शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
5
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
6
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
7
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
11
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
13
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
14
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
15
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
16
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
17
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
18
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
19
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
20
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच

दुष्काळग्रस्तांना ४ हजार कोटी द्या

By admin | Updated: November 18, 2015 02:40 IST

राज्यांतील १५,७४७ गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, या गावांसाठी राज्य शासनाने ४००२.८२ कोटी रुपयांची तातडीची मदत केंद्र सरकारकडे मागितली आहे, अशी माहिती

मुंबई : राज्यांतील १५,७४७ गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, या गावांसाठी राज्य शासनाने ४००२.८२ कोटी रुपयांची तातडीची मदत केंद्र सरकारकडे मागितली आहे, अशी माहिती महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावर्षी पावसाळ््यात जून वगळता सर्व महिन्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. १ जून ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत सरासरीच्या ५९.४० टक्केच पाऊस पडला. राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या २५ ते ५० टक्के व १६ जिल्ह्यांमध्ये ५० ते ७५ टक्के पाऊस पडला आहे. औरंगाबाद, नाशिक, नागपूर, पुणे, अमरावती या विभागांमधील धरणांमध्ये आॅक्टोबर, २०१४ मध्ये ७४ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. मात्र, यावर्षी आॅक्टोबरअखेर ५३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी आॅक्टोबरमध्ये राज्यात ६३ टँकरव्दारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत होता. मात्र, यावर्षी आॅक्टोबरमध्ये ६५३ टँकर व्दारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे की, जो मागील वर्षाच्या १० पटींपेक्षा जास्त असल्याचे खडसे यांनी सांगितले. राज्यात आॅक्टोबर अखेर रब्बी पिकांची फक्त ४३ टक्के पेरणी झालेली आहे. या टंचाईग्रस्त गावांमधील ५३.११ लक्ष हेक्टर क्षेत्र प्रभावित झालेले आहे. या बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ३५७८.४३ कोटी रुपये मदतीची आवश्यकता आहे, असेही खडसे म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)