शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

काँग्रेसला एकहाती सत्ता द्या

By admin | Updated: October 13, 2014 23:04 IST

पृथ्वीराज चव्हाण : रामानंदनगर येथे पतंगराव कदम यांच्या प्रचारार्थ सभा

किर्लोस्करवाडी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अहंकारामुळे आघाडी फुटली. मात्र आघाडीमुळे राज्याचे नुकसान होत असल्याने काँग्रेस पक्षालाचा एकहाती सत्ता द्यावी, असे आवाहन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. पलूस-कडेगाव मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार डॉ. पतंगराव कदम यांच्या प्रचारार्थ रामानंदनगर (ता. पलूस) येथील सभेत ते बोलत होते.चव्हाण म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापनाच व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेपोटी झाली. राष्ट्रवादीशी आघाडी करू नये असाच सर्वत्र सूर होता. मात्र जनतेमध्ये वेगळा संदेश जाऊ नये, असा काँग्रेसचा प्रयत्न होता. मात्र भाजपने शिवसेनेशी युती तोडल्याची घोषणा करताना राष्ट्रवादीमध्येही अहंकार निर्माण झाला. सरकारचा पाठिंबा काढून राष्ट्रवादीने एकप्रकारे १५ दिवसांकरिता केंद्रातील भाजपच्याच हातात राज्याची सत्ता दिली आहे.ते म्हणाले की, विदर्भ मराठवाड्यासह राज्यातील सर्व प्रश्न सोडवून महाराष्ट्राशी एकी राखली. मात्र स्वतंत्र विदर्भ, केंद्रशासित प्रदेश म्हणून मुंबई, असा कुटिल डाव केंद्रातील भाजप सरकारचा आहे. महाराष्ट्राची फाळणी करण्याचा भाजपचा हा कुटिल डाव त्यांचा पराभव करून जनता उधळून लावेल.पतंगराव कदम म्हणाले की, राष्ट्रवादीतील सर्व भ्रष्ट उमेदवार भाजपला मिळाले आहेत. मात्र जिल्ह्यात आठ पैकी पाच आमदार काँग्रेसचे असतील. गेल्या निवडणुकीपेक्षा आपला यावेळेला दुप्पट मताधिक्याने विजय निश्चित आहे. यावेळी मानसिंग बँकेचे संस्थापक जे. के. (बापू) जाधव, सभापती यास्मिन पिरजादे, माजी सरपंच जयसिंगराव नावडकर यांची भाषणे झाली. सभेस मोहनराव कदम, महेंद्र लाड, गणपतराव सावंत-पाटील, सर्जेराव पवार, सरपंच वार्इंगडे, माजी सरपंच प्रल्हाद सिताफे, डॉ. पृथ्वीराज चव्हाण, अकबर नदाफ, श्रीकांत लाड, उपसरपंच कोल्हापुरे, डॉ. डी. डी. माने, प्रशांत नलावडे, अख्तर पिरजादे, मीनाक्षी सावंत, श्वेता बिरनाळे, ऋषिकेश लाड, सुधीर जाधव उपस्थित होते. यावेळी माजी सरपंच जयसिंगराव नावडकर यांचा सत्कार डॉ. कदम यांच्याहस्ते झाला. (वार्ताहर)