शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

कारवाईचा अहवाल १ जुलैला द्या

By admin | Updated: May 30, 2016 02:36 IST

रासायनिक प्रदूषणप्रकरणी राष्ट्रीय हरित लवादाने केंद्रीय व राज्य प्रदूषण मंडळास शुक्रवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी चांगलेच फटकारले

कल्याण : डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर पट्ट्यातील औद्योगिक कारखान्यांतून होणाऱ्या रासायनिक प्रदूषणप्रकरणी राष्ट्रीय हरित लवादाने केंद्रीय व राज्य प्रदूषण मंडळास शुक्रवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी चांगलेच फटकारले. यावेळी केंद्रीय प्रदूषण मंडळास १ जुलैला कारवाईचा अहवाल सादर करण्यास शेवटची संधी दिली आहे. अन्यथा, संबंधितांच्या विरोधात कारवाई केली जाईल, असे लवादाने स्पष्ट केले आहे. कारखाने रसायनमिश्रित सांडपाण्यावर प्रक्रिया न करता थेट उल्हास नदी, कल्याण खाडी व वालधुनी नदीत सोडत आहेत. त्यामुळे प्रदूषण होत असल्याप्रकरणी ‘वनशक्ती’ या पर्यावरण संस्थेने राष्ट्रीय हरित लवादाकडे धाव घेतली होती. मात्र, प्रदूषण नियंत्रण मंडळ, एमआयडीसी यांनी हात वर केले होते. याप्रकरणी संबंधित संस्थांना १०० कोटींचा दंड ठोठावला. सर्वोच्च न्यायालयाने दंड भरण्यावरील उच्च न्यायालयाची स्थगिती उठवली आहे. त्याची सुनावणी जुलैत होणार आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रदूषणप्रकरणी प्रतिज्ञापत्र लवादाकडे सादर करून प्रदूषण होत असल्याचे मान्य केले. लवादाने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ बंद करून त्याचा ताबा घ्यावा, असे सूचित केले होते. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ही कार्यवाही न केल्याने केंद्रीय वन व पर्यावरण खात्याच्या संचालकांना १० कोटींचा दंड व तीन वर्षांची शिक्षा ठोठावण्याचा इशारा लवादाने दिला होता. वन व पर्यावरण खात्याच्या संचालकांनी स्वत: लवादाच्या शुक्रवारी झालेल्या सुनावणीस हजर राहण्याचे आदेशदिले होते. लवादाने केंद्रीय व राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. पण, अहवाल सादर न केल्याने लवादाने केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाला चांगलेच धारेवर धरले.राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने आपली ओळखच गमावली आहे, असे मत लवादाने नोंदवले. डोंबिवली परिसरातील प्रदूषणाचा गंभीर विषय असतानाही सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. लवादाने सर्व संबंधित सरकारी विभाग व अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावत सक्त ताकीद दिली. केंद्र व राज्य सरकारने दोन महिन्यांत करवाईच न केल्यामुळे कडक शब्दांत नाराजी व्यक्त केली. याबाबत टिप्पणी करताना लवादाने असे मत नोंदवले की, हा एकतर निष्काळजीपणा आहे किंवा अक्षम्य दुर्लक्ष आहे. अनेकदा सविस्तर कारणमीमांसा करून आणि आदेश देऊनही केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाने काहीही कारवाई केली नाही. दुर्दैवाने, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने दाखल केलेले प्रतिज्ञापत्र खरे मानून त्यावर विश्वास ठेवला. (प्रतिनिधी)