शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

‘प्रकल्पग्रस्तांना दरमहा १५ हजार द्या’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2017 04:51 IST

पुणे जिल्ह्यातील नीरा देवघर जलसिंचन प्रकल्पग्रस्तांच पुनर्वसन केल्यानंतर त्यांना शेतीसाठी पाणी पुरवण्यात तब्बल १७ वर्षे दिरंगाई केल्याने, तसेच त्यांच्या उदरनिर्वाह करण्याचा अधिकाराचे

- दीप्ती देशमुख,  मुंबई

पुणे जिल्ह्यातील नीरा देवघर जलसिंचन प्रकल्पग्रस्तांच पुनर्वसन केल्यानंतर त्यांना शेतीसाठी पाणी पुरवण्यात तब्बल १७ वर्षे दिरंगाई केल्याने, तसेच त्यांच्या उदरनिर्वाह करण्याचा अधिकाराचे उल्लंघन केल्याने उच्च न्यायालयाने राज्य सरकारवर ताशेरे ओढत सुमारे ६० ते ७० प्रकल्पग्रस्तांना नुकसान भरपाई म्हणून १ डिसेंबर २०१२ पासून दरमहा १५ हजार रुपये देण्याचा आदेश राज्य सरकारला दिला. त्याशिवाय ३१ आॅक्टोबर २०१७ पर्यंत संबंधित प्रकल्पग्रस्तांना शेतीसाठी पाणी उपलब्ध करण्याचा आदेशही उच्च न्यायालयाने दिला.‘जीवन जगण्याच्या अधिकार केवळ शहरी जनतेला लागू होत नाही. तो ग्रामीण विभागात राहणाऱ्या लोकांनाही लागू होतो. मात्र र्दुदैवाने या केसमध्ये आम्हाला असे जाणवले की हा अधिकार केवळ शहरी जनतेसाठी आहे. शहरातील लोकांना सर्व मुलभूत सुविधा पुरवणे आवश्यक आहे. मात्र गावच्या लोकांना शौचालय, मोकळे मैदान, बाजाररहाट, मैदाने, वीज, पाणी इत्यादींची आवश्यकता नसते, असा समज आहे देशाला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे उलटली तरी गावच्या लोकांना मुलभूत सुविधा भागवल्या जात नाही. यासाठी राज्य सरकारची असंवेदनशीलता आणि बेजबाबदारपणा जबाबदार आहे, हे दुर्देवाने म्हणावे लागेल,’ अशा शब्दांत मुख्य न्या. मंजुळा चेल्लुर व न्या. एम. एस. सोनक यांच्या खंडपीठाने खंत व्यक्त केली.कोणताही प्रकल्प हाती घेताना ‘आधी पुनर्वसन आणि मग विकास’ असे सरकारचेच धोरण आहे. परंतु, सरकारचे कृत्य नेमके त्यांच्याच धोरणाविरोधी आहे. कागदोपत्री अनेक धोरणे आखण्यापेक्षा आहे तेच धोरण नीट राबवा. प्रकल्पग्रस्तांसंदर्भातील धोरण अत्यंत गांभीर्याने आणि संवेदनशीलतेने राबवण्याची वेळ आली आहे. प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या पुर्वजांच्या जमिनीपासून आणि ते राहात असलेल्या वातावरणातून बाहेर काढण्यात येते आणि ते ही कोणत्याही आर्थिक आणि सामाजिक पाठबळाशिवाय अन्य ठिकाणी ‘कल्याणकारी सरकारच्या’ भरवशावर अन्य ठिकाणी राहायला जातात. मात्र सरकार त्यांच्याशी असे वागून त्यांच्या विश्वास तोडत आहे आणि हे अत्यंत गंभीर आहे,’ अशा शब्दांत उच्च न्यायालयाने सरकारवर ताशेरे ओढले. राज्य सरकार जनतेच्या हितासाठी काम करत असताना प्रकल्पग्रस्तांना नुकसान भरपाई देण्यास राज्य सरकार बांधील नाही. याचिकाकर्ते त्यांच्या आवारात विहीर किंवा बोअरवेल बांधून शेतीसाठी मुबल पाणी मिळवू शकतात, असा युक्तिवाद देशपांडे यांनी केला. मात्र खंडपीठाने त्यांचा युक्तिवाद मान्य करण्यास नकार देत याचिकाकर्त्यांना नुकसान भरपाई म्हणून देण्याचे निर्देश दिले.