शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
3
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
4
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
5
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
6
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
7
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
8
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
9
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
10
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
11
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
12
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
13
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
14
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
15
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
16
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
17
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
18
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
19
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
20
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?

काँग्रेसला एकहाती सत्ता द्या

By admin | Updated: October 13, 2014 23:04 IST

पृथ्वीराज चव्हाण : रामानंदनगर येथे पतंगराव कदम यांच्या प्रचारार्थ सभा

किर्लोस्करवाडी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अहंकारामुळे आघाडी फुटली. मात्र आघाडीमुळे राज्याचे नुकसान होत असल्याने काँग्रेस पक्षालाचा एकहाती सत्ता द्यावी, असे आवाहन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. पलूस-कडेगाव मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार डॉ. पतंगराव कदम यांच्या प्रचारार्थ रामानंदनगर (ता. पलूस) येथील सभेत ते बोलत होते.चव्हाण म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापनाच व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेपोटी झाली. राष्ट्रवादीशी आघाडी करू नये असाच सर्वत्र सूर होता. मात्र जनतेमध्ये वेगळा संदेश जाऊ नये, असा काँग्रेसचा प्रयत्न होता. मात्र भाजपने शिवसेनेशी युती तोडल्याची घोषणा करताना राष्ट्रवादीमध्येही अहंकार निर्माण झाला. सरकारचा पाठिंबा काढून राष्ट्रवादीने एकप्रकारे १५ दिवसांकरिता केंद्रातील भाजपच्याच हातात राज्याची सत्ता दिली आहे.ते म्हणाले की, विदर्भ मराठवाड्यासह राज्यातील सर्व प्रश्न सोडवून महाराष्ट्राशी एकी राखली. मात्र स्वतंत्र विदर्भ, केंद्रशासित प्रदेश म्हणून मुंबई, असा कुटिल डाव केंद्रातील भाजप सरकारचा आहे. महाराष्ट्राची फाळणी करण्याचा भाजपचा हा कुटिल डाव त्यांचा पराभव करून जनता उधळून लावेल.पतंगराव कदम म्हणाले की, राष्ट्रवादीतील सर्व भ्रष्ट उमेदवार भाजपला मिळाले आहेत. मात्र जिल्ह्यात आठ पैकी पाच आमदार काँग्रेसचे असतील. गेल्या निवडणुकीपेक्षा आपला यावेळेला दुप्पट मताधिक्याने विजय निश्चित आहे. यावेळी मानसिंग बँकेचे संस्थापक जे. के. (बापू) जाधव, सभापती यास्मिन पिरजादे, माजी सरपंच जयसिंगराव नावडकर यांची भाषणे झाली. सभेस मोहनराव कदम, महेंद्र लाड, गणपतराव सावंत-पाटील, सर्जेराव पवार, सरपंच वार्इंगडे, माजी सरपंच प्रल्हाद सिताफे, डॉ. पृथ्वीराज चव्हाण, अकबर नदाफ, श्रीकांत लाड, उपसरपंच कोल्हापुरे, डॉ. डी. डी. माने, प्रशांत नलावडे, अख्तर पिरजादे, मीनाक्षी सावंत, श्वेता बिरनाळे, ऋषिकेश लाड, सुधीर जाधव उपस्थित होते. यावेळी माजी सरपंच जयसिंगराव नावडकर यांचा सत्कार डॉ. कदम यांच्याहस्ते झाला. (वार्ताहर)