शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

दुष्काळग्रस्तांना ४ हजार कोटी द्या

By admin | Updated: November 18, 2015 02:40 IST

राज्यांतील १५,७४७ गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, या गावांसाठी राज्य शासनाने ४००२.८२ कोटी रुपयांची तातडीची मदत केंद्र सरकारकडे मागितली आहे, अशी माहिती

मुंबई : राज्यांतील १५,७४७ गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, या गावांसाठी राज्य शासनाने ४००२.८२ कोटी रुपयांची तातडीची मदत केंद्र सरकारकडे मागितली आहे, अशी माहिती महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावर्षी पावसाळ््यात जून वगळता सर्व महिन्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. १ जून ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत सरासरीच्या ५९.४० टक्केच पाऊस पडला. राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या २५ ते ५० टक्के व १६ जिल्ह्यांमध्ये ५० ते ७५ टक्के पाऊस पडला आहे. औरंगाबाद, नाशिक, नागपूर, पुणे, अमरावती या विभागांमधील धरणांमध्ये आॅक्टोबर, २०१४ मध्ये ७४ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. मात्र, यावर्षी आॅक्टोबरअखेर ५३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी आॅक्टोबरमध्ये राज्यात ६३ टँकरव्दारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत होता. मात्र, यावर्षी आॅक्टोबरमध्ये ६५३ टँकर व्दारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे की, जो मागील वर्षाच्या १० पटींपेक्षा जास्त असल्याचे खडसे यांनी सांगितले. राज्यात आॅक्टोबर अखेर रब्बी पिकांची फक्त ४३ टक्के पेरणी झालेली आहे. या टंचाईग्रस्त गावांमधील ५३.११ लक्ष हेक्टर क्षेत्र प्रभावित झालेले आहे. या बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ३५७८.४३ कोटी रुपये मदतीची आवश्यकता आहे, असेही खडसे म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)