शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
3
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
4
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
5
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
6
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
7
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
8
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
9
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
10
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
11
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
12
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
13
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
14
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
15
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
16
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
17
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
18
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
19
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
20
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी

प्रतिदिनी ४० लाख लिटर रेल्वेला पाणी द्यावे

By admin | Updated: June 9, 2016 01:56 IST

दौंड रेल्वे स्थानकाला आवश्यक असलेले दररोजचे ४० लाख लिटर पाणी (०.४ एमएलडी) उपलब्ध करून देण्यात यावे

दौंड : दौंड रेल्वे स्थानकाला आवश्यक असलेले दररोजचे ४० लाख लिटर पाणी (०.४ एमएलडी) उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी पाटबंधारे विभाग आणि रेल्वे खात्याच्या बैठकीत पुणे येथे पाटबंधारे खात्याच्या कार्यालयात केली. दौंड रेल्वे स्थानकात पाणीपुरवठा बंद असून, जो काही पाणीपुरवठा आहे तो दूषित स्वरूपाचा आहे अशा तक्रारी प्रवासीवर्गातून पुढे आल्या आहे. दौंड हे जंक्शन स्टेशन असून, त्या दृष्टिकोनातून रेल्वे स्थानकात प्रवासी कामगार यांच्यासाठी सातत्याने सतत आणि शुद्ध पाणीपुरवठा होणे गरजेचे असेही या बैठकीत सुळे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार दौंड रेल्वे स्थानकावर पाणी उपलब्ध होण्यासाठी पाटबंधारे आणि रेल्वे या दोन्ही विभागांच्या समन्वयातून तोडगा काढण्यात येणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यासंदर्भातील अहवाल तयार करणार असून, येत्या शुक्रवारी (दि.१०) रोजी प्राधिकरण पाहणी करून लवकरात लवकर अहवाल सादर करणार आहे. सन २०१० मधील मंजूर मागील प्रस्तावानुसार साडेतीन कोटींचा निधी दौंड रेल्वे स्थानकाच्या पाण्यासाठी उपलब्ध झाला होता, परंतु यावर पुढील कार्यवाही न झाल्याने हा निधी परत जात होता, सुळे यांनी यासाठी पाटबंधारे विभाग आणि रेल्वे यांच्यात बैठक घडवून आणली. या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार आता पाटबंधारे विभागाने कालव्यातून पाणी रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचविण्यासाठी १० किलोमीटरची पाइपलाइन करण्याचा प्रस्ताव रेल्वेकडे मांडला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण याबाबत अहवाल तयार करणार असून, हा अहवाल शासनाकडे पाठविल्यानंतर लवकरच काम सुरू होईल. थेट कालव्यातून पाण्याचे नियोजन झाल्यास दौंड रेल्वे स्थानकाची दररोजची पाण्याची गरज पूर्ण होणार असून प्रवासी, रेल्वेत वापरण्यासाठी तसेच स्थानकावर आवश्यक पाणी पुरेसे उपलब्ध होणार आहे. दौंड स्थानकाची तहान यामुळे भागणार आहे. या बैठकीस सोलापूर विभागाचे रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी के. आर. देवनाळे, नजीब मुल्ला, मीना पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता अतुल कपोले, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे यमगर, वैशाली आवटे आदी उपस्थित होते. >केंद्र सरकारकडून दौंड रेल्वे स्थानकासाठी साडेतीन कोटींचा निधी याआधीच मंजूर झाला आहे. याबद्दल पुढील कार्यवाहीसाठी सुप्रिया सुळे यांनी पुढाकार घेऊन पाटबंधारे आणि रेल्वे यांच्यासोबत बैठक घडवून आणली. पाटबंधारे विभागाने हे लागणारे पाणी थेट कालव्यातून रेल्वे विभागाने उचलावे, असा प्रस्ताव रेल्वेकडे दिला आहे. यामुळे दौंड स्थानकाला कायमस्वरूपी पाणी मिळू शकेल.