शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

सातबारा तेथे विहीर द्या!

By admin | Updated: March 4, 2015 01:58 IST

सिंचनाची सोय नसल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहेत. ते रोखण्यासाठी शासनाने सिंचन सुविधा उपलब्ध करून द्याव्यात,

यवतमाळ : सिंचनाची सोय नसल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहेत. ते रोखण्यासाठी शासनाने सिंचन सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, जेथे सातबारा तेथे विहीर हे सूत्र सरकारने लागू करावे, अशा शब्दांत पिंपरी येथील शेतकऱ्यांनी मंगळवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांंना साकडे घातले. यवतमाळ येथे विभागीय आढावा बैठक आणि रातचांदणा व घोडखिंडी या गावांच्या भेटी आटोपून मुख्यमंत्री रात्री १० वाजता पिंपरी बुद्रुक या गावात मुक्कामासाठी पोहोचले. येथील प्राथमिक शाळेच्या पटांगणात त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांना प्रश्न विचारण्याची संपूर्ण मुभा दिली गेली होती. शेतकरी म्हणाले, खासदार-आमदारांना पेंशन मिळते, मोलकरणीलाही १० हजार रुपये पेंशन दिले जाते. मग शेतकऱ्यांवरच शासनाचा अन्याय का ?, शेतकऱ्यांनाही शासनाने पेंशन लागू करावे. शेततळे आणि बंधारे बांधून शेतकऱ्यांंना कोणताही फायदा होत नाही, त्याऐवजी प्रत्येक शेतात विहीर देऊन सिंचनासाठी २४ तास वीज उपलब्ध करून द्यावी, किमान दिवसातरी पूर्णवेळ वीज कृषिपंपाला मिळावी अशी रास्त अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली. शेतमालाला खर्चावर आधारित हमी भाव, सोयाबीन, कापूस यावर प्रक्रिया उद्योग, दीर्घ मुदती बिनव्याजी कर्ज आदी मागण्या यावेळी ठेवण्यात आल्या. सुमारे दीड हजार लोकसंख्या असलेल्या पिंपरी गावात मुख्यमंत्र्यांच्या मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली होती. तब्बल दहा घरी ही व्यवस्था केली गेली. यातील नेमक्या कोणत्या घरी मुख्यमंत्र्यांचा मुक्काम राहील, हे स्पष्ट नव्हते. या सर्वच घरी मुख्यमंत्र्यांसाठी साध्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. मुख्यमंत्री ज्या घरी मुक्काम करेल, अगदी त्याच्या बाजूच्या घरी जिल्हाधिकाऱ्यांच्या मुक्कामाची व्यवस्था केली गेली होती. पिंपरी हे गाव नियमित भारनियमनाचा सामना करते. मात्र, मंगळवारी वीज पुरवठा खंडित होणार नाही याची खबरदारी महावितरणने घेतल्याचे दिसून आले. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून जनरेटरची व्यवस्था करण्यात आली होती. या गावातील रस्त्यांची स्थिती चांगली आहे. गावाचे पोलीस पाटील पद काही महिन्यांपासून रिक्त आहे. शेजारील हदगावच्या पोलीस पाटलाकडे पिंपरीचा अतिरिक्त प्रभार आहे. प्राथमिक शाळेच्या पटांगणात मुख्यमंत्र्यांसाठी भारतीय बैठकीची व्यवस्था करण्यात आली होती. (प्रतिनिधी)