शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

दोन वर्षे पडून असलेली वाहने लाभार्र्थींना देणार

By admin | Updated: January 26, 2016 03:07 IST

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील घोटाळ्यांमुळे अडकून पडलेली वाहने लाभार्र्थींना देण्याचा निर्णय महामंडळाच्या संचालक मंडळाने अखेर घेतला आहे

मुंबई : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील घोटाळ्यांमुळे अडकून पडलेली वाहने लाभार्र्थींना देण्याचा निर्णय महामंडळाच्या संचालक मंडळाने अखेर घेतला आहे. ही वाहने धूळ खात पडली असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने दिले होते. मातंग समाजातील गरजूंना भाजीपाला विक्रीसाठी वाहने उपलब्ध करून देण्याची योजना २०१३ मध्ये आखण्यात आली होती. त्यासाठी राष्ट्रीय मागासवर्ग महामंडळाने ४ कोटी २० लाख, साठे महामंडळाने १ कोटी ४० लाख, महामंडळाच्या वैयक्तिक अनुदानापोटी १० लाख, तर लाभार्र्थींचा हिस्सा ३० लाख रुपये अशी आर्थिक तरतूद करण्यात आली होती. ६ कोटी रुपयांच्या या प्रकल्पावर प्रत्यक्षात ७ कोटी ५० लाख रुपये खर्च करण्यात आले. हा जादाचा खर्च सध्या सीआयडीच्या चौकशी रडारवर आहे. या निधीतून १०० वाहने खरेदी करण्यात आली होती. ती भाजीपाला विक्रीसाठी विशेष पद्धतीने बनविण्यात आली असून, वाहनांचा अर्धा भाग वातानुकूलित आहे. दोन वर्षांपासून ठाणे आणि बोरीवलीतील दोन फर्मकडे ही वाहने नुसती पडून आहेत, यावर ‘लोकमत’ने प्रकाश टाकला होता. या वाहनांच्या लाभार्र्थींची निवड ही स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करण्यात आलेली होती. आता १०० पैकी २१ लाभार्र्थींना वाहने देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, ती येत्या १५ दिवसांत प्रत्यक्ष ताब्यात दिली जातील, असे महामंडळाच्या सूत्रांनी सांगितले. आधी दोन निवडणूक आचारसंहितांमुळे हे वाहनवाटप अडले. नंतर महामंडळातील ३८५ कोटी रुपयांचे धक्कादायक घोटाळे ‘लोकमत’च्या मालिकेने उघडकीस आणल्यानंतर राज्य शासनाने कुठलेही आर्थिक निर्णय घेण्यास महामंडळाला मनाई केली होती. (विशेष प्रतिनिधी)