शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

वीकेंडला जाताय, मग या ठिकाणांना आवर्जून भेट द्या !

By admin | Updated: January 25, 2017 22:34 IST

आम्ही तुमच्यासाठी मुंबईपासूनच काही तासांच्या म्हणजेच हाकेच्या अंतरावर असणा-या पिकनिक पाइंटची माहिती घेऊन आलो आहोत. तुम्ही ज्यावेळी पिकनिकला जायचा प्लॅन कराल त्यावेळी तुम्हाला नक्कीच ही माहिती उपयोगी पडेल.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 25 - कामाच्या धकाधकीत ब-याचदा आपण स्वत: च्या आवडीनिवडी विसरून जातो, आजूबाजूच्या जगात काय सुरू आहे हे सुद्धा माहीत नसते. मनात एक प्रकारचे कामाचे दडपण असते, त्यातूनच थोडासा विरंगुळा मिळावा म्हणून पिकनिकचे बेत आखतो, मात्र ब-याचदा केलेले नियोजन काही कारणास्तव फिस्कटते. तसेच प्रसिद्ध असलेली पर्यटनस्थळे लांब असल्यामुळे ब-याचदा पिकनिकला जाता येत नाही. याचबरोबर काहींना मुंबईपासूनजवळ असलेले पिकनिक पॉइंट ठाऊक नसतात. मात्र आम्ही तुमच्यासाठी मुंबईपासूनच काही तासांच्या म्हणजेच हाकेच्या अंतरावर असणा-या पिकनिक पॉइंटची माहिती घेऊन आलो आहोत. तुम्ही ज्यावेळी पिकनिकला जायचा प्लॅन कराल त्यावेळी तुम्हाला नक्कीच ही माहिती उपयोगी पडेल. 

