शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
2
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
3
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
4
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
5
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
6
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
8
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
9
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
10
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
11
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
12
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
13
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
14
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
15
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
16
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
17
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
18
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
19
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
20
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?

राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री द्या !

By admin | Updated: January 20, 2015 01:56 IST

कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने सरकारने राज्याला एक पूर्णवेळ गृहमंत्री द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विख-पाटील यांनी येथे केली़

अहमदनगर : राज्याचे पोलीस महासंचालक डोईजड झाले आहेत़ प्रशासनावर कुणाचाही वचक राहिला नसल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने सरकारने राज्याला एक पूर्णवेळ गृहमंत्री द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विख-पाटील यांनी येथे केली़ते म्हणाले, गेल्या १५ दिवसांत लातूर, पाथर्डी, हिंगोली जिल्ह्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटना भयानक आहेत. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. आयएसआय व अल-कायदासारख्या संघटनांनी दहशतवाद निर्माण केला आहे. पोलीस महासंचालक स्वत:ला मुख्यमंत्र्यांपेक्षाही मोठे समजू लागले आहेत़ ही बाब गंभीर आहे़ पोलीस महासंचालक हितसबंध असलेल्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आहेत़ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर अवलंबून न राहता सरकारने राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री द्यावा. याबाबत मुख्यमंत्र्यांनी तातडीने निर्णय घेणे अपेक्षित आहे. अन्यथा आक्रमक भूमिका घ्यावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.ऊस दराबाबत ते म्हणाले, एफआरपीनुसार भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी रास्त आहे़ मात्र साखरेच्या दरावर सरकारचे नियंत्रण नाही़ एफआरपी आणि साखर दरातील फरकाची जबाबदारी सरकारने स्वीकारावी़ सरकार केवळ कायद्याचा बडगा दाखवत आहे़ त्याची किंमत त्यांना मोजावी लागेल़ जनता त्यांना माफ करणार नाही. (प्रतिनिधी)