शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेतून उडी मारून तरुणीची आत्महत्या

By admin | Updated: May 21, 2016 02:35 IST

धावत्या रेल्वेतून उडी मारुन तरुणीने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी नेरुळ येथे घडली.

नवी मुंबई : धावत्या रेल्वेतून उडी मारुन तरुणीने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी नेरुळ येथे घडली. सदर घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणीला उपचारासाठी रुग्णालयात नेले असता तिचा मृत्यू झाला. झडतीमध्ये तिच्याकडे चिठ्ठी सापडली असून त्यामध्ये कुटुंबीयांच्या शैक्षणिक अपेक्षा पूर्ण करु शकत नसल्याच्या कारणाचा उल्लेख आढळून आला आहे.अश्विनी कारखिले (१९) असे मयत तरुणीचे नाव असून ती नेरुळ सेक्टर १ ची राहणारी आहे. शुक्रवारी दुपारी १.१५ वाजण्याच्या सुमारास तिने रेल्वेतून उडी मारुन आत्महत्या केली. अश्विनी ही बी.एस्सी.ची विद्यार्थिनी असून क्लासला जाण्यासाठी घरातून बाहेर निघाली होती. यानुसार बेलापूर-वाशी रेल्वेतून प्रवास करताना तिने राजीव गांधी पुलालगत रेल्वेबाहेर उडी मारली. गंभीर जखमी अश्विनीला लगतच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. नेरुळ पोलीस व वाशी रेल्वे पोलीस यांनी घटनास्थळाची पाहणी केली असता अश्विनीची बॅग त्यांच्या हाती लागली. परंतु आत्महत्येच्या प्रयत्नात ती गंभीर जखमी झालेली असल्यामुळे पोलीस तिची चौकशी करू शकले नाहीत. काही वेळातच तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक झाल्यामुळे शिवाय अपघातामध्ये दोन्ही पाय गमावल्याने पुढील उपचारासाठी तिला वाशीतील मनपा रुग्णालयात हलवण्यात आले. त्याठिकाणी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. वाशी रेल्वे पोलीस ठाण्यात तिच्या आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरुन ताब्यात घेतलेल्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये अश्विनीने लिहिलेली चिठ्ठी सापडली आहे. ही चिठ्ठी अश्विनीने आईला उद्देशून लिहिलेली असल्याचे वाशी रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नितीन बोबडे यांनी सांगितले. कौटुंबिक आर्थिक बेताची, त्यात घरच्यांकडून तिच्या शैक्षणिक अपेक्षा असल्याने ती दडपणाखाली होती.