शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

३० लाख विहिरींचे पुरावे द्या - राज ठाकरे

By admin | Updated: April 21, 2016 03:22 IST

रोजगार हमी योजनेच्या कामासाठी महाराष्ट्र शासन मागील अनेक वर्षांपासून व्यवसायकर वसूल करीत आहे

नळदुर्ग (जि. उस्मानाबाद) : रोजगार हमी योजनेच्या कामासाठी महाराष्ट्र शासन मागील अनेक वर्षांपासून व्यवसायकर वसूल करीत आहे. या पैशांचा शासनाने काय विनियोग केला, याची माहिती दिली पाहिजे. राज्य शासन ३० लाख विहिरी बांधल्याचा दावा करीत आहे. या विहिरींचे पुरावे त्यांनी दिले पाहिजेत, असे प्रतिपादन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. लातूर येथील न्यायालयीन प्रक्रिया पार पडल्यानंतर ठाकरे यांनी तुळजापूर तालुक्यातील जळकोट व येडोळा शिवारात मनसे कार्यकर्त्यांनी केलेल्या जलसंधारणाच्या कामांची पाहणी केली. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. त्यांच्या समवेत माजी आ. बाळा नांदगावकर, मुंबई महापालिकेतील मनसेचे गटनेते नितीन देसाई, एसटी कामगार सेनेचे अविनाश अभ्यंकर यांच्यासह स्थानिक पदाधिरी उपस्थित होते. मागील काही दिवसांपासून मी ३० लाख विहिरींचा हिशोब मागतो आहे. मात्र, शासनाने अद्यापपर्यंत एकही पुरावा दिला नसल्याचे सांगत नागरिकांकडून कर रूपाने जमा केलेल्या पैशांचा सरकारने हिशेब दिला पाहिजे. तसेच या पैशातून नागरिकांना मुलभूत सुविधा पुरविल्या पाहिजेत, असेही ठाकरे यावेळी म्हणाले. तुळजापूर तालुक्यात प्रवेश केल्यानंतर जळकोट येथे मनसेच्या वतीने करण्यात आलेल्या ओढा पात्राच्या रुंदीकरण, खोलीकरण व पुनरूज्जीवनाच्या कामाची त्यांनी पाहणी केली. त्यानंतर राष्ट्रीय महामार्गावरील मुर्टा पाटीजवळ मोरे पुलाच्या नाल्याची बांध-बंदिस्ती व येडोळा गावाजवळील बोरी नदीपात्राच्या रूंदीकरण व खोलीकरणाच्या कामाची पाहणी केली.