शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

लातूरला उजनीतून पाणी देणार

By admin | Updated: August 25, 2015 02:26 IST

लातूरची पाणी टंचाई तीव्र आहे. त्यामुळे यात्रेकरुंसाठी राखून ठेवलेले उजनी धरणातील पाणी पंढरपूरमधून रेल्वेने लातुरला नेले जाईल,अशी माहिती महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी

खडसेंची माहिती : कारखाने महत्त्वाचे की माणसे ?

मुंबई : लातूरची पाणी टंचाई तीव्र आहे. त्यामुळे यात्रेकरुंसाठी राखून ठेवलेले उजनी धरणातील पाणी पंढरपूरमधून रेल्वेने लातुरला नेले जाईल,अशी माहिती महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी लोकमतशी बोलताना दिली. उजनीचे पाणी सोलापूरला जाते. तेथून ते पंढरपूरला जाते. उजनी लातूर अंतर तुलनेने कमी आहे, पण रेल्वे मार्गाची सोय म्हणून पंढरपूरमार्गे हे पाणी लातूरला नेले जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.उजनीचे पाणी लातुरला नेण्यास सोलापूरचे काँग्रेस नेते तीव्र विरोध करत आहेत याकडे लक्ष वेधले असता खडसे म्हणाले, मला काँग्रेस नेत्यांची कीव वाटते. एकीकडे दुष्काळग्रस्त भागाला पाणी मिळाले पाहिजे म्हणून राजकारण करायचे आणि दुसरीकडे आपल्या उसाचे पाणी कमी होऊ नये यासाठी स्वार्थी राजकारण करायचे. पाणी टंचाईच्या काळात लोक पाणपोया उघडतात. पाणी नाही म्हणू नये अशी आपली संस्कृती. पण माणसे अडचणीत आलेली असताना यांना उसाचे कारखाने जास्त महत्वाचे वाटतात, असा टोलाही खडसे यांनी लगावला. (विशेष प्रतिनिधी)