शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

बालभारतीच्या सोनेरी पानांचे डॉक्युमेंटेशन

By admin | Updated: March 6, 2016 01:17 IST

आठवणींतील कविता, कलाकृतींचा कप्पा जिवंत ठेवणारी ‘बालभारती’...!! प्रत्येक पिढीला या नावात आपलेपणाचा ओलावा अनुभवता येतो

पुणे : आठवणींतील कविता, कलाकृतींचा कप्पा जिवंत ठेवणारी ‘बालभारती’...!! प्रत्येक पिढीला या नावात आपलेपणाचा ओलावा अनुभवता येतो. शालेय जीवनाशी नाळ जुळलेल्या या रेशमीबंधाचे विविध पैलू आता सोनेरी पानांमधून उलगडणार आहेत. बालभारतीच्या इतिहासापासून ते विकासाचा, वाढीचा प्रत्येक टप्पा ‘कॉफीटेबल पुस्तका’तून पुढील पिढ्यांना अनुभवता येणार आहे. सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त या सर्व टप्प्यांचे पुस्तक, डिजिटल अशा दोन्ही पद्धतीने दस्तऐवजीकरण होणार आहे.महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ म्हणजेच बालभारतीचे यंदा हे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. या बालभारतीची पिढ्यान्पिढ्यांची नाळ आहे. शालेय जीवन तर बालभारतीशिवाय अपूर्णच. त्यामुळे प्रत्येकासाठीच जिव्हाळ्याची असणाऱ्या बालभारतीत पन्नाशीत पदार्पण करताना, मागील कालखंडाचा मागोवा घेण्याचे ठरवले आहे. ५० वर्षांतील बालभारतीचा इतिहास, बदल, ते नव्या तंत्रज्ञानाकडे वाटचाल हे सगळे महत्त्वाचे टप्पे आहेत; मात्र त्यांचे योग्य वेळी जतन न झाल्यास काळाच्या ओघात त्या संदर्भातील दस्तऐवजच नष्ट होऊन जाईल. त्यामुळे येथील प्रत्येक गोष्टीचे जतन करण्याची गरज ओळखून बालभारतीने दस्तऐवजीकरण करण्याचे ठरविले आहे. यासंदर्भात शुक्रवारी बैठक घेऊन पुढील रूपरेषा ठरविण्यात आली आहे. दस्तऐवजीकरणामध्ये कॉफीटेबल पुस्तक, चित्रफीत व माहितीपुस्तिका हा महत्त्वाचा भाग राहणार आहे. कॉफीटेबल पुस्तकाचे स्वरूप इंग्रजी व मराठी अशा दोन्ही भाषांत राहणार आहे. मात्र, पुस्तकात ठळक घटकांचा समावेश होणार असून, विस्तृत स्वरूपातील माहिती ही चित्रफीत स्वरूपात, तसेच माहिती पुस्तिकांची निर्मिती केली जाणार आहे. (प्रतिनिधी)