शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

ओबीसी, एसबीसी विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकन शुल्कात सवलत द्या

By admin | Updated: May 4, 2017 04:12 IST

अन्य मागासवर्ग व विशेष मागासवर्ग विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन शुल्कात ५० टक्के सवलत देण्यात यावी व पुनर्मूल्यांकनाचा

मुंबई : अन्य मागासवर्ग व विशेष मागासवर्ग विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन शुल्कात ५० टक्के सवलत देण्यात यावी व पुनर्मूल्यांकनाचा अर्ज भरल्यानंतर ४५ दिवसांत निकाल जाहीर करावा, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर उच्च न्यायालयाने मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू, उच्च शिक्षण विभागाचे संचालक, परीक्षा विभागाचे संचालक व माहीमच्या विधि महाविद्यालयाच्या प्राचार्यांना नोटीस बजावत उत्तर देण्याचे निर्देश दिले. मुंबई विद्यापीठाच्या कायद्यानुसार आरक्षण मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकन शुल्कात ५० टक्के सवलत देणे बंधनकारक आहे. मात्र पुनर्मूल्यांकनासाठी भरण्यात येणाऱ्या अर्जामध्येच ओबीसी व एसबीसीचा समावेश नसल्याने या विद्यार्थ्यांना सवलत मिळत नाही. या विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकन शुल्कामध्ये ५० टक्के सवलत द्यावी, अशी विनंती करणारी याचिका माहीमच्या न्यू लॉ कॉलेजचे विद्यार्थी प्रियांका म्हात्रे व मच्छिंद्रनाथ पाटील यांनी दाखल केली. बुधवारच्या सुनावणीत उच्च न्यायालयाने कुलगुरू, उच्च शिक्षण विभागाचे संचालक, परीक्षा विभागाचे संचालक आणि न्यू लॉ कॉलेजच्या प्राचार्यांना नोटीस बजावत यावर उत्तर देण्याचे निर्देश दिले.याचिकाकर्त्या विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन केल्यानंतर निकाल ४५ दिवसांत जाहीर करावेत, अशी विनंतीही याचिकेद्वारे केली आहे. ‘निकाल वेळेत जाहीर करावेत, त्यानंतर किमान १५ दिवसांनी के. टी. परीक्षा ठेवण्याचे निर्देशही विद्यापीठाला द्यावेत,’ अशीही विनंती विद्यार्थ्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)