शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

हुंडा विरोधासाठी गोंधळी समाजाची सोशल चळवळ

By admin | Updated: June 29, 2016 20:21 IST

सोशल मीडिया चुुकीच्या हातात पडले तर कसा विध्वंस होऊ शकतो हे आपण वेळोवेळी बघतच आहोत. पण या माध्यमाचा सकारात्मक वापर केल्यास त्याचे सोनेही होऊ शकते याचा

सतीश डोंगरे, नाशिकसोशल मीडिया चुुकीच्या हातात पडले तर कसा विध्वंस होऊ शकतो हे आपण वेळोवेळी बघतच आहोत. पण या माध्यमाचा सकारात्मक वापर केल्यास त्याचे सोनेही होऊ शकते याचा जणू काही आदर्शच गोंधळी समाजाने घालून दिला आहे. हुंड्यासारख्या अनिष्ट पद्धतीला विरोध करण्यासाठी समाजातील समविचारी लोकांनी एकत्र येऊन ‘व्हॉट्स अ‍ॅप आणि हाईक’वर ग्रुप तयार करून या विरोधात चळवळ उभी केली आहे. या ग्रुपमध्ये राज्यातीलच नव्हे तर राज्याबाहेरील समाजातील लोक सदस्य आहेत.वास्तविक गोंधळी समाजात पूर्वीपासूनच हुंडा पद्धतीला प्राधान्य दिले जाते. अलीकडच्या काळात यात काहीसा बदल झाला असून, हुंडा ‘नवऱ्या मुलाला महागड्या वस्तूच्या स्वरूपात किंवा वधूकडच्या लोकांनी दोन्ही बाजूचे लग्न धुमधडाक्यात लावून द्यावे’ या अटीवर घेतला जातो; मात्र यामुळे वधूकडील मंडळींवर येणारा आर्थिक ताण हा असह्य असतो. यासर्व बाबींचा सारासार विचार करून नाशिकमधील विजय रेणुके यांनी सोशल मीडियावर हुंडाविरोधी चळवळ उभारण्याचे ठरविले. त्यासाठी सुरुवातीला त्यांनी व्हॉट्स अ‍ॅपवर ‘शुभमंगल गोंधळी’ या नावाने गु्रप तयार केला.

                                            

ग्रुपच्या माध्यमातून इच्छित वधू-वर शोधले जाऊ लागले; मात्र त्याचबरोबर हुंडाविरोधी सूरही उमटू लागला. पुढे हुंड्याला पाठबळ देणारे अन् हुंड्याला विरोध करणारे असे दोन गट समोर आले. परंतु हुंड्यामुळे होणारे दूरगामी परिणाम बघता हुंड्याला पाठबळ देणारी मंडळी काही दिवसांमध्येच हुंडाविरोधी झाली. त्यानंतर ग्रुपचे नाव ‘हुंडा विरोधी वधू-वर (गोंधळी)’ असे ठेवण्यात आले. ग्रुपमधील सदस्यांची वाढती संख्या लक्षात घेता ‘हाईक’ या सोशल माध्यमावर हा ग्रुप सध्या चालविला जात आहे. ग्रुपमध्ये वधू-वरांचा सहभाग अधिक असून समाजात व्यापक जनजागृती करण्याचे काम केले जात आहे. गु्रपमध्ये २६० सदस्य‘हुंडाविरोधी वधू-वर ग्रुप (गोंधळी)’ या ग्रुपमध्ये महाराष्ट्रासह इतर राज्यातील तब्बल २६० सदस्य आहेत. यामध्ये समाजातील तरुण-तरुणी सदस्य आहेत. त्याचबरोबर २० टक्के पालकांचादेखील समावेश आहे. ही सर्व मंडळी ‘हुंडा देणार नाही अन् घेणारही नाही’ या तत्त्वाप्रमाणे ग्रुपमध्ये सहभागी झाले आहेत. गेल्या वर्षभरापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून हुंडाविरोधी चळवळ चालविली जात आहे. ‘हुंडाविरोधी वधू-वर (गोंधळी)’ या ग्रुपमुळे समाजात हुंडाविरोधी गट निर्माण झाला आहे. हुंड्यामुळे होणारे दुष्परिणाम एकमेकांना शेअर केले जात असल्याने लोकांमध्ये चांगल्या पद्धतीने जनजागृती होत आहे. त्यातच ग्रुपमध्ये सदस्यांची संख्या वाढतच असल्याने समाजातील लोक हुंडा या पद्धतीला कडाडून विरोध करीत असल्याचे बघावयास मिळत आहे. - विजय रेणुके, ग्रुप अ‍ॅडमिन