शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

यंदा उन्हाळा असणार अधिक दाहक

By admin | Updated: April 2, 2016 04:06 IST

यंदा मान्सून चांगला बरसेल, अशी आनंददायक बातमी असली तरी त्याआधी उन्हाळ््याच्या अधिक दाहक झळा सोसाव्या लागणार आहेत. प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात

पुणे : यंदा मान्सून चांगला बरसेल, अशी आनंददायक बातमी असली तरी त्याआधी उन्हाळ््याच्या अधिक दाहक झळा सोसाव्या लागणार आहेत. प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पुढच्या चार दिवसांत उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. देशभरात कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा वाढणार असल्याचे यापूर्वीच हवामान विभागाने जाहीर केले आहे. त्याचाच काहीसा अनुभव एप्रिलच्या पहिल्याच दिवसापासून येण्यास सुरुवात झाली आहे. येत्या काळात मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीच्या भागाला तीव्र उष्णतेच्या लाटेचा फटका बसू शकतो. एप्रिल ते जून या काळात देशभरात उन्हाचा तडाखा अधिक तीव्र राहील, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाचे (आयएमडी) उपमहासंचालक डॉ. शिवानंद पै यांनी सांगितले. १९०१ पासूनचा उन्हाळ्याचा इतिहास पाहता २०१५ या वर्षी तिसऱ्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. यंदा त्यापेक्षा अधिक विक्रमी तापमान नोंदविले जाण्याची शक्यता आहे. असा घेतला जातो अंदाज...केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान व पृथ्वी विज्ञान मंत्री हर्ष वर्धन यांनी शुक्रवारी आयएमडीच्या पुण्यातील कार्यालयाला भेट दिली. समुद्रातील वातावरण आणि वातावरण बदलासंबंधी मॉडेलचा अभ्यास करून उन्हाळ्याच्या तीव्रतेचा अंदाज दिला जातो. याच मॉडेलच्या आधारावर आयएमडीने दर पाच दिवसांनी उन्हासंबंधी सावधगिरीचा इशारा देण्याचे ठरविले आहे. त्यानुसार उष्णतेच्या लाटेचा अंदाज देण्यात आला आहे. पुढील १५ दिवसांपर्यंत योग्य मानला जाणार आहे.कमाल तापमान : कोल्हापूर (३८.७), नाशिक (३७.८), सांगली (४०.९), सोलापूर (४१.५), उस्मानाबाद (४०.१), औरंगाबाद (३८.४), परभणी (४१.७), अकोला (४१.२), नागपूर (४०.५).