शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
4
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
5
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
6
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
7
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
8
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
9
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
10
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
11
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
12
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
13
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
14
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
15
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
16
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
17
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
18
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
19
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
20
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या

गोदावरी नदीचे पाणी मराठवाड्याकडे झेपावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 06:04 IST

नाशिक, नगर, कोल्हापूरमध्ये पाऊस; पंचगंगा पात्राबाहेर, मुळा नदीला पूर

नाशिक/नगर/कोल्हापूर/सोलापूर : मुंबईत पावसाने विश्रांती घेतल्यानंतर राज्यात नाशिक, नगर, कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात शनिवारी मध्यरात्रीपासून रविवारी संध्याकाळपर्यंत धुव्वाधार पाऊस झाला. त्यामुळे यंदा पहिल्यांदाच गोदावरी नदीला पूर आला. त्यामुळे नांदुर मधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी नदीपात्रात ८ हजार क्सुसेसने पाणी सोडण्यात आले आहे. ते मराठवाड्याकडे झेपावले आहे.

नाशिक जिल्ह्यात नदीनाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. काही गावांचा संपर्क तुटला आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात १६० मि.मी., पेठ येथे १०१ मि.मी., इगतपुरीत रविवारी ४६ मि.मी., सिन्नरला ५५, तर नाशिक तालुक्यात ९३ मि.मी. पावसाची नोंद झाली. नदीकाठच्या नागरिकांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी पावसाने दमदार हजेरी लावली. सकाळी ११ वाजता पंचगंगा नदी पहिल्यांदाच पात्राबाहेर पडली. जिल्ह्यातील नदी, नाले दुथडी भरून वाहू लागले असून, पंचगंगेसह भोगावती, वेदगंगा, दूधगंगा, वारणा या प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यावरील १८ बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूकही बंद झाली.सांगलीत चांदोली (ता.शिराळा) धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २४ तासांत तब्बल १२० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सातारा जिल्ह्यात कोयना धरणात रविवारी सायंकाळपर्यंतच्या २४ तासांत पाणीसाठ्यात जवळपास पाच टीएमसीने वाढ झाली आहे. साताºयातील कास तलाव भरला आहे.

मालगाडीचे इंजिन घसरलेइगतपुरीहून मुंबईच्या दिशेने जाणाºया मालगाडीचे इंजिन रुळावरून घसल्याची घटना रविवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. घसरलेले इंजिन हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते.

उजनीमध्ये आठ दिवसांत ३ टक्के पाणीउजनी धरणामध्ये गेल्या आठ दिवसांत २ टीएमसी पाणी आले आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ व भीमाशंकर परिसरात दमदार पाऊस झाल्यामुळे ११ हजार ९४७ क्युसेकने पाणी येत होते. अजूनही उजनी धरणात ६१७५ क्युसेकने दौंडमधून विसर्ग सुरूच आहे. पाण्याअभावी आषाढी वारीसाठी यंदा उजनीतून पाणी सोडण्याचे नियोजन रद्द करण्यात आले आहे.

सह्याद्रीच्या पर्वतरांगात पाऊसअहमदनगर जिल्ह्यात भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील गावांना अतिवृष्टीचा तडाखा बसला. मुळा खोºयातील कोथळे आणि शिरपुंजे येथील लघु पाटबंधारे तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत. बलठण येथील छोटे धरण भरण्याच्या मार्गावर आहे. मुळा, भंडारदरा पाणलोटातील ओढ्या नाल्यांनाही पूर आला आहे. मुळा नदीला पूर आला आहे.