शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

गोल्डन गँगने केली महिलांची कोंडी!

By admin | Updated: July 13, 2017 03:43 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेतील ६५ नगरसेविकांची गोल्डन गँगने कोंडी केली

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील ६५ नगरसेविकांची गोल्डन गँगने कोंडी केली असून त्यांच्या प्रभागात एकही विकासकाम होऊ दिले जात नसल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट बुधवारी या नगरसेविकांनी केला. विधीमंडळाच्या महिला हक्क व कल्याण समितीसमोर त्यांनी महिलांची कशी कोंडी केली जाते, त्याचा पाढा वाचला. पालिकेच्या दहा प्रभाग समित्या, शिक्षण आणि महिला बाल कल्याण समितीवर महिला सभापती आहेत. पण नावापुरते महिलाराज आहे. प्रत्यक्षात नगरसेवकांची गोल्डन गँग सक्रीय आहे. त्या गँगकडून ई टेंडरिंगमध्येही रिंग केली जाते. महिला नगरसेविकांच्या प्रभागात विकास कामे केली जात नाहीत. पालिकाच ‘जेंडरबायस’ आहे असे मुद्दे त्यांनी मांडल्याने अखेर समितीने आयुक्त वेलरासू, अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांच्यासह अधिकाऱ्यांना बोलावून त्यांच्या कानी हे मुद्दे घातले. समितीच्या अध्यक्षा मनीषा चौधरी यांच्यासह सदस्या विद्या चव्हाण, दीपिका चव्हाण, स्मिता वाघ, सिमा हिरे आणि हुस्नबानू खलिफे यांनी महापालिकेला भेट दिली आणि पालिकेतील ४० नगरसेविकांशी संवाद साधला. यावेळी प्रामुख्याने महिला-बाल कल्याण समितीच्या सभापती वैशाली पाटील यांच्यासह नगरसेविका छाया वाघमारे, आशालता बाबर, कस्तुरी देसाई, रेखा चौधरी, प्रेमा म्हात्रे आदी नगरसेविका उपस्थित होत्या. पण नगरसेविकांनी काय मुद्दे मांडले, ते सांगण्यास समिती सदस्यांनी नकार दिला. याचा गोपनीय अहवाल सरकारला सादर करणार असल्याचे चौधरी यांनी सांगितले. पालिकेत निवडून आल्याला दीड वर्षे लोटले तरी नगरसेविकांच्या प्रभागात विकासकामे केली जात नाहीत. कामांच्या फायली घेऊन नगरसेविकांनाच प्रत्येक अधिकाऱ्याच्या टेबलावर जावे लागते. पण निधी नसल्याने विकासकामे केली जाणार नाही, असे सांगितले जाते. पालिकेत गोल्डन गँग सक्रीय आहे. या गँगकडून जास्तीत जास्त विकास कामे करून घेतली जातात. ई टेंडर प्रक्रियेत रिंग केली जाते. एखादे टेंडर स्वीकारणे अथवा नाकारण्याचा निर्णय या गँगला विचारूनच घेतला जातो. त्याचा फटका महिलांच्या प्रभागातील विकासकामांना बसतो. या गोल्डन गँगने महापालिका धुवून खाल्ली आहे. असेच सुरू राहिले, तर येत्या दहा वर्षात पालिका दिवाळखोरीत जाईल, अशी भीती महिलांनी व्यक्त केली. २७ गावातील जलवाहिन्यांचे टेंडर निघाले, पण त्या कंत्राटदाराला कार्यादेश दिला जात नाही. आता तर या गँगला, रिंगला कंटाळून कामांसाठी ठेकेदार पुढे येत नसल्याचे महिलांनी सांगितले.महापौरही लक्ष्य : पालिकेत निम्म्या संख्येने असलेल्या महिला सदस्यांचे नेमके काय प्रश्न आहेत, त्यांची कशी कोंडी केली जाते, त्यांच्या अडचणी समजावून घेण्यासाठी दीड वर्षात महापौरांनी साधी बैठकही घेतली नाही. आयुक्तांनी चर्चा केली नाही, याकडे नगरसेविकांनी लक्ष वेधले. >स्वच्छतागृहात पाणी हवे!समितीसमोर प्रश्न आणि म्हणणे मांडताना महिलांनी जे मुद्दे मांडले, त्यात इतक्या साध्या मागण्या होत्या की समितीचे सदस्यही हैराण झाले. महिलांची स्वच्छतागृहे स्वच्छ असावी. तेथे पाणी असावे, यासारखे मुद्दे मांडले गेले.पालिका हद्दीत महिला भवन उभारावे, स्वच्छतागृहे वाढवावी, तेथे महिला सफाई कर्मचारी असावे, डोंबिवलीतील सृतिकागृह सुरु करावे, रुग्णालयात प्रसुतीसाठी येणाऱ्या महिलांशी परिचारिका व स्टाफ अत्यंत वाईट शब्दात बोलतो. वाईट वागणूक देतो. ते थांबवावे, प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांना कायमच औषधांचा तुटवडा असल्याचे सांगितले जाते. त्याचा एकदाच सोक्षमोक्ष लावावा. नोकरदार महिलांसाठी होस्टेल असावे, महिला विशेष बस सुरु करावी, शाळेत मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिन पुरविले जावेत, अशा मागण्याचे निवेदनच नगरसेविकांनी समितीला सादर केले.