शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

गोदावरी नदीचे पाणी मराठवाड्याकडे झेपावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 06:04 IST

नाशिक, नगर, कोल्हापूरमध्ये पाऊस; पंचगंगा पात्राबाहेर, मुळा नदीला पूर

नाशिक/नगर/कोल्हापूर/सोलापूर : मुंबईत पावसाने विश्रांती घेतल्यानंतर राज्यात नाशिक, नगर, कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात शनिवारी मध्यरात्रीपासून रविवारी संध्याकाळपर्यंत धुव्वाधार पाऊस झाला. त्यामुळे यंदा पहिल्यांदाच गोदावरी नदीला पूर आला. त्यामुळे नांदुर मधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी नदीपात्रात ८ हजार क्सुसेसने पाणी सोडण्यात आले आहे. ते मराठवाड्याकडे झेपावले आहे.

नाशिक जिल्ह्यात नदीनाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. काही गावांचा संपर्क तुटला आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात १६० मि.मी., पेठ येथे १०१ मि.मी., इगतपुरीत रविवारी ४६ मि.मी., सिन्नरला ५५, तर नाशिक तालुक्यात ९३ मि.मी. पावसाची नोंद झाली. नदीकाठच्या नागरिकांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी पावसाने दमदार हजेरी लावली. सकाळी ११ वाजता पंचगंगा नदी पहिल्यांदाच पात्राबाहेर पडली. जिल्ह्यातील नदी, नाले दुथडी भरून वाहू लागले असून, पंचगंगेसह भोगावती, वेदगंगा, दूधगंगा, वारणा या प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यावरील १८ बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूकही बंद झाली.सांगलीत चांदोली (ता.शिराळा) धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २४ तासांत तब्बल १२० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सातारा जिल्ह्यात कोयना धरणात रविवारी सायंकाळपर्यंतच्या २४ तासांत पाणीसाठ्यात जवळपास पाच टीएमसीने वाढ झाली आहे. साताºयातील कास तलाव भरला आहे.

मालगाडीचे इंजिन घसरलेइगतपुरीहून मुंबईच्या दिशेने जाणाºया मालगाडीचे इंजिन रुळावरून घसल्याची घटना रविवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. घसरलेले इंजिन हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते.

उजनीमध्ये आठ दिवसांत ३ टक्के पाणीउजनी धरणामध्ये गेल्या आठ दिवसांत २ टीएमसी पाणी आले आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ व भीमाशंकर परिसरात दमदार पाऊस झाल्यामुळे ११ हजार ९४७ क्युसेकने पाणी येत होते. अजूनही उजनी धरणात ६१७५ क्युसेकने दौंडमधून विसर्ग सुरूच आहे. पाण्याअभावी आषाढी वारीसाठी यंदा उजनीतून पाणी सोडण्याचे नियोजन रद्द करण्यात आले आहे.

सह्याद्रीच्या पर्वतरांगात पाऊसअहमदनगर जिल्ह्यात भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील गावांना अतिवृष्टीचा तडाखा बसला. मुळा खोºयातील कोथळे आणि शिरपुंजे येथील लघु पाटबंधारे तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत. बलठण येथील छोटे धरण भरण्याच्या मार्गावर आहे. मुळा, भंडारदरा पाणलोटातील ओढ्या नाल्यांनाही पूर आला आहे. मुळा नदीला पूर आला आहे.