावयास मिळत आहे. - विजय रेणुके, ग्रुप अ‍ॅडमिन