शहरं
Join us  
Trending Stories
1
“माओवाद १०० टक्के संपणार, भूपतीची शरणागती मोठी गोष्ट”; CM फडणवीसांनी केले पोलिसांचे अभिनंदन
2
तालिबानकडे मिसाईल कुठून आली? हल्ला होताच गाफिल पाकिस्तान हादरला; ६५ वर्षांपूर्वी...
3
'महाभारत'मधील कर्णाचा अस्त, अभिनेते पंकज धीर यांचं कर्करोगानं निधन
4
बाबासाहेब पाटलांनी पालकमंत्रिपद सोडलं, त्यांच्या जागी 'या' नेत्याला मिळाली जबाबदारी
5
दिवाळीपूर्वी 'या' दिग्गज कंपनीचा मोठा झटका! १५ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार? काय आहे कारण?
6
मोठी रिअल इस्टेट डील; अदानी खरेदी करणार सहाराच्या 88 मालमत्ता; किती कोटींचा व्यवहार?
7
Priyal Yadav : प्रेरणादायी! वडील तिसरी, आई सातवी पास; अकरावी नापास प्रियल कशी झाली डेप्युटी कलेक्टर?
8
'जंगलात जरी बोलवलं तरी गेलो असतो'; पोलिसांना दिलेले वचन CM फडणवीसांनी पूर्ण केले, कार्यक्रम रद्द करुन पोहोचले गडचिरोलीत
9
“...तोपर्यंत निवडणुका घेऊच नका, मतदारयादीची लपवाछपवी का?”; राज ठाकरेंची आयोगाला विचारणा
10
आधी बंपर लॉटरी लावली... आता एलजीच्या एमडींनी हिंदीत भाषण केलं; मन जिंकताच दिग्गज उद्योजकानंही केलं कौतुक
11
प्रशांत किशोर यांचा मोठा निर्णय; बिहार विधानसभा निवडणुकीतून घेतली माघार, कारण काय..?
12
अ‍ॅश्ले टेलिस यांना ट्रम्प भारतात राजदूत बनवणार होते, अचानक हेरगिरी प्रकरणी अटक; चीनशी कनेक्शनचा आरोप
13
१५ मिनिटांत पाकने गुडघे टेकले, अफगाणिस्तानसमोर सपशेल शरणागती, शस्त्रे सोडून सैनिक पळाले!
14
एकनाथ शिंदेंचा काँग्रेससह शरद पवार गटाला मोठा धक्का, बडे नेते शिवसेनेत; पक्षाची ताकद वाढली
15
सोने नव्हे, चांदीची किंमत 'रॉकेट' वेगाने का वाढतेय? पांढरा धातू २,६९,००० प्रति किलोवर पोहोचणार?
16
फायद्याची गोष्ट! हात धुण्याची योग्य पद्धत माहितीय का? ९९% लोक करतात 'या' छोट्या चुका
17
क्रेडिट कार्ड बंद केल्यानं तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होतो का? बंद करण्यापूर्वी जाणून घ्या काही महत्त्वाची गोष्टी
18
बसला भीषण आग, धुरामुळे दरवाजा लॉक; काचा फोडून मारल्या उड्या, थरकाप उडवणारी घटना
19
'कौआ बिर्याणी'च्या डायलॉगमुळे प्रसिद्ध झालेला हा अभिनेता आठवतोय का?, एकेकाळी विकायचा साडी
20
शेतकऱ्यांसाठी दिवाळी भेट! पीएम किसान योजनेचा २१वा हप्ता कधी येणार? तुमचे नाव यादीत असे घरबसल्या तपासा

‘आयआयएम’ला केंद्राचे ‘गो अहेड’

By admin | Updated: January 8, 2015 01:25 IST

देशातील सर्वोच्च पातळीवरील व्यवस्थापन संस्था ‘आयआयएम’ (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट) नागपुरात स्थापन करण्यासाठी केंद्र शासनाने हिरवी झेंडी दाखवली आहे.

‘आयआयएम-अहमदाबाद’कडे पालकत्व : २०१५-१६ पासून सुरू होणार अभ्यासक्रमनागपूर : देशातील सर्वोच्च पातळीवरील व्यवस्थापन संस्था ‘आयआयएम’ (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट) नागपुरात स्थापन करण्यासाठी केंद्र शासनाने हिरवी झेंडी दाखवली आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी यासंदर्भात बुधवारी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांना ही माहिती दिली. ‘आयआयएम-अहमदाबाद’कडे ‘आयआयएम-नागपूर’चे पालकत्व देण्यात येणार आहे. २०१५-१६ या सत्रापासून येथे अभ्यासक्रम सुरू करण्याचे प्रयत्न राहणार आहेत.‘लोकमत’ने यासंदर्भात सुरुवातीपासून पाठपुरावा केला होता, हे विशेष. दिल्लीमधील विज्ञान भवनात विद्यापीठ अनुदान आयोग यांच्यावतीने निवड आधारित श्रेणी (क्रेडिट) व्यवस्था तसेच कौशल्य श्रेणी आधारित आराखडा याबाबत सर्व राज्यांच्या शिक्षणमंत्र्याची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी तावडे यांच्याशी चर्चा केली. नागपूरमध्ये ‘आयआयएम’ येणार असून, देशातील सर्वोत्तम ‘आयआयएम-अहमदाबाद’ हे नागपुरातील ‘आयआयएम’चे पालकत्व स्वीकारणार आहे, अशी माहिती विनोद तावडे यांनी दिली. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्यावतीने राज्यात ‘आयआयएम’ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याकरिता मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर या चार शहरांचा विचार करण्यात आला. मुंबई, पुणे या शहरांत जागेची वानवा असल्यामुळे औरंगाबाद आणि नागपूरमध्येच यासाठी खरी चुरस होती. यासंदर्भात विधिमंडळात दोन्ही विभागांच्या आमदारांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी तावडे यांनी यासंदर्भात घोषणा केली. यासंदर्भातील प्रस्ताव केंद्र शासनाला पाठविण्यात आला होता.केंद्र शासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता लवकरात लवकर ‘आयआयएम’ स्थापन करण्याच्या प्रशासकीय हालचाली सुरू होण्याची चिन्हे आहेत. सर्वात अगोदर तर जागा मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. केंद्रीय मनुष्यबळ विभागाच्या चमूतर्फे लवकरच उपलब्ध जागेची तसेच तात्पुरत्या जागेची पाहणी करण्यात येईल.‘व्हीएनआयटी’त होणार शुभारंभ?नागपुरात मिहान येथील २०० एकर जागेचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला होता. तात्पुरते वर्ग सुरू करण्यासाठी ‘व्हीएनआयटी’नेदेखील चार एकर जागा व दोन इमारती देण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळे कायमस्वरूपी जागा मिळेपर्यंत ‘व्हीएनआयटी’मध्ये २०१५-१६ पासून ‘आयआयएम’चे वर्ग सुरू होण्याची दाट शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.