शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिदिनी ४० लाख लिटर रेल्वेला पाणी द्यावे

By admin | Updated: June 9, 2016 01:56 IST

दौंड रेल्वे स्थानकाला आवश्यक असलेले दररोजचे ४० लाख लिटर पाणी (०.४ एमएलडी) उपलब्ध करून देण्यात यावे

दौंड : दौंड रेल्वे स्थानकाला आवश्यक असलेले दररोजचे ४० लाख लिटर पाणी (०.४ एमएलडी) उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी पाटबंधारे विभाग आणि रेल्वे खात्याच्या बैठकीत पुणे येथे पाटबंधारे खात्याच्या कार्यालयात केली. दौंड रेल्वे स्थानकात पाणीपुरवठा बंद असून, जो काही पाणीपुरवठा आहे तो दूषित स्वरूपाचा आहे अशा तक्रारी प्रवासीवर्गातून पुढे आल्या आहे. दौंड हे जंक्शन स्टेशन असून, त्या दृष्टिकोनातून रेल्वे स्थानकात प्रवासी कामगार यांच्यासाठी सातत्याने सतत आणि शुद्ध पाणीपुरवठा होणे गरजेचे असेही या बैठकीत सुळे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार दौंड रेल्वे स्थानकावर पाणी उपलब्ध होण्यासाठी पाटबंधारे आणि रेल्वे या दोन्ही विभागांच्या समन्वयातून तोडगा काढण्यात येणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यासंदर्भातील अहवाल तयार करणार असून, येत्या शुक्रवारी (दि.१०) रोजी प्राधिकरण पाहणी करून लवकरात लवकर अहवाल सादर करणार आहे. सन २०१० मधील मंजूर मागील प्रस्तावानुसार साडेतीन कोटींचा निधी दौंड रेल्वे स्थानकाच्या पाण्यासाठी उपलब्ध झाला होता, परंतु यावर पुढील कार्यवाही न झाल्याने हा निधी परत जात होता, सुळे यांनी यासाठी पाटबंधारे विभाग आणि रेल्वे यांच्यात बैठक घडवून आणली. या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार आता पाटबंधारे विभागाने कालव्यातून पाणी रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचविण्यासाठी १० किलोमीटरची पाइपलाइन करण्याचा प्रस्ताव रेल्वेकडे मांडला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण याबाबत अहवाल तयार करणार असून, हा अहवाल शासनाकडे पाठविल्यानंतर लवकरच काम सुरू होईल. थेट कालव्यातून पाण्याचे नियोजन झाल्यास दौंड रेल्वे स्थानकाची दररोजची पाण्याची गरज पूर्ण होणार असून प्रवासी, रेल्वेत वापरण्यासाठी तसेच स्थानकावर आवश्यक पाणी पुरेसे उपलब्ध होणार आहे. दौंड स्थानकाची तहान यामुळे भागणार आहे. या बैठकीस सोलापूर विभागाचे रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी के. आर. देवनाळे, नजीब मुल्ला, मीना पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता अतुल कपोले, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे यमगर, वैशाली आवटे आदी उपस्थित होते. >केंद्र सरकारकडून दौंड रेल्वे स्थानकासाठी साडेतीन कोटींचा निधी याआधीच मंजूर झाला आहे. याबद्दल पुढील कार्यवाहीसाठी सुप्रिया सुळे यांनी पुढाकार घेऊन पाटबंधारे आणि रेल्वे यांच्यासोबत बैठक घडवून आणली. पाटबंधारे विभागाने हे लागणारे पाणी थेट कालव्यातून रेल्वे विभागाने उचलावे, असा प्रस्ताव रेल्वेकडे दिला आहे. यामुळे दौंड स्थानकाला कायमस्वरूपी पाणी मिळू शकेल.