शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

शिक्षणासाठी पैसे नसल्याने मुलीची आत्महत्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 01:08 IST

वाशिम जिल्ह्यातील घटना : दहावीत मिळाले होते ७२ टक्के गुण

लोकमत न्यूज नेटवर्क कारंजा लाड : वडील आॅटो चालवितात; तर आई मिळेल ते मोलमजुरीचे काम करते. या माध्यमातून मिळणाऱ्या तुटपुंज्या मिळकतीवर चार मुली आणि एका मुलाच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालणार तरी कसा ? दहावीपर्यंत कसेबसे शिक्षण पूर्ण झाले; परंतु पुढच्या शिक्षणासाठी पैसे कसे मिळणार? लग्नासाठीदेखील पैसे लागणारच, आदी प्रश्नांनी घेरल्या गेलेल्या पोहा येथील पल्लवी गोकुल तायडे (वय १६ वर्षे) या मुलीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. ही हृदयद्रावक घटना सोमवार, १७ जुलै रोजी उघडकीस आली. मृतक पल्लवी तायडे ही अभ्यासात अत्यंत हुशार होती. तिच्या कुटुंबात आई-वडिल, तीन बहिणी आणि एक भाऊ असून त्यांच्या शिक्षणाचा खर्च, लहान-सहान आजार यासह भविष्यात लग्नासाठी लागणाऱ्या पैशांची जुळवाजुळव करीत असताना आई आणि वडील दोघांचीही दमछाक होत होती. अशा विदारक परिस्थितीत लहानाची मोठी झालेल्या पल्लवीने वसंत विद्यालय, पोहा येथे शिकत असताना कठीण परिश्रमातून दहावीच्या परीक्षेत ७२ टक्के गुण मिळविले होते. मात्र, पुढचे शिक्षण घ्यायचे म्हटले तर गाव सोडून शहरात जावे लागणार होते. दरम्यान, कमीत कमी खर्चात कुठल्या महाविद्यालयात प्रवेश मिळू शकतो, याची चाचपणी करीत असताना पल्लवीने तीन ते चार महाविद्यालयांचे उंबरठे झिजविले. मात्र, ११ वी नंतरचे शिक्षण कमी पैशात कदापि शक्य नसल्याचे तिच्या लक्षात आले. त्यामुळे अखेर तिने हलाखीच्या आर्थिक परिस्थितीसमोर गुडघे टेकत गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली,असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. या घटनेमुळे पोहा गावात सर्वत्र शोककळा पसरली आहे. ‘त्या’ मातेचा आक्रोश असह्य करणारा!चार मुली आणि एका मुलगा यामध्ये सर्वात मोठी असलेल्या पल्लवीने १७ जुलै रोजी घरात गळफास घेण्याचा प्रयत्न केला. ही बाब लक्षात घेताच तिच्या आईने आरडाओरड करून परिसरातील नागरिकांना बोलावून तिचा गळफास सोडवून घेतला. तिला उपचाराकरिता कारंजाच्या ग्रामीण रुग्णालयात आणि नंतर अमरावतीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, १७ जुलैच्या मध्यरात्री उपचारादरम्यान पल्लवीची प्राणज्योत मालवली. मुलीच्या अशाप्रकारच्या मृत्यूमुळे तिच्या आईने केलेला आक्रोश असह्य करणारा होता.