शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न...! म्हणाले, पुतिन-झेलेन्स्की आधी समोरा-समोर बोलतील
2
“यांना वेळ द्यायचा तरी किती? मुंबईत घुसणारच, आम्हाला आमचे आरक्षण द्या”: मनोज जरांगे पाटील
3
अमेरिकेतील ५.५ कोटी परदेशी नागरिक अडचणीत, 'असं' झालं तर थेट हाकलून दिलं जाणार! नेमकं प्रकरण काय?
4
क्रेडिट स्कोअरमध्ये पुणे दुसऱ्या क्रमांकावर; पहिलं कोण? ४७ लाख लोकांत फक्त ५ लोकांचा सर्वात बेस्ट स्कोअर
5
भारतासोबत डबल गेम खेळतोय चीन? द्विपक्षीय संबंध सुधारत असतानाच केलं 'हे' मोठं काम
6
मनोज जरांगे पाटील आता तरी मुंबई गाठणार की वेशीवरुनच ऐनवेळी माघारी फिरणार?; चर्चांना उधाण
7
ग्लासमध्ये लघवी करून भांड्यांवर शिंपडायची, १० वर्षं जुन्या मोलकरणीचं घृणास्पद कृत्य सीसीटीव्हीत कैद!
8
खरंच TCS ३०,००० कर्मचाऱ्यांची कपात करणार का? युनियनचं आंदोलन, कंपनीनं दिलं स्पष्टीकरण
9
दक्षिण अमेरिकेत मोठा भूकंप; हादऱ्यांमुळे लोक घाबरले, ७.५ तीव्रता, त्सुनामीचा इशारा
10
लखपती बनण्याची मशीन आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ २२२ रुपयांत सुरू करा गुंतवणूक, पाहा कॅलक्युलेशन
11
एल्विश यादवच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीचा एन्काऊंटर; पायाला लागली गोळी
12
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
13
सांस्कृतिक केंद्राच्या दक्षिण विभागात २.२४ कोटींचा घोटाळा; सीबीआयने सुरू केली चौकशी
14
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
15
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
16
लक्ष्याच्या लेकीचं व्यवसायात पाऊल! स्वानंदी बेर्डेने सुरू केलं 'कांतप्रिया', आई-वडिलांच्या नावावरुन ठेवलं ब्रँडचं नाव
17
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
18
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
19
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
20
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !

गौडांची स्लो ट्रेन!

By admin | Updated: July 9, 2014 02:43 IST

आधीच भाडेवाढीमुळे पिचलेल्या मुंबईकरांना रेल्वे अर्थसंकल्पातून फारशी अपेक्षा नव्हतीच आणि रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी ती सार्थ ठरविली.

विनायक पात्रुडकर - मुंबई
आधीच भाडेवाढीमुळे पिचलेल्या मुंबईकरांना रेल्वे अर्थसंकल्पातून फारशी अपेक्षा नव्हतीच आणि रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी ती सार्थ ठरविली. केवळ दीड महिन्यापूर्वी सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने गेल्या सरकारच्या योजनांचीच री ओढण्याची किमया केली आहे. मात्र श्रेय आपल्याला मिळेल याची पुरेशी व्यवस्थाही केली आहे. मुंबईकरांच्या तीव्र विरोधानंतर 200 टक्के वाढविलेला लोकलचा दर 14 टक्क्यांवर विसावला. या काळात मुंबईकरांनी चार-पाच तास रांगेत उभे राहून वर्षभराचे पास काढले. या दरवाढीची तीव्र प्रतिक्रिया उमटून त्याचा आगामी विधानसभा निवडणुकीत फटका बसू शकतो याची जाणीव झाल्याने दरवाढ मागे घ्यावी लागली. गौडा यांच्या भाषणातही मुंबई आणि महाराष्ट्राकडे पुरते दुर्लक्ष झाल्याचे जाणवले. तब्बल 70 लाख प्रवासी असणा:या आणि रेल्वेला सर्वाधिक उत्पन्न देणा:या मुंबई महानगराच्या पदरी पुन्हा निराशाच आली आहे. 
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनची घोषणा गेल्या वेळीच झाली होती. 6क् हजार कोटींचा हा प्रकल्प पूर्वीच्या नियोजनानुसार पुणोमार्गे अहमदाबाद असा होता. परंतु घाटमाथ्याच्या अडचणीमुळे पुणो वगळण्यात आले. प्रचंड खर्चाचा हा प्रकल्प किती प्रवाशांना फायदेशीर ठरणार आहे? त्याची किती वर्षात वसुली होईल? त्या मार्गावरचा प्रवाशांचा ताण किती? याही बाबींचा विचार व्हायला हवा. 
मुंबईसाठी 864 रेक्स पुढच्या दोन वर्षात उपलब्ध होतील, असेही गौडांनी घोषित केले. परंतु गेल्या वेळीही 72 लोकलची घोषणा होतीच. त्याही 12 डब्यांच्या होत्या, म्हणजे हे 864 रेक्स त्याचेच आहेत. कसारा-इगतपुरी व कजर्त-लोणावळा या मार्गावर चौथ्या लाइनसाठी पाहणी सुरू आहे. याचा प्रत्यक्ष फायदा चाकरमानी मुंबईकरांना नाही. मुंबईत दररोज सरासरी 9 जणांचा रेल्वे प्रवासादरम्यान मृत्यू होतो. अपघातानंतर त्यांना हेलिकॉप्टरने रुग्णालयात नेण्याची व्यवस्था करणारी धाडसी योजना रेल्वे बोर्डाने हायकोर्टात मांडली आहे. त्याचा उल्लेख या अर्थसंकल्पात दिसला नाही. 
रेल्वे सेवा ही सर्वसामान्यांसाठी सुलभ प्रवासाचे माध्यम आहे. त्याचे सेवा देण्याच्या नावाखाली व्यापारीकरण होऊ नये आणि भारतीयांची जीव की प्राण असलेली रेल्वेही परवडेनाशी होऊ नये ही अपेक्षा ठेवणा:या मुंबईकरांची भावना गैर नाही, हेही तितकेच खरे. 
 
 
 
महिला सुरक्षा
रेल्वेतील महिलांची सुरक्षा हा ऐरणीचा विषय आहे. त्यासाठी चार हजार महिला पोलिसांची भरती करणार असल्याची घोषणाही गौडा यांनी केली. मनुष्यबळ वाढवून हा प्रश्न सुटणार नाही. सध्याच्या सुरक्षेतील त्रुटी दूर केल्या तर इतकी नवी भरती करण्याची वेळ येणार नाही. यापेक्षा सुरक्षा यंत्रणा अधिक प्रभावशाली करण्यावर भर हवा होता.