शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अनेकांशी बोलत होतो, काश्मीरमध्ये पर्यटकांना मारतील'; राज ठाकरेंचा पहलगाम हल्ल्यावर मोठं विधान
2
ऐकत नाही भाऊ! टी-२० क्रिकेटमध्ये विराटचा नवा पराक्रम, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच
3
'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले
4
राज्यात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईतील कुख्यात ठाकूर गँगचेही कनेक्शन
5
IPL 2025: चांगल्या सुरुवातीनंतरही आरसीबीच्या पदरात निराशा, हैदराबादचा ४२ धावांनी विजय!
6
सोलापुरात भयंकर घटना! पोटच्या ७ वर्षाच्या मुलीला संपवलं अन् घराशेजारीच पुरलं; पोलिसांनी मृतदेह काढला बाहेर
7
बाप-लेक ज्या गाडीतून झाले फरार, ती थार पोलिसांनी केली जप्त; आणखी दोन गाड्या कोणत्या? 
8
Matthew Forde: गोलंदाजाची आक्रमक फलंदाजी, अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावलं, डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी
9
'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान
10
गडचिरोली: बिबट्या शिकारीसाठी आला अन् एका घरात घुसला, त्यानंतर दहा तास...
11
आमदार प्रवीण दटकेंच्या नावाने पैसे उकळण्याचा प्रयत्न, प्रकरण काय?
12
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नव्या वळणावर; पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी होणार?
13
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
14
Abhishek Sharma: अभिषेक शर्मानं षटकार मारून मैदानातील गाडीची फोडली काच, पाहा व्हिडीओ
15
रूपाली चाकणकर, रोहिणी खडसेंकडून कस्पटे कुटुबीयांची भेट अन् दोघीत शाब्दिक चकमक
16
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
17
पोलिस महानिरीक्षक सुपेकर यांच्यामुळेच हगवणे कुटुंबीयांची हिंमत वाढली; अंजली दमानिया यांचा दावा
18
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
19
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
20
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी

दोन वर्षे पडून असलेली वाहने लाभार्र्थींना देणार

By admin | Updated: January 26, 2016 03:07 IST

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील घोटाळ्यांमुळे अडकून पडलेली वाहने लाभार्र्थींना देण्याचा निर्णय महामंडळाच्या संचालक मंडळाने अखेर घेतला आहे

मुंबई : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील घोटाळ्यांमुळे अडकून पडलेली वाहने लाभार्र्थींना देण्याचा निर्णय महामंडळाच्या संचालक मंडळाने अखेर घेतला आहे. ही वाहने धूळ खात पडली असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने दिले होते. मातंग समाजातील गरजूंना भाजीपाला विक्रीसाठी वाहने उपलब्ध करून देण्याची योजना २०१३ मध्ये आखण्यात आली होती. त्यासाठी राष्ट्रीय मागासवर्ग महामंडळाने ४ कोटी २० लाख, साठे महामंडळाने १ कोटी ४० लाख, महामंडळाच्या वैयक्तिक अनुदानापोटी १० लाख, तर लाभार्र्थींचा हिस्सा ३० लाख रुपये अशी आर्थिक तरतूद करण्यात आली होती. ६ कोटी रुपयांच्या या प्रकल्पावर प्रत्यक्षात ७ कोटी ५० लाख रुपये खर्च करण्यात आले. हा जादाचा खर्च सध्या सीआयडीच्या चौकशी रडारवर आहे. या निधीतून १०० वाहने खरेदी करण्यात आली होती. ती भाजीपाला विक्रीसाठी विशेष पद्धतीने बनविण्यात आली असून, वाहनांचा अर्धा भाग वातानुकूलित आहे. दोन वर्षांपासून ठाणे आणि बोरीवलीतील दोन फर्मकडे ही वाहने नुसती पडून आहेत, यावर ‘लोकमत’ने प्रकाश टाकला होता. या वाहनांच्या लाभार्र्थींची निवड ही स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करण्यात आलेली होती. आता १०० पैकी २१ लाभार्र्थींना वाहने देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, ती येत्या १५ दिवसांत प्रत्यक्ष ताब्यात दिली जातील, असे महामंडळाच्या सूत्रांनी सांगितले. आधी दोन निवडणूक आचारसंहितांमुळे हे वाहनवाटप अडले. नंतर महामंडळातील ३८५ कोटी रुपयांचे धक्कादायक घोटाळे ‘लोकमत’च्या मालिकेने उघडकीस आणल्यानंतर राज्य शासनाने कुठलेही आर्थिक निर्णय घेण्यास महामंडळाला मनाई केली होती. (विशेष प्रतिनिधी)