शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

प्रतिदिनी ४० लाख लिटर रेल्वेला पाणी द्यावे

By admin | Updated: June 9, 2016 01:56 IST

दौंड रेल्वे स्थानकाला आवश्यक असलेले दररोजचे ४० लाख लिटर पाणी (०.४ एमएलडी) उपलब्ध करून देण्यात यावे

दौंड : दौंड रेल्वे स्थानकाला आवश्यक असलेले दररोजचे ४० लाख लिटर पाणी (०.४ एमएलडी) उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी पाटबंधारे विभाग आणि रेल्वे खात्याच्या बैठकीत पुणे येथे पाटबंधारे खात्याच्या कार्यालयात केली. दौंड रेल्वे स्थानकात पाणीपुरवठा बंद असून, जो काही पाणीपुरवठा आहे तो दूषित स्वरूपाचा आहे अशा तक्रारी प्रवासीवर्गातून पुढे आल्या आहे. दौंड हे जंक्शन स्टेशन असून, त्या दृष्टिकोनातून रेल्वे स्थानकात प्रवासी कामगार यांच्यासाठी सातत्याने सतत आणि शुद्ध पाणीपुरवठा होणे गरजेचे असेही या बैठकीत सुळे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार दौंड रेल्वे स्थानकावर पाणी उपलब्ध होण्यासाठी पाटबंधारे आणि रेल्वे या दोन्ही विभागांच्या समन्वयातून तोडगा काढण्यात येणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यासंदर्भातील अहवाल तयार करणार असून, येत्या शुक्रवारी (दि.१०) रोजी प्राधिकरण पाहणी करून लवकरात लवकर अहवाल सादर करणार आहे. सन २०१० मधील मंजूर मागील प्रस्तावानुसार साडेतीन कोटींचा निधी दौंड रेल्वे स्थानकाच्या पाण्यासाठी उपलब्ध झाला होता, परंतु यावर पुढील कार्यवाही न झाल्याने हा निधी परत जात होता, सुळे यांनी यासाठी पाटबंधारे विभाग आणि रेल्वे यांच्यात बैठक घडवून आणली. या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार आता पाटबंधारे विभागाने कालव्यातून पाणी रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचविण्यासाठी १० किलोमीटरची पाइपलाइन करण्याचा प्रस्ताव रेल्वेकडे मांडला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण याबाबत अहवाल तयार करणार असून, हा अहवाल शासनाकडे पाठविल्यानंतर लवकरच काम सुरू होईल. थेट कालव्यातून पाण्याचे नियोजन झाल्यास दौंड रेल्वे स्थानकाची दररोजची पाण्याची गरज पूर्ण होणार असून प्रवासी, रेल्वेत वापरण्यासाठी तसेच स्थानकावर आवश्यक पाणी पुरेसे उपलब्ध होणार आहे. दौंड स्थानकाची तहान यामुळे भागणार आहे. या बैठकीस सोलापूर विभागाचे रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी के. आर. देवनाळे, नजीब मुल्ला, मीना पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता अतुल कपोले, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे यमगर, वैशाली आवटे आदी उपस्थित होते. >केंद्र सरकारकडून दौंड रेल्वे स्थानकासाठी साडेतीन कोटींचा निधी याआधीच मंजूर झाला आहे. याबद्दल पुढील कार्यवाहीसाठी सुप्रिया सुळे यांनी पुढाकार घेऊन पाटबंधारे आणि रेल्वे यांच्यासोबत बैठक घडवून आणली. पाटबंधारे विभागाने हे लागणारे पाणी थेट कालव्यातून रेल्वे विभागाने उचलावे, असा प्रस्ताव रेल्वेकडे दिला आहे. यामुळे दौंड स्थानकाला कायमस्वरूपी पाणी मिळू शकेल.