शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
4
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
5
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
6
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
7
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
8
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
9
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
10
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
11
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
12
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
13
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
14
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
15
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
19
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
20
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री द्या !

By admin | Updated: January 20, 2015 01:56 IST

कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने सरकारने राज्याला एक पूर्णवेळ गृहमंत्री द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विख-पाटील यांनी येथे केली़

अहमदनगर : राज्याचे पोलीस महासंचालक डोईजड झाले आहेत़ प्रशासनावर कुणाचाही वचक राहिला नसल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने सरकारने राज्याला एक पूर्णवेळ गृहमंत्री द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विख-पाटील यांनी येथे केली़ते म्हणाले, गेल्या १५ दिवसांत लातूर, पाथर्डी, हिंगोली जिल्ह्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटना भयानक आहेत. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. आयएसआय व अल-कायदासारख्या संघटनांनी दहशतवाद निर्माण केला आहे. पोलीस महासंचालक स्वत:ला मुख्यमंत्र्यांपेक्षाही मोठे समजू लागले आहेत़ ही बाब गंभीर आहे़ पोलीस महासंचालक हितसबंध असलेल्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आहेत़ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर अवलंबून न राहता सरकारने राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री द्यावा. याबाबत मुख्यमंत्र्यांनी तातडीने निर्णय घेणे अपेक्षित आहे. अन्यथा आक्रमक भूमिका घ्यावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.ऊस दराबाबत ते म्हणाले, एफआरपीनुसार भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी रास्त आहे़ मात्र साखरेच्या दरावर सरकारचे नियंत्रण नाही़ एफआरपी आणि साखर दरातील फरकाची जबाबदारी सरकारने स्वीकारावी़ सरकार केवळ कायद्याचा बडगा दाखवत आहे़ त्याची किंमत त्यांना मोजावी लागेल़ जनता त्यांना माफ करणार नाही. (प्रतिनिधी)