शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘आयआयएम’ला केंद्राचे ‘गो अहेड’

By admin | Updated: January 8, 2015 01:25 IST

देशातील सर्वोच्च पातळीवरील व्यवस्थापन संस्था ‘आयआयएम’ (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट) नागपुरात स्थापन करण्यासाठी केंद्र शासनाने हिरवी झेंडी दाखवली आहे.

‘आयआयएम-अहमदाबाद’कडे पालकत्व : २०१५-१६ पासून सुरू होणार अभ्यासक्रमनागपूर : देशातील सर्वोच्च पातळीवरील व्यवस्थापन संस्था ‘आयआयएम’ (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट) नागपुरात स्थापन करण्यासाठी केंद्र शासनाने हिरवी झेंडी दाखवली आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी यासंदर्भात बुधवारी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांना ही माहिती दिली. ‘आयआयएम-अहमदाबाद’कडे ‘आयआयएम-नागपूर’चे पालकत्व देण्यात येणार आहे. २०१५-१६ या सत्रापासून येथे अभ्यासक्रम सुरू करण्याचे प्रयत्न राहणार आहेत.‘लोकमत’ने यासंदर्भात सुरुवातीपासून पाठपुरावा केला होता, हे विशेष. दिल्लीमधील विज्ञान भवनात विद्यापीठ अनुदान आयोग यांच्यावतीने निवड आधारित श्रेणी (क्रेडिट) व्यवस्था तसेच कौशल्य श्रेणी आधारित आराखडा याबाबत सर्व राज्यांच्या शिक्षणमंत्र्याची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी तावडे यांच्याशी चर्चा केली. नागपूरमध्ये ‘आयआयएम’ येणार असून, देशातील सर्वोत्तम ‘आयआयएम-अहमदाबाद’ हे नागपुरातील ‘आयआयएम’चे पालकत्व स्वीकारणार आहे, अशी माहिती विनोद तावडे यांनी दिली. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्यावतीने राज्यात ‘आयआयएम’ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याकरिता मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर या चार शहरांचा विचार करण्यात आला. मुंबई, पुणे या शहरांत जागेची वानवा असल्यामुळे औरंगाबाद आणि नागपूरमध्येच यासाठी खरी चुरस होती. यासंदर्भात विधिमंडळात दोन्ही विभागांच्या आमदारांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी तावडे यांनी यासंदर्भात घोषणा केली. यासंदर्भातील प्रस्ताव केंद्र शासनाला पाठविण्यात आला होता.केंद्र शासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता लवकरात लवकर ‘आयआयएम’ स्थापन करण्याच्या प्रशासकीय हालचाली सुरू होण्याची चिन्हे आहेत. सर्वात अगोदर तर जागा मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. केंद्रीय मनुष्यबळ विभागाच्या चमूतर्फे लवकरच उपलब्ध जागेची तसेच तात्पुरत्या जागेची पाहणी करण्यात येईल.‘व्हीएनआयटी’त होणार शुभारंभ?नागपुरात मिहान येथील २०० एकर जागेचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला होता. तात्पुरते वर्ग सुरू करण्यासाठी ‘व्हीएनआयटी’नेदेखील चार एकर जागा व दोन इमारती देण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळे कायमस्वरूपी जागा मिळेपर्यंत ‘व्हीएनआयटी’मध्ये २०१५-१६ पासून ‘आयआयएम’चे वर्ग सुरू होण्याची दाट शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.