शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

मित्रांना योग्य वेळी न्याय देऊ

By admin | Updated: January 18, 2015 01:02 IST

विधानसभा निवडणुकीत भाजपासोबत आलेल्या मित्रपक्षांनी आम्हाला सत्तेत वाटा कधी मिळणार असा थेट सवाल मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या भरगच्च कार्यक्रमात केला.

मुख्यमंत्र्यांचे मित्रपक्षांना आश्वासन : ‘शिवसंग्राम’चा १३वा वर्धापन दिनमुंबई : विधानसभा निवडणुकीत भाजपासोबत आलेल्या मित्रपक्षांनी आम्हाला सत्तेत वाटा कधी मिळणार असा थेट सवाल मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या भरगच्च कार्यक्रमात केला. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत वाटा देण्याबाबत योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल, कुणीही काळजी करण्याची गरज नसल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.शिवसंग्राम पक्षाचा १३वा वर्धापन दिन शनिवारी परळ येथील कामगार मैदानात झाला. यावेळी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर आदी उपस्थित होते.आम्ही सर्व सुखाने नांदत असून विरोधकांनी तर आमच्यात फाटाफुट होण्यासाठी देव पाण्यात ठेवले. मात्र याचा आमच्यावर काहीच परिणाम होणार नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री तुम्हा सर्वांना न्याय देतील, अशी ग्वाही पंकजा मुंडे यांनी यावेळी दिली. मराठ्यांना योग्य ते आरक्षण देऊन त्यांचा सर्वांगिण विकास करावा, असे मतही त्यांनी व्यक्त केले.मेटेंनी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात आम्हाला एकत्र आणले, त्यामुळे आईसमोर रडण्याची संधी मिळाली, असा टोला सदाभाऊ खोत यांनी लगावला. गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे आम्ही तुमच्या सोबत असून त्यांच्या इच्छेखातर आम्हाला सत्तेत वाटा देऊन न्याय द्या, काँग्रेस- राष्ट्रवादीसमोर आम्हाला उघडे करू नका, असे आवाहन जानकर यांनी केले. (प्रतिनिधी)शिवसंग्राम संपविण्याचा पवारांचा प्रयत्नमला व शिवसंग्राम संपविण्यासाठी शरद पवार यांनी प्रयत्न केल्याचा आरोप मेटे यांनी केला. आमच्या पायगुणामुळे तुम्ही सत्तेत आलात, मात्र आम्हालाच सत्तेपासून बाजूला ठेवल्याचे मेटे म्हणाले.