शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
4
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
5
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
6
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
7
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
8
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
9
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
10
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
11
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
12
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
13
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
14
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
15
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
16
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
17
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
18
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
19
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
20
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा

‘प्रकल्पग्रस्तांना दरमहा १५ हजार द्या’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2017 04:51 IST

पुणे जिल्ह्यातील नीरा देवघर जलसिंचन प्रकल्पग्रस्तांच पुनर्वसन केल्यानंतर त्यांना शेतीसाठी पाणी पुरवण्यात तब्बल १७ वर्षे दिरंगाई केल्याने, तसेच त्यांच्या उदरनिर्वाह करण्याचा अधिकाराचे

- दीप्ती देशमुख,  मुंबई

पुणे जिल्ह्यातील नीरा देवघर जलसिंचन प्रकल्पग्रस्तांच पुनर्वसन केल्यानंतर त्यांना शेतीसाठी पाणी पुरवण्यात तब्बल १७ वर्षे दिरंगाई केल्याने, तसेच त्यांच्या उदरनिर्वाह करण्याचा अधिकाराचे उल्लंघन केल्याने उच्च न्यायालयाने राज्य सरकारवर ताशेरे ओढत सुमारे ६० ते ७० प्रकल्पग्रस्तांना नुकसान भरपाई म्हणून १ डिसेंबर २०१२ पासून दरमहा १५ हजार रुपये देण्याचा आदेश राज्य सरकारला दिला. त्याशिवाय ३१ आॅक्टोबर २०१७ पर्यंत संबंधित प्रकल्पग्रस्तांना शेतीसाठी पाणी उपलब्ध करण्याचा आदेशही उच्च न्यायालयाने दिला.‘जीवन जगण्याच्या अधिकार केवळ शहरी जनतेला लागू होत नाही. तो ग्रामीण विभागात राहणाऱ्या लोकांनाही लागू होतो. मात्र र्दुदैवाने या केसमध्ये आम्हाला असे जाणवले की हा अधिकार केवळ शहरी जनतेसाठी आहे. शहरातील लोकांना सर्व मुलभूत सुविधा पुरवणे आवश्यक आहे. मात्र गावच्या लोकांना शौचालय, मोकळे मैदान, बाजाररहाट, मैदाने, वीज, पाणी इत्यादींची आवश्यकता नसते, असा समज आहे देशाला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे उलटली तरी गावच्या लोकांना मुलभूत सुविधा भागवल्या जात नाही. यासाठी राज्य सरकारची असंवेदनशीलता आणि बेजबाबदारपणा जबाबदार आहे, हे दुर्देवाने म्हणावे लागेल,’ अशा शब्दांत मुख्य न्या. मंजुळा चेल्लुर व न्या. एम. एस. सोनक यांच्या खंडपीठाने खंत व्यक्त केली.कोणताही प्रकल्प हाती घेताना ‘आधी पुनर्वसन आणि मग विकास’ असे सरकारचेच धोरण आहे. परंतु, सरकारचे कृत्य नेमके त्यांच्याच धोरणाविरोधी आहे. कागदोपत्री अनेक धोरणे आखण्यापेक्षा आहे तेच धोरण नीट राबवा. प्रकल्पग्रस्तांसंदर्भातील धोरण अत्यंत गांभीर्याने आणि संवेदनशीलतेने राबवण्याची वेळ आली आहे. प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या पुर्वजांच्या जमिनीपासून आणि ते राहात असलेल्या वातावरणातून बाहेर काढण्यात येते आणि ते ही कोणत्याही आर्थिक आणि सामाजिक पाठबळाशिवाय अन्य ठिकाणी ‘कल्याणकारी सरकारच्या’ भरवशावर अन्य ठिकाणी राहायला जातात. मात्र सरकार त्यांच्याशी असे वागून त्यांच्या विश्वास तोडत आहे आणि हे अत्यंत गंभीर आहे,’ अशा शब्दांत उच्च न्यायालयाने सरकारवर ताशेरे ओढले. राज्य सरकार जनतेच्या हितासाठी काम करत असताना प्रकल्पग्रस्तांना नुकसान भरपाई देण्यास राज्य सरकार बांधील नाही. याचिकाकर्ते त्यांच्या आवारात विहीर किंवा बोअरवेल बांधून शेतीसाठी मुबल पाणी मिळवू शकतात, असा युक्तिवाद देशपांडे यांनी केला. मात्र खंडपीठाने त्यांचा युक्तिवाद मान्य करण्यास नकार देत याचिकाकर्त्यांना नुकसान भरपाई म्हणून देण्याचे निर्देश दिले.