चला तर मग जाणून घेऊया मुंबईजवळचे पिकनिक पाइंट...लोणावळा खंडाळा मुंबईजवळचा वीकेंड पॉइंट म्हणजे लोणावळा खंडाळा...मुंबईहून 107 ते 110 किलोमीटर अंतरावर ही निसर्गरम्य ठिकाणं वसलेली आहेत. मुंबईपासून 2 तासांवर असलेल्या या ठिकाणाला गेल्या वर्षी ब-याच पर्यटकांनी भेट दिली आहे. मुंबई-पुणे महामार्गावरून जातानाच ही डेस्टिनेशन लागतात. या ठिकाणी तुम्ही ट्रेकिंगचाही आनंद लुटू शकता. बुशी डॅम, लायन्स पॉइंटसारखी प्रेक्षणीय स्थळं इथे पाहायला मिळतील.काशीद अलिबागमहाराष्ट्रातील स्वच्छ समुद्रकिना-यांसाठी काशीद बीच प्रसिद्ध आहे. अलिबागपासून 30 किलोमीटरच्या अंतरावर गेल्यास काशीद समुद्रकिना-याचं नयनरम्य दर्शन घडतं. हिवाळ्यातून या पर्यटनस्थळाला भेट दिल्यास वातावरणातील गारवा शरीराला झोंबतो आणि मन प्रफुल्लित होते. पिकनिकसाठी काशीद बीच हे योग्य ठिकाण आहे. मुंबईपासून 135 किलोमीटरच्या अंतरावर हे ठिकाण आहे. अलिबागवरून तुम्ही गाडीनं या ठिकाणासह मुरुड-जंजिराला भेट देऊ शकता, तुम्ही काशीद बीचवर बिनधास्त स्वतःला झोकून देऊ शकता. मुंबईहून मुरुडला काही बसेसही आहेत. या बसचा अलिबागलाही थांबा आहे. कोलाडमहाराष्ट्रातील ऋषिकेशमधल्या कोलाडला वॉटर राफ्टिंगचा थरार अनुभवता येतो. हिरवेगार आणि धबधब्यांसाठी हे ठिकाणी प्रसिद्ध आहे. वॉटर रॅपेलिंग, ट्रेकिंग, कायाकिंग, रिव्हर झिप लायनिंग आणि इतरही काही गोष्टींची या ठिकाणी मज्जा घेता येते. मुंबईपासून 130 किलोमीटरच्या अंतरावर हे ठिकाण वसलेलं आहे. कोलाड हे मुंबई, नांदेड, लोणावळा आणि इतर प्रसिद्ध ठिकाणांशी जोडले गेलेलं आहे. पावसाळ्यात रिव्हर राफ्टिंगचा थरार अनुभवण्याची मज्जा काही औरच असते. कोलाड हे जंगलाच्या मध्येच वसलेलं असल्यानं इथं आल्यावर सुखद गारव्याची अनुभूती होते. महाबळेश्वरउन्हाळ्याच्या दिवसांत थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाराष्ट्रातील महाबळेश्वरकडे आपली पावलं आपसुकच वळतात. मुंबईपासून महाबळेश्वर हे 238 किलोमीटरच्या अंतरावर आहे. महाबळेश्वरमध्ये स्ट्रॉबेरी गार्डन हे खूप प्रसिद्ध आहे. या हिल स्टेशनवरच्या माप्रो कारखान्याला इथं आलेले पर्यटक आवर्जून भेट देतात. महाबळेश्वरमध्ये वर्षाच्या कोणत्याही ऋतूत हवामान थंडच असते. विशेष म्हणजे मुंबईत उकाडा जाणवत असतानाही इथं हवामान थंड असते. कामशेतपॅराग्लायडर्ससाठी कामशेत म्हणजे एक प्रकार स्वर्गच आहे. कामशेत या साहसी पर्यटनासाठी तरुणाईचे आवडते ठिकाण आहे. मुंबईपासून 118 किलोमीटरच्या अंतरावर कामशेत वसलेलं आहे. पॅराग्लायडिंगसह इथं ट्रेकिंगही करता येते. ट्रेकिंगसाठी तरुणाई कोंडेश्वर आणि शेलार कड्याची आवर्जून निवड करतात. पवना लेकही इथलं पाहण्यासारखं ठिकाण आहे. इथे तुम्हाला जाण्यासाठी किफायतशीर पॅकेजही उपलब्ध आहेत. हिवाळ्यात या पर्यटनस्थळाला प्रेक्षक जास्त भेट देतात. भैरी लेणी, कोंडेश्वर मंदिर, बंदर डोंगर आणि इतरही काही पाहण्यासारखी ठिकाणं आहेत. इगतपुरीमुंबई-नाशिक महामार्गावरून जाता जाता इगतपुरीत हे पर्यटनस्थळ लागते. इगतपुरीला पर्वत, किल्ले, मंदिरे आणि धबधब्यांच्या रुपानं निसर्गसंपदा लाभली आहे. गेल्या काही वर्षांत इगतपुरी हे ठिकाण पर्यटनस्थळ म्हणून नावारुपाला आलं आहे. विपश्यना आंतरराष्ट्रीय अकादमीला मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देत असून, ध्यान करतात. ट्रिंगलवाडी आणि रतनगड किल्ले, घाटणदेवी आणि अमृतेश्वर सारखं ऐतिहासिक मंदिर लोकांना आकर्षित करते. इगतपुरीला तरुणाई ट्रेकिंग आणि रॉक क्लायबिंगसाठी भेट देते. अलानगड, मदनगड, कुलंगगडही ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहेत. दिवेआगरमहाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यात दिवेआगर हे पर्यटनस्थळ आहे. येथील गोल्डन गणेश मंदिर आणि स्वच्छ समुद्रकिनारे पर्यटकांना सदोदित आकर्षिक करतात. दिवेआगर मुंबईपासून 170 किलोमीटरच्या अंतरावर आहे. श्रीवर्धन आणि हरिहरेश्वरहून तुम्ही दिवेआगरला जाऊ शकता. थंडीच्या दिवसांत म्हणजेच ऑक्टोबर ते जानेवारीदरम्यान इथलं वातावरण आल्हाददायक असते. भंडारदरानाशिक आणि शिर्डीला जाणा-या प्रवाशांना भंडारदरा पर्यटनस्थळ मध्येच लागतं. येथील आर्थर लेक आणि विल्सन धरण हे पर्यटकांचं लक्ष वेधून घेत असतात. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई इथं वसलेले असून, तुम्ही ट्रेकिंगचाही अनुभव घेऊ शकता. तुम्ही इथं 200 वर्षं जुन्या रतनगड किल्ल्यावरही ट्रेकिंग करू शकता. ऑगस्ट ते मार्चमध्ये इथं पर्यटकांना कायम राबता असतो. कर्नाळामुंबईपासून 61 किलोमीटरच्या अंतरावरील कर्नाळा हे अनेकांना आकर्षून घेतं. मुंबईहून गाडीनं निघाल्यास दीड तासात तुम्ही इथे पोहोचू शकता. कर्नाळा किल्ला, शिव मंदिर आणि पक्षी अभयारण्य पाहण्यासाठी पर्यटक इथं आवर्जून भेट देतात. कर्नाळामधील हे तीन ठिकाणं पाहण्यासारखी आहेत. इथं काही दुर्मीळ प्रजातीचे पक्षीही दृष्टिक्षेपात पडतात. मलबार पक्षी, मॅगपाई रॉबिन आणि नाइटिंगलसारखे पक्षीही पर्यटकांना आकर्षिक करून घेतात.