शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
3
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
4
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
7
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
8
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
9
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
10
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
11
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
12
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
13
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
14
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
15
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
16
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
17
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
18
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
19
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
20
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली

शिक्षणासाठी पैसे नसल्याने मुलीची आत्महत्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 01:08 IST

वाशिम जिल्ह्यातील घटना : दहावीत मिळाले होते ७२ टक्के गुण

लोकमत न्यूज नेटवर्क कारंजा लाड : वडील आॅटो चालवितात; तर आई मिळेल ते मोलमजुरीचे काम करते. या माध्यमातून मिळणाऱ्या तुटपुंज्या मिळकतीवर चार मुली आणि एका मुलाच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालणार तरी कसा ? दहावीपर्यंत कसेबसे शिक्षण पूर्ण झाले; परंतु पुढच्या शिक्षणासाठी पैसे कसे मिळणार? लग्नासाठीदेखील पैसे लागणारच, आदी प्रश्नांनी घेरल्या गेलेल्या पोहा येथील पल्लवी गोकुल तायडे (वय १६ वर्षे) या मुलीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. ही हृदयद्रावक घटना सोमवार, १७ जुलै रोजी उघडकीस आली. मृतक पल्लवी तायडे ही अभ्यासात अत्यंत हुशार होती. तिच्या कुटुंबात आई-वडिल, तीन बहिणी आणि एक भाऊ असून त्यांच्या शिक्षणाचा खर्च, लहान-सहान आजार यासह भविष्यात लग्नासाठी लागणाऱ्या पैशांची जुळवाजुळव करीत असताना आई आणि वडील दोघांचीही दमछाक होत होती. अशा विदारक परिस्थितीत लहानाची मोठी झालेल्या पल्लवीने वसंत विद्यालय, पोहा येथे शिकत असताना कठीण परिश्रमातून दहावीच्या परीक्षेत ७२ टक्के गुण मिळविले होते. मात्र, पुढचे शिक्षण घ्यायचे म्हटले तर गाव सोडून शहरात जावे लागणार होते. दरम्यान, कमीत कमी खर्चात कुठल्या महाविद्यालयात प्रवेश मिळू शकतो, याची चाचपणी करीत असताना पल्लवीने तीन ते चार महाविद्यालयांचे उंबरठे झिजविले. मात्र, ११ वी नंतरचे शिक्षण कमी पैशात कदापि शक्य नसल्याचे तिच्या लक्षात आले. त्यामुळे अखेर तिने हलाखीच्या आर्थिक परिस्थितीसमोर गुडघे टेकत गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली,असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. या घटनेमुळे पोहा गावात सर्वत्र शोककळा पसरली आहे. ‘त्या’ मातेचा आक्रोश असह्य करणारा!चार मुली आणि एका मुलगा यामध्ये सर्वात मोठी असलेल्या पल्लवीने १७ जुलै रोजी घरात गळफास घेण्याचा प्रयत्न केला. ही बाब लक्षात घेताच तिच्या आईने आरडाओरड करून परिसरातील नागरिकांना बोलावून तिचा गळफास सोडवून घेतला. तिला उपचाराकरिता कारंजाच्या ग्रामीण रुग्णालयात आणि नंतर अमरावतीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, १७ जुलैच्या मध्यरात्री उपचारादरम्यान पल्लवीची प्राणज्योत मालवली. मुलीच्या अशाप्रकारच्या मृत्यूमुळे तिच्या आईने केलेला आक्रोश असह्य करणारा होता